शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

सुविधांबाबत हलगर्जीपणा

By admin | Updated: June 29, 2014 01:06 IST

औरंगाबाद : शहरात चार दिवसांपूर्वी खासगी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (आयसीयू) शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाला.

औरंगाबाद : शहरात चार दिवसांपूर्वी खासगी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (आयसीयू) शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे दोन रुग्णांना इतरत्र हलवावे लागले. या गोंधळामुळे रुग्ण दगावल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे येथील सरकारी तसेच खासगी हॉस्पिटल्समधील आयसीयूमध्ये असणाऱ्या यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयसीयूमधील यंत्रणांची महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाहणी केली जात नसल्याचेही यानिमित्त समोर आले आहे. आयसीयूमधील विजेची पर्यायी व्यवस्था, व्हेंटिलेटर, एसी आदींबाबतचा निष्काळजीपणा रुग्णांचे जीवित धोक्यात आणू शकतो.हृदयाशी संबंधित विकारांवर सुलभ उपचारासाठी तसेच अत्यवस्थ आणि श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी कृत्रिम श्वासोच्छ्वास मिळावा म्हणून आयसीयू विभाग महत्त्वाचा ठरतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा कोणताही परिणाम हॉस्पिटलमधील आयसीयू विभागावर होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा असणे आवश्यक आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास आयसीयूमधील सुविधा बंद पडून धोका होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे आयसीयूसाठी स्वतंत्र जनरेटरची व्यवस्था आवश्यक असते. आयसीयूची सुविधा असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये विजेची पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची व्यवस्था केली जाते. परंतु शॉर्टसर्किटमुळे झालेल्या घटनेनंतर आयसीयूमधील विजेची पर्यायी व्यवस्था, व्हेंटिलेटर आदी सुविधांबाबत हॉस्पिटलकडून कितपत काळजी घेतली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विविध सुविधा हव्यातआयसीयूमध्ये व्हेंटिलेटर, मॉनिटर, ब्लड गॅस मशीन, पॅथॉलॉजी बॅकअप, एसी, ट्रेन नर्सिंग स्टाफ, हाताने पंपिंग करून रुग्णाला आॅक्सिजन देणारी यंत्रणा, जनरेटर, जंतू संसर्ग होऊ न देणारी यंत्रणा आदी सुविधांची आवश्यकता असते.५० हॉस्पिटलमध्ये आयसीयू सुविधाशहरातील जवळपास ५० हॉस्पिटलमध्ये आयसीयूची सुविधा आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू स्डँडर्ड नॉर्मनुसार आहे; परंतु काही हॉस्पिटलमधील आयसीयू तसे नसल्याचे मत मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.सुविधा महत्त्वाच्याआयसीयूमध्ये आॅक्सिजनचा पुरवठा, एसी, पोल्युशन फ्री वातावरण आदी महत्त्वाचे ठरते. नवीन व्हेंटिलेटर वीजपुरवठा खंडित झाल्यावरही बंद पडत नसल्याचे डॉ. शेख मुर्तुजा यांनी सांगितले.आयसीयूंची लवकरच तपासणीआयसीयूचे स्टँडर्ड नॉर्म आहेत. या नॉर्मनुसार आयसीयू असायला पाहिजेत. परंतु शहरातील अनेक आयसीयू या नॉर्मनुसार नाहीत. काही आयसीयूबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच शहरातील आयसीयूंची तपासणी केली जाणार आहे, असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी म्हटले.