शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

अघोषित लोडशेडिंगने शहरवासीय त्रस्त

By admin | Updated: January 2, 2015 00:51 IST

औरंगाबाद : महावितरणने शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतल्यापासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दररोज विविध भागांतील शेकडो कुटुंबांना रात्र अंधारात काढावी लागत आहे.

औरंगाबाद : महावितरणने शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतल्यापासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दररोज विविध भागांतील शेकडो कुटुंबांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. महावितरणच्या या कारभाराविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.महावितरणने ताबा घेतल्यापासून दररोज कोणत्या ना-कोणत्या भागात तीन-चार तास वीजपुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे शहरात अघोषित लोडशेडिंग सुरू केली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुरुस्ती, विद्युत तारेला लागून असणाऱ्या झाडांची कापणी करणे, अचानक निर्माण झालेले प्रश्न इ. कारणांमुळे अनेक भागांचा तीन-चार तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन दिवस सातारा परिसर, मुकुंदवाडी, जय भवानीनगर, पुंडलिकनगर, सिडको एन-२,३,४, रेल्वेस्टेशन, सूतगिरणी, शिवाजीनगर या परिसरातील वीजपुरवठा खंडित होता. जीटीएलकडून महावितरणने १५ नोव्हेंबर रोजी शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतला. त्यानंतर ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यासाठी ज्युबिली पार्क कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. कक्षात रोज जवळपास शंभर तक्रारी येतात. शहरातील विविध भागांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याचे तक्रारींच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. नियंत्रण कक्षात संपर्क साधल्यानंतरही लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत होत नाही, अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे कंपनीच्या कारभाराविषयी ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.