शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

जिल्ह्यात युरियाचे ‘शॉर्टेज’ !

By admin | Updated: November 4, 2014 01:37 IST

उस्मानाबाद : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरणी केली.

उस्मानाबाद : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरणी केली. ही पिके वाढीला लागली आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी युरिया खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी करीत आहेत. मात्र दुकानदारांकडून नकारघंटा ऐकायला मिळत आहे. जिल्हाभरात युरियाचे शॉर्टेज निर्माण झाले असताना कृषी विभाग मात्र झोपेत आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे.रबी हंगामासाठी कृषी विभागाकडून ८२ हजार ८०० मे टन इतक्या खताची मागणी करण्यात आली होती. मात्र आजवर ६ हजार ५६६ मे टन खत उपलब्ध झाले आहे. अत्यल्प पावसामुळे अनेक तालुक्यात सध्या पेरणीलाही सुरुवात झाली नाही. तर काही भागामध्ये बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. या परिस्थितीमुळे डीएपी, एमओपी, एनपीके अशा खतांना फारशी मागणी नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी पाणी देवून पिके जोपासत आहेत. पिकांची वाढ चांगल्याप्रकारे व्हावी, यासाठी युरियाची गरज असते. मात्र जिल्ह्यात युरियाच उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आजवर अवघा ९६२ मे. टन एवढाच युरिया उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी जेरीस आला असताना दुसरीकडे कृषी विभागाचे दूर्लक्षित धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे.शेतकऱ्यांच्या तक्रारी येवू लागल्यानंतर प्रस्तूत प्रतिनिधीने कृषी विभागात जावून जबाबदार अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्यांनाही नेमकं जिल्ह्यात चालले काय? याची खबरबात नव्हती. जिल्ह्यात किती मे. टन युरिया आला आहे याचीही साधी माहिती मोहीम अधिकाऱ्याकडे नव्हती. शेतकरी युरियासाठी दुकानदाराचे उंबरठे झिजवत असतानाही कृषी विभागाला याचे काहीच सोयरसुतक नाही हेच या प्रकारातून दिसून येत आहे. जिल्हा परिषद कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षित धोरणांबाबत शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)