शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जिल्ह्यात युरियाचे ‘शॉर्टेज’ !

By admin | Updated: November 4, 2014 01:37 IST

उस्मानाबाद : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरणी केली.

उस्मानाबाद : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरणी केली. ही पिके वाढीला लागली आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी युरिया खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी करीत आहेत. मात्र दुकानदारांकडून नकारघंटा ऐकायला मिळत आहे. जिल्हाभरात युरियाचे शॉर्टेज निर्माण झाले असताना कृषी विभाग मात्र झोपेत आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे.रबी हंगामासाठी कृषी विभागाकडून ८२ हजार ८०० मे टन इतक्या खताची मागणी करण्यात आली होती. मात्र आजवर ६ हजार ५६६ मे टन खत उपलब्ध झाले आहे. अत्यल्प पावसामुळे अनेक तालुक्यात सध्या पेरणीलाही सुरुवात झाली नाही. तर काही भागामध्ये बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. या परिस्थितीमुळे डीएपी, एमओपी, एनपीके अशा खतांना फारशी मागणी नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी पाणी देवून पिके जोपासत आहेत. पिकांची वाढ चांगल्याप्रकारे व्हावी, यासाठी युरियाची गरज असते. मात्र जिल्ह्यात युरियाच उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आजवर अवघा ९६२ मे. टन एवढाच युरिया उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी जेरीस आला असताना दुसरीकडे कृषी विभागाचे दूर्लक्षित धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे.शेतकऱ्यांच्या तक्रारी येवू लागल्यानंतर प्रस्तूत प्रतिनिधीने कृषी विभागात जावून जबाबदार अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्यांनाही नेमकं जिल्ह्यात चालले काय? याची खबरबात नव्हती. जिल्ह्यात किती मे. टन युरिया आला आहे याचीही साधी माहिती मोहीम अधिकाऱ्याकडे नव्हती. शेतकरी युरियासाठी दुकानदाराचे उंबरठे झिजवत असतानाही कृषी विभागाला याचे काहीच सोयरसुतक नाही हेच या प्रकारातून दिसून येत आहे. जिल्हा परिषद कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षित धोरणांबाबत शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)