शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

विद्यापीठ अधिकाऱ्याचे मत फुटल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:06 IST

औरंगाबाद : कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सादर केलेल्या निवृत्त न्यायाधीश बोरा समितीचा अहवाल मान्य नसल्याच्या बाजूने विद्यापीठाच्या एका ...

औरंगाबाद : कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सादर केलेल्या निवृत्त न्यायाधीश बोरा समितीचा अहवाल मान्य नसल्याच्या

बाजूने विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने मतदान केल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.

विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात फुटलेला तो अधिकारी कोण, याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. कुलगुरू डॉ. येवले यांच्या अध्यक्षतेखालील सक्षम निवड समितीने सात संवैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यापैकी तीन संवैधानिक अधिकाऱ्यांच्या मूळ नियुक्तीवरच आक्षेप घेणाऱ्या तक्रारीसंबंधी व्यवस्थापन परिषदेने निवृत्त न्यायाधीश बोरा यांची एक सदस्यीय समिती नेमली होती. आज तातडीने आयोजित करण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेसमोर कुलगुरूंनी बोरा समितीचा अहवाल मान्यतेस्तव सादर केला. तो संजय निंबाळकर, डॉ. राजेश करपे व अन्य सदस्यांनी फेटाळून लावला. अहवाल मान्य करायचा की, नाही यावर मतदान झाले.

सभागृहात कुलगुरू, प्र-कुलगुरू, दोन अधिष्ठाता, विभागप्रमुखांमधून कुलगुरू नियुक्त एक सदस्य आणि अहवालाच्या बाजूने भूमिका मांडणारे दोन असे एकूण सात सदस्य, तर अहवाल अमान्य करणारे सहा सदस्य उपस्थित होते. असे असताना अहवाल अमान्य करण्याच्या बाजूने सात मतदान झाले. मतदानाच्या वेळी फुटलेला प्रशासनाचा तो अधिकारी कोण, याची आज दिवसभर विद्यापीठ वर्तुळात चर्चा होती.

दरम्यान, डॉ. राजेश करपे यांना ही जादू कशी केली, याबद्दल विचारले असता ते म्हणाले, फुटलेला अधिकारी कोण, याबद्दल

सांगता येणार नाही; पण अहवालातील संवैधानिक अधिकाऱ्याबद्दल उट्टे काढणाऱ्या अधिकाऱ्याने आमच्या बाजूने मतदान

केलेले असावे. पुढील बैठकीत या संवैधानिक अधिकाऱ्यांबद्दल चौकशी करण्यासाठी विद्यापीठ कायद्याची जाण असलेले निवृत्त कुलगुरू, कुलसचिव अथवा प्र-कुलगुरूंची समिती नेमण्यासाठी आम्ही आग्रह धरणार आहोत.

चौकट.....

माजी कुलगुरू निमसेंच्या नावासाठी आग्रह

पुढील बैठकीत या प्रकरणातील तथ्य शोधण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांची वर्णी लावण्याची चर्चा विद्यापीठ विश्रामगृहात सदस्यांनी केली असली तरी एकाच प्रकरणात दोन - दोन समित्या नेमल्या जाऊ शकतात का, हा कायदेशीर पेच कसा सोडविणार, हाही चर्चेचा विषय आहे.