शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

ग्रामीण कोरोनाग्रस्त शहरात पोहोचेपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:04 IST

ऑक्सिजनची पातळी ९० वरून ६० वर यंत्रणा अपुरी : रुग्ण वाचणार कसा?, ग्रामीण भागातील यंत्रणा सक्षम करण्याची तज्ज्ञांची ...

ऑक्सिजनची पातळी ९० वरून ६० वर

यंत्रणा अपुरी : रुग्ण वाचणार कसा?, ग्रामीण भागातील यंत्रणा सक्षम करण्याची तज्ज्ञांची अपेक्षा

औरंगाबाद : जिल्ह्यातील एखाद्या खेड्यात एखाद्यास कोरोनाचे निदान झाले आणि त्याला ऑक्सिजनची गरज भासली, तर अनेक कि.मी. अंतर प्रवास करून शहर गाठावे लागत आहे. अशावेळी अनेक रुग्णांची ऑक्सिजनची पातळी ९० वरून ६० वर येते. अनेक रुग्ण रुग्णालयासमोर रुग्णवाहिकेत असतात आणि त्यांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मग रुग्ण वाचणार कसा? त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनावरील उपचाराची सुविधा वाढविण्याची गरज असल्याची अपेक्षा फिजिशियन असोसिएशनने व्यक्त केली.

जिल्ह्यात शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात बुधवारी उच्चांकी ९४७ रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातील एकूण सक्रिय म्हणजे उपचार घेणाऱ्या १५ हजार ८०२ रुग्णांपैकी तब्बल ४५ टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना सरळ शहरात रेफर केले जात असल्याची परिस्थिती आहे. रेफर करताना शहरात बेड उपलब्ध होईल की नाही, याचा कोणताही विचार केला जात नाही. ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णाची प्रकृती शहर गाठेपर्यंत आणखी खालावते. त्यानंतर रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले तरी फारसा उपयोग होत नाही. केंद्रीय पथकानेही ग्रामीण भागातून रेफर होणाऱ्या रुग्णांच्या परिस्थितीवर बोट ठेवले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तेथेच उपचार मिळेल, अशी व्यवस्था उभी करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.

-----

ग्रामीण भागात असे वाढले सक्रिय रुग्ण...

८ एप्रिल- ५,९३५

९ एप्रिल- ५,८७२

१० एप्रिल- ६,३४०

११ एप्रिल- ६,३५२

१२ एप्रिल- ६,५६४

१३ एप्रिल- ६,५७९

१४ एप्रिल- ७,१२६

---

ग्रामीण भागात जम्बो सेंटर उभे करावे

ऑक्सिजनची पातळी ९० असताना खेड्यातील रुग्ण शहरात येतात. इथे येईपर्यंत ऑक्सिजनची पातळी ६० वर येते. मग रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवूनही उपयोग होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तेथेच उपचार मिळायला पाहिजेत. जम्बो सेंटर उभे करून त्यांना उपचाराची सुविधा दिली पाहिजे.

- डॉ. संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशियन असोसिएशन