शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

बांधकामे रखडण्यास विद्यापीठ जबाबदार

By admin | Updated: December 14, 2015 23:58 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही इमारतींची बांधकामे रखडण्यामुळे व आता ती नवीन कंत्राटदारांमार्फत करण्याचे घाटत

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही इमारतींची बांधकामे रखडण्यामुळे व आता ती नवीन कंत्राटदारांमार्फत करण्याचे घाटत असल्याने विद्यापीठाला लाखोंचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. विद्यापीठातील काही विभागांची बांधकामे रखडल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यापीठाच्या बांधकाम विभागातील अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांच्यात चलबिचल झाली. विद्यापीठाच्या बांधकाम समितीची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी सोमवारीच बैठक होती. या बैठकीला कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. या बैठकीतला तपशील मात्र कळू शकला नाही.दरम्यान, मानसशास्त्र विभागाच्या इमारतीच्या बांधकामाची अधिक माहिती घेतली असता या इमारतीचे काम २०११-१२ मध्ये सुरू झाले आहे. चार वर्षांत ही इमारत पूर्ण होऊ शकली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे साडेचार कोटींची निविदा काढत हे बांधकाम सुरू केले. बांधकाम विभागातील सूत्रांनी माहिती दिल्यानुसार विद्यापीठाच्या कुलसचिवांनी ७ आॅगस्ट २०१५ रोजी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन इमारतीचे बांधकाम थांबविण्याची विनंती केली. त्यानुसार बांधकाम विभागाने कंत्राटदाराला खंड १५ अंतर्गत नोटीस बजावली. त्यामुळे काम पुढे जाऊ शकले नाही. विद्यापीठाने या इमारतीचे बांधकाम सुरुवातीला गोगाबाबा टेकडीच्या खाली करण्याचे योजले होते. त्यानंतर ते सध्या असलेल्या जागी सुरू करण्यात आले. इमारतीचे बजेट वाढले. दोन कोटी रुपयांपेक्षाही अधिक किमतीचे बांधकाम वाढले. यामुळे हे बांधकाम रखडले आहे. आता हे वाढीव काम विद्यापीठ स्वत: करणार असून ते दुसऱ्या कंत्राटदारामार्फत पूर्ण केले जाण्याचा घाट आहे. मात्र २०११ रोजी काढलेल्या निविदेतील दर आणि नव्याने काढण्यात येणारा दर यामध्ये मोठे अंतर असणार आहे. यामुळे विद्यापीठावर पन्नास लाखांहून अधिक आर्थिक बोजा पडणार आहे.विद्यार्थ्यांच्या फी आणि इतर मार्गाने जमा होणारा पैसा असा वाया जाणार आहे. बांधकाम विभागाची तांत्रिक माहिती ही कुलगुरू किंवा कुलसचिवांना कळत नाही, त्यामुळे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून त्यांची दिशाभूल केली जाते. विद्यापीठाच्या बांधकाम समितीवर यापूर्वी असणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनीही बांधकामे मलिदा खाण्याचा मार्ग असल्याचे ओळखून इमारतींच्या प्रगतीसंबंधी हालचाल केली नाही. शिक्षणशास्त्र, विधि आणि डिजिटल स्टुडिओची कामेही रखडली आहेत.