शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

विद्यापीठातील ‘ऑक्सिजन हब’ संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:05 IST

औरंगाबाद : विद्यापीठ परिसरात विविध प्रजातीचे सुमारे ४० हजार झाडे असून त्यामुळेच या परिसराला ‘ऑक्सिजन हब’ म्हणून ओळखले जाते. ...

औरंगाबाद : विद्यापीठ परिसरात विविध प्रजातीचे सुमारे ४० हजार झाडे असून त्यामुळेच या परिसराला ‘ऑक्सिजन हब’ म्हणून ओळखले जाते. मात्र, अलीकडे उन्हाळ्यामध्ये काही वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असून वनराई जिवंत ठेवण्यासाठी तलाव, बारव व विहिरींच्या पुनर्भरणाचा उपक्रम हाती घेण्याच्या हालचाली विद्यापीठ प्रशासनाने सुरु केल्या आहेत.यासंदर्भात गेल्या आठवड्यात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी संपूर्ण विद्यापीठ परिसरात फेरफटका मारुन झाडे, तसेच जलस्त्रोतांची पाहणी केली. विद्यापीठात ४५ बारव व विहिरी आहेत. गाळामुळे त्यांचे झरे बंद झाले आहेत. पावसाळ्यात जमा झालेले पाणी अल्पावधीतच आटून जाते. परिसरातील तलाव, बारव, विहिरींच्या पुनर्भरणाकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी स्थावर विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून पावसाळ्यापूर्वी पुनर्भरणाचा उपक्रम राबविण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

तत्कालीन कुलसचिव डॉ. मानवेंद्र काचोळे यांनी विद्यापीठ परिसरातील विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला; पण त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यानंतर सन २०१७-१८ मध्ये विद्यापीठातील वसतिगृहे व उद्याने, झाडांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. झाडांसाठी टँकरने पाणी विकत घेऊन देण्याची वेळ विद्यापीठावर आली होती. मागील वर्षापासून कोविडमुळे वसतिगृहे बंद असल्यामुळे सांडपाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र, ती पुढील काळात जाणवू शकते, हे गृहित धरुन पुढील काळात विद्यापीठ परिसर पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.

चौकट.....

कचरा, प्लास्टिकचा खच

सोमवारी सेवानिवृत्त झालेले विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक डॉ. गोविंद हुंबे यांनी सांगितले की, विद्यापीठ परिसरात मागील ३० वर्षांपूर्वी अवघे ४ उद्याने व २० कुंड्या होत्या. सध्या दीडशे एकर क्षेत्रावर ७ हजार २१५ विविध फळझाडे असून यासह संपूर्ण परिसरात सुमारे ४० हजार वृक्ष आणि ३५ उद्याने बहरली आहेत. त्यामुळेच हा परिसर ‘ऑक्सिजन हब’ म्हणून ओळखला जात असून शुद्ध ऑक्सिजन घेण्यासाठी रोज सकाळ- संध्याकाळ शहरातील नागरिक फिरण्यासाठी विद्यापीठात येत आहेत. फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा विद्यापीठ परिसरात न फेकता ‘ऑक्सिजन हब’ सुरक्षित राहील, याची काळजी घेतली पाहिजे.