शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत उर्दू हायस्कूल संघ अजिंक्य

By admin | Updated: September 6, 2015 23:54 IST

जालना : जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित स्व. किसनसेठ गोरंट्याल चषक आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत उर्दू हायस्कुलचा संघ विजेता तर सेंट जॉन्स इंग्लिश स्कूलचा संघ उपविजेता ठरला.

जालना : जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित स्व. किसनसेठ गोरंट्याल चषक आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत उर्दू हायस्कुलचा संघ विजेता तर सेंट जॉन्स इंग्लिश स्कूलचा संघ उपविजेता ठरला.येथील आझाद मैदानावर १ सप्टेंबरपासून आयोजित या स्पर्धेत १६ शाळांच्या संघानी सहभाग नोंदविला होता. अंतिम सामना रविवारी उर्दू हायस्कूल व सेंट जॉन्स इंग्लिश स्कूल यांच्यात झाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी १- १ गोलची बरोबरी साधल्याने टायब्रेकर पद्धतीने सामन्याचा निर्णय घेण्यात आला. यात ३ विरूद्ध १ गोलने उर्दू हायस्कूलचा संघ विजयी ठरला.विजयी संघाना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष शाह आलम खान, एकबाल पाशा, डॉ. जे. ए. किर्तीशाही, विवेक निर्मल, हरेश तलरेजा, रमशे शेळके, विष्णू वाघमारे, विनोद यादव, राज स्वामी, रवींद्र बांगड उपस्थित होते. यावेळी गोरंट्याल म्हणाले की, जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने दरवर्षी खेळाडूंसाठी स्पर्धा घेतल्या जाते. जालन्यातील खेळाडूंना वाव मिळावा म्हणून लवकरच चांगल्या खेळाडूंची टीम तयार करून आयपीलच्या धर्तीवर फुटबॉल स्पर्धा घेण्याचा मानस व्यक्त केला. तसेच प्रत्येक खेळाडूंचे स्वप्न असते की चांगल्या मोठ्या स्पर्धेत नाव कमवावे. त्यामुळेच फुटबॉल साठी प्रसिद्ध असलेली संतोष ट्राफी जालन्यात आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गोरंट्याल यांनी यावेळी सांगितले.एकबाल पाशा म्हणाले की, जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात विविध स्पर्धा आयोजित करून क्रीडा क्षेत्रात तसेच शहराच्या विकासातही त्यांनी मोठे योगदान दिले. आज मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे लातूर सारख्या जिल्ह्यात रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. गोरंट्याल यांनी पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करून शहराचा पाणी प्रश्न सोडविला. नसता जालन्यावरही तशीच वेळ आली असती. जालन्यातील जनतेकडून मोठी चुक झाली. मात्र ती जालनेकर भरून काढतील असे सांगून आगामी सणउत्सव सर्व धार्मिय बांधवांनी शातंतेत व एकत्रित साजरे करून एकतेचा संदेश द्यावा, असे आवाहन केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच शेख जावेद, मोहमंद अकबर, शोकत पठाण, सुनील हस्तक, रमेश शेळके, राजेंद्र वाघमारे, शिवाजी धोत्रे, मोहमंद मुस्ताक, प्रभूदास ठाकुर, इम्रान सिद्धीकी, सचिन जैस्वाल, श्याम परदेशी आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)