शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

जिल्ह्यात युरियाचे ‘शॉर्टेज’ !

By admin | Updated: November 4, 2014 01:37 IST

उस्मानाबाद : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरणी केली.

उस्मानाबाद : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरणी केली. ही पिके वाढीला लागली आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी युरिया खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी करीत आहेत. मात्र दुकानदारांकडून नकारघंटा ऐकायला मिळत आहे. जिल्हाभरात युरियाचे शॉर्टेज निर्माण झाले असताना कृषी विभाग मात्र झोपेत आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे.रबी हंगामासाठी कृषी विभागाकडून ८२ हजार ८०० मे टन इतक्या खताची मागणी करण्यात आली होती. मात्र आजवर ६ हजार ५६६ मे टन खत उपलब्ध झाले आहे. अत्यल्प पावसामुळे अनेक तालुक्यात सध्या पेरणीलाही सुरुवात झाली नाही. तर काही भागामध्ये बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. या परिस्थितीमुळे डीएपी, एमओपी, एनपीके अशा खतांना फारशी मागणी नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी पाणी देवून पिके जोपासत आहेत. पिकांची वाढ चांगल्याप्रकारे व्हावी, यासाठी युरियाची गरज असते. मात्र जिल्ह्यात युरियाच उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आजवर अवघा ९६२ मे. टन एवढाच युरिया उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी जेरीस आला असताना दुसरीकडे कृषी विभागाचे दूर्लक्षित धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे.शेतकऱ्यांच्या तक्रारी येवू लागल्यानंतर प्रस्तूत प्रतिनिधीने कृषी विभागात जावून जबाबदार अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्यांनाही नेमकं जिल्ह्यात चालले काय? याची खबरबात नव्हती. जिल्ह्यात किती मे. टन युरिया आला आहे याचीही साधी माहिती मोहीम अधिकाऱ्याकडे नव्हती. शेतकरी युरियासाठी दुकानदाराचे उंबरठे झिजवत असतानाही कृषी विभागाला याचे काहीच सोयरसुतक नाही हेच या प्रकारातून दिसून येत आहे. जिल्हा परिषद कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षित धोरणांबाबत शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)