शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

लाँग मार्चमुळे नामांतराचा प्रश्न देशभरात; स्वाभिमान जागा झाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 18:51 IST

लढा नामविस्ताराचा : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून प्रेरणा घेऊन मी नामांतरासाठी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी लाँग मार्च काढला. त्यामुळे सारे समाजमन ढवळून निघाले. नामांतराचा प्रश्न देशभरात गेला आणि दलित, बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या मनात स्वाभिमान जागा झाला. 

- स. सो. खंडाळकर

नामांतराचा लढा हा कुठल्या भौतिक स्वार्थासाठी नव्हता तर तो लोकशाहीच्या इभ्रतीचा लढा होता. १६ वर्षांच्या संघर्षानंतर हा लढा यशस्वी झाला. लोकशाहीचा विजय झाला, असे मी मानतो’ असे लाँग मार्चचे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. विद्यापीठ नामांतर रौप्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लोकमतशी बोलत होते. प्रा.कवाडे हे आज महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. 

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. ‘लाँग मार्चचे प्रणेते, कट्टर नामांतरवादी नेते’ अशीच त्यांची आजही ओळख आहे. जहाल भाषणांमुळे त्याकाळी ते अत्यंत लोकप्रिय ठरले होते. महाराष्ट्रातील तत्कालीन ३३ जिल्ह्यांपैकी प्रा.कवाडे यांच्यावर २० जिल्ह्यांमध्ये प्रवेश व भाषणबंदी होती. तर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त रिबेरो यांनी त्यांच्यावर सहा महिने मुंबईत प्रवेशबंदी घातली होती. 

२७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा ठराव  विधानसभेत मंजूर झाला आणि त्याची बातमी जशी पसरली, तसा मराठवाड्यात उद्रेक सुरू झाला. बौद्ध, दलित जनतेच्या वस्त्यांवर हल्ले सुरू झाले. जाळपोळ सुरू झाली. पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे यांना ठार करण्यात आले. पण शासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. दलितांचे संरक्षण केले नाही म्हणून मी नागपुरात पहिला मोर्चा काढला. मोर्चाहून लोक परत जात होते, तेव्हा नागपूरच्या इंदोरा भागात पोलिसांनी गोळीबार केला. त्यात ११ भीमसैनिक ठार झाले, अशी माहिती देऊन कवाडे यांनी सांगितले की, पुढे महाराष्ट्र राज्य मराठवाडा विद्यापीठ नामांतर कृती समिती स्थापन करून नामांतराच्या मुद्यावरून सुरूअसलेला अन्याय मी जगाच्या व देशाच्या लक्षात आणून देण्याचा निर्णय घेतला आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरून लाँग मार्च सुरू झाला. 

२८ नोव्हेंबर १९७९ रोजी सिंदखेडराजाजवळ राहेरी गावात हा लाँग मार्च अडवण्यात आला. पोलिसांनी या गावाला वेढा घातला. रात्री ११ वा. लाठीहल्ला सुरू करण्यात आला आणि भीमसैनिकांना ताब्यात घेऊन राज्यातील विविध तुरुंगांमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. मला अमरावतीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांनी छळले नसेल, त्याहीपेक्षा जास्त त्रास मला देण्यात आला. 

औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेशबंदी असतानाही प्रा. जोगेंद्र कवाडे सभा घेऊन निघून जातात, याचा राग मनात धरून कश्यप हे पोलीस आयुक्त  असताना नागसेनवनात दलित मुक्ती सेनेचे अधिवेशन सुरू असताना माझ्यावर असाच लाठीहल्ला करण्यात आला. त्याच्या जखमा मनामनातून अद्यापही मिटल्या नाहीत. मानवी मूल्यांसाठी आम्ही हा लढा लढला. शिवबा, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेचा हा लढा होता. त्यात विजय झाला, याचा आनंद आहे. नामांतर लढ्यात भीमसैनिकांनी जी कुर्बानी दिली त्याला इतिहासात तोड नाही. जगाच्या इतिहासात ही अभूतपूर्व घटना होय, अशी प्रतिक्रिया कवाडे यांनी नोंदविली. 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनJogendra kawadeजोगेंद्र कवाडेDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद