शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:04 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या लसीकरणाचा शुभारंभ महाराष्ट्र ...

औरंगाबाद : राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या लसीकरणाचा शुभारंभ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरात तीन केंद्रांवर दुपारी २ ते ५ यावेळेत लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या दिवशी प्रत्येक केंद्रावर १०० जणांना लस दिली जाणार आहे.

१ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेताना लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारवर टाकण्यात आली. सध्या ४४ आणि त्यावरच्या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून लसींचा मोफत पुरवठा केला जात आहे. १ मेपासूनच्या मोहिमेत राज्य सरकारांनी लस विकत घेऊन ती नागरिकांना (लाभार्थींना) पुरवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय २८ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयानुसार १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण सुरू केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला सात हजार लसींचा पुरवठा शासनाकडून करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या लसींच्या साठ्यातून जिल्ह्यातील मिनी घाटी (जिल्हा सामान्य रुग्णालय) आणि खुलताबाद येथील लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार आहे. औरंगाबाद शहरात मुकुंदवाडी येथील महापालिकेचे आरोग्य केंद्र, कैसर कॉलनी येथील पालिकेचे आरोग्य केंद्र आणि सादातनगर आरोग्य केंद्र या तीन ठिकाणी लसीकरण केले जाईल. प्रत्येक केंद्रावर शंभर लाभार्थींना लस दिली जाईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.