शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ अधिकाऱ्याचे मत फुटल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:06 IST

औरंगाबाद : कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सादर केलेल्या निवृत्त न्यायाधीश बोरा समितीचा अहवाल मान्य नसल्याच्या बाजूने विद्यापीठाच्या एका ...

औरंगाबाद : कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सादर केलेल्या निवृत्त न्यायाधीश बोरा समितीचा अहवाल मान्य नसल्याच्या

बाजूने विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने मतदान केल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.

विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात फुटलेला तो अधिकारी कोण, याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. कुलगुरू डॉ. येवले यांच्या अध्यक्षतेखालील सक्षम निवड समितीने सात संवैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यापैकी तीन संवैधानिक अधिकाऱ्यांच्या मूळ नियुक्तीवरच आक्षेप घेणाऱ्या तक्रारीसंबंधी व्यवस्थापन परिषदेने निवृत्त न्यायाधीश बोरा यांची एक सदस्यीय समिती नेमली होती. आज तातडीने आयोजित करण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेसमोर कुलगुरूंनी बोरा समितीचा अहवाल मान्यतेस्तव सादर केला. तो संजय निंबाळकर, डॉ. राजेश करपे व अन्य सदस्यांनी फेटाळून लावला. अहवाल मान्य करायचा की, नाही यावर मतदान झाले.

सभागृहात कुलगुरू, प्र-कुलगुरू, दोन अधिष्ठाता, विभागप्रमुखांमधून कुलगुरू नियुक्त एक सदस्य आणि अहवालाच्या बाजूने भूमिका मांडणारे दोन असे एकूण सात सदस्य, तर अहवाल अमान्य करणारे सहा सदस्य उपस्थित होते. असे असताना अहवाल अमान्य करण्याच्या बाजूने सात मतदान झाले. मतदानाच्या वेळी फुटलेला प्रशासनाचा तो अधिकारी कोण, याची आज दिवसभर विद्यापीठ वर्तुळात चर्चा होती.

दरम्यान, डॉ. राजेश करपे यांना ही जादू कशी केली, याबद्दल विचारले असता ते म्हणाले, फुटलेला अधिकारी कोण, याबद्दल

सांगता येणार नाही; पण अहवालातील संवैधानिक अधिकाऱ्याबद्दल उट्टे काढणाऱ्या अधिकाऱ्याने आमच्या बाजूने मतदान

केलेले असावे. पुढील बैठकीत या संवैधानिक अधिकाऱ्यांबद्दल चौकशी करण्यासाठी विद्यापीठ कायद्याची जाण असलेले निवृत्त कुलगुरू, कुलसचिव अथवा प्र-कुलगुरूंची समिती नेमण्यासाठी आम्ही आग्रह धरणार आहोत.

चौकट.....

माजी कुलगुरू निमसेंच्या नावासाठी आग्रह

पुढील बैठकीत या प्रकरणातील तथ्य शोधण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांची वर्णी लावण्याची चर्चा विद्यापीठ विश्रामगृहात सदस्यांनी केली असली तरी एकाच प्रकरणात दोन - दोन समित्या नेमल्या जाऊ शकतात का, हा कायदेशीर पेच कसा सोडविणार, हाही चर्चेचा विषय आहे.