शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

सावंत यांच्याच नेतृत्त्वाखाली आगामी निवडणुका...

By admin | Updated: May 18, 2017 00:04 IST

उस्मानाबाद : २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची मोर्चेबांधणी शिवसेनेने सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची मोर्चेबांधणी शिवसेनेने सुरू केली आहे. उपनेते आ. प्रा. तानाजी सावंत यांच्या खांद्यावर आता सोलापूरसह उस्मानाबादच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी टाकल्याने आगामी काळात होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकाही प्रा. सावंत यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेना लढणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.मागील काही महिन्यांपासून शिवसेना अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाने पोखरून गेलेली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी सावंत यांच्याकडे सुत्रे सोपविली; मात्र पक्ष वाढविण्यासाठी घेतलेला हा निर्णय शिवसैनिकांनीच उधळून लावल्याचे मागील पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आले होते. त्यानंतर जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडे राहणार हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शिवसेना पक्षश्रेष्ठींनी सावंत यांच्याकडे जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवून जिल्हा शिवसेना सावंत यांच्याच नेतृत्वाखाली कार्यरत राहील, असा संदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेनेची नव्याने पुनर्बांधणी करण्याचे आव्हान प्रा. सावंत यांच्यासमोर आहे. आ. प्रा. सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढल्या. मात्र या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. ऐन निवडणूक काळात सेनेच्याच अनेकांनी बंडाचा झेंडा उगारल्याने अपयश पदरी पडले. उस्मानाबाद पालिकेत शिवसेना नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला असला तरी या विजयामध्ये शिवसेनेपेक्षा मकरंद राजेनिंबाळकर यांची वैयक्तिक प्रतिमाच अधिक सरस ठरल्याचे विरोधकही मान्य करतात. पालिका निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेला दारूण पराभव पत्करावा लागला. या दोन्ही पराभवानंतर जिल्ह्यात शिवसेनेचे पुढे काय? असा प्रश्न उभा ठाकला असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा सावंत यांच्या नेतृत्वावरच विश्वास दर्शविला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी दीड-दोन वर्षांच्या उरलेल्या कालावधीत शिवसेनेचे गावपातळीपासून जिल्हा स्तरापर्यंतचे नेटवर्क नव्याने मजबूत करण्याचे आवाहन सावंत यांच्यापुढे उभे आहे.