शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर

By admin | Updated: May 22, 2014 00:16 IST

जालना: प्रशासनाचे उदासीन धोरण व जलशुद्धीकरणाची तोकडी यंत्रणा यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश जनतेला दूषित पाणीपुरवठा होतो आहे.

 जालना: प्रशासनाचे उदासीन धोरण व जलशुद्धीकरणाची तोकडी यंत्रणा यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश जनतेला दूषित पाणीपुरवठा होतो आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुध्द पाणी मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेकडून राष्ट्रीय पेयजल योजना आणि निर्मल भारत योजनेतून पाणीपुरवठा योजना दिली जाते. अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे या योजना कागदावरच आहेत. ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. परिणामी, साथीच्या आजार बळावण्याची भीती कायम असते. हातपंप, सार्वजनिक विहिरी, कूपनलिका यामधून ग्रामस्थांना पाणीपुरवठा होतो. हे पाणी पिण्यासाठी योग्य का अयोग्य आहे, ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया म्हणावी तशी पार पाडली जात नाही. प्रशासन शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी संबंधितांना वारंवार सूचना करते. परंतु या सूचनांची अंमलबजावणी कधीतरीच होते. ग्रामीण भागात जलशुध्दीकरण केंद्रच नाही जिल्ह्यात जाफराबाद ,आन्वा, पिंपळगाव रेणुकाई, भारज येथे जलशुध्दीकरण केंद्र आहे. इतर तालुक्यांत गंभीर परिस्थिती आहे. इतर तालुक्यांत अशुद्ध पाणीपुरवठा होतो, हे वास्तव आहे. शासकीय प्रयोगशाळेतील अधिकार्‍यांकडूनही याचे उत्तर मिळू शकले. त्यांनीही चुप्पीच साधली. जारफराबादव्यतिरिक्त सर्वच जलशुध्दीकरण केंद्र बंद असल्याने ग्रामस्थांना अशुध्द पाणी पिण्याची वेळ आली आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, पंचायत राजविभाग, स्थानिक पातळीवर असलेली प्रशासनाचा लालफितीचा कारभार ग्रामस्थांच्या जिवावर बेतण्याची भीती आहे. जिल्ह्यात किती जलशुध्दीकरण केंदे आहेत, याची माहिती उपमुख्य कार्यकारी अभियंता यांना नाही. एकमेकांना विचारुन थातूरमातूर उत्तरे दिली. शेवटी बराच वेळानंतर काही माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द पाणी मिळावे यासाठी शासनाने राष्ट्रीय पेयजल योजनेतून केंद्र व राज्याचा निधी आणि लोकसहभागातून कामे करावी लागते. २०१३ पर्यंत २० कोटी रूपये प्रात्त झाले. १२ कोटी रुपये खर्च झाला. उर्वरित कामे सुरु असल्याचे सांगण्यात आले. २०१४ सालचा निधी प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी पाणी तपासणीसाठी नव्याने अंबड जाफराबाद आणि मंठा येथे प्रयोग शाळांची उभारणी करण्यात आली आहे. एप्रिल ते मे महिन्यात एकूण १०९५ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ३१० नमुने दूषित निघाले. यामध्ये सर्वात जास्त थरमोटॉलरन्स हा जंतु मोठ्या प्रमाणात आढळून आला.यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, जाँडीस आदी आजारांची शक्यता असल्याचे कनिष्ठ वैज्ञालिक सी.आर. नरवडे यांनी सांगितले. ग्रामीण भागात जलशुध्दीकरण केंद्र नसल्याने ग्रामीण दूषित पाण्याचे नमुने जास्त आढळतात. जिल्हातील ४० आरोग्य केंद्रातील पाणी तपासणी वेळोवेळी केली जाते. (प्रतिनिधी) ब्लिचिंग पावडरची व क्लोरिन व द्रावणाची तपासणी, आयोडीनयुक्त नमुन्याची तपासणी, पिण्याच्या पाण्याची अनुजैविक शास्त्रीय तपासणी, जिवाणूंची तपासणी, जर एखादी रोगाची साथ असेल तर रक्त नमुना विषम ज्वर जिवाणूची तपासणी करण्यात येते. वर्ष २०१३ च्या प्राप्त झालेल्या निधीमध्ये २५३ गावांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे उद्दिष्ट मार्च महिन्यापर्यंत होते. परंतु मे महिना उलटत आला तरी अद्यापही १६९ गावांतील योजना रखडल्या आहेत.