शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

एकाच दिवसात गुंडाळले लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:04 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राला प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते ...

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राला प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते एकाच दिवसात गुंडाळण्याची नामुष्की प्रशासनावर आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक- कर्मचाऱ्यांकडून परिसरातील आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने महापालिका प्रशासनाला पत्र दिले. या लसीकरण केंद्राद्वारे पहिल्या टप्प्यात विद्यापीठ परिसरातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा रक्षक अशा ४५ वर्षांवरील सुमारे दीड ते दोन हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते, तर दुसऱ्या टप्प्यात या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना लसीकरण केले जाणार होते. मात्र, तिथे पहिल्याच दिवशी अवघ्या १० जणांनी लसीकरण करून घेतल्यामुळे महापालिकेने नंतर त्या ठिकाणी लसींचा पुरवठा करण्यास नकार दिला. त्यामुळे विद्यापीठाला ते लसीकरण केंद्रच बंद करावे लागले.

विद्यापीठ आरोग्य केंद्र येथे १४ जूनपासून कोविड लसीकरण केंद्राला सुरुवात करण्यात आली. तिथे दररोज सुमारे १०० कर्मचाऱ्यांना लसीचे डोस देण्याचे नियोजन होते. विद्यापीठाने लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना आरोग्य केंद्रात जाऊन नोंदणी करण्याचे आवाहनही केले होते. लसीकरणाच्या दिवशी संबंधितांनी ओळखपत्र व आधार कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, विद्यापीठ आरोग्य केंद्रात फक्त २१ जणांनीच लसीकरणासाठी नोंदणी केली व दहा जणांनीच लसीकरण करून घेतले. त्यामुळे लसीचा साठा घेऊन विद्यापीठ आरोग्य केंद्रात गेलेल्या मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. हे वास्तव त्यांनी मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या निदर्शनास आणून दिले. डॉ. पाडळकर यांनी विद्यापीठ आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला.

चौकट......

अतिशय अल्प प्रतिसाद

विद्यापीठ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमवंशी यांनी सांगितले की, विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी, शिक्षकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते; पण अतिशय अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करावे लागले. लसीकरणासाठी महापालिकेचे आरोग्य कर्मचारी आले होते. नोंदणी केलेल्यांपैकी फक्त दहाच लोकांनी लसीकरणासाठी हजेरी लावल्यामुळे मनपाने या केंद्रावरील लसीच्या वायल परत नेल्या.