शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

विद्यापीठात करता येईल बारावीनंतर थेट एम. टेक.

By admin | Updated: July 19, 2014 01:22 IST

औरंगाबाद : शहराची औद्योगिक पार्श्वभूमी बघता संशोधनाच्या माध्यमातून उद्योजक निर्माण करण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतली आहे.

औरंगाबाद : शहराची औद्योगिक पार्श्वभूमी बघता संशोधनाच्या माध्यमातून उद्योजक निर्माण करण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतली आहे. त्याअनुषंगाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांची भेट घेऊन या विद्यापीठातील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (निलिट) या संस्थेत १२ वीनंतर थेट एम.एस्सी. व एम. टेक हा संशोधनात्मक अभ्यासक्रम सुरू करण्याविषयी चर्चा केली. दरम्यान, लवकरच एका तज्ज्ञ समितीमार्फत यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून तो माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयास सादर केला जाईल. साधारणपणे आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न असतील, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सांगितले. या आठवड्यात दिल्ली येथे देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (निलिट) औरंगाबाद, चेन्नई, हैदराबाद व बंगळुरू या चार केंद्रांची बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाच्या ‘आयआयटी’चे संचालकही उपस्थित होते. देशभरातील ‘निलिट’पैकी औरंगाबादेतील संस्थेचे कार्य सर्वोत्कृष्ट असल्याचा अभिप्राय कुलगुरू डॉ. चोपडे यांनी व्यक्त केला. डॉ. चोपडे म्हणाले की, औरंगाबादेतील वाढते औद्योगिकरण व संभाव्य डीएमआयसीचे प्रकल्प बघता येथे दर्जेदार कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज आहे. विद्यापीठामार्फत कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण केली जाऊ शकते. त्यासाठी निलिट या संस्थेत सामायिक प्रवेशपूर्व परीक्षेच्या माध्यमातून बारावीनंतर थेट ५ वर्षांची एम.एस्सी., व त्यानंतर १ वर्षाचे एम. टेक. हा संशोधनात्मक अभ्यासक्रम शिकविला जाईल. ५० टक्के संशोधन व ५० टक्के अध्ययन यांचा समन्वय साधून संशोधक निर्माण केले जातील. त्यासाठी विद्यापीठात आवश्यक त्या सोयी- सुविधा आहेत.