शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

‘भूमिगत’ योजनेचा कंत्राटदार भूमिगत

By admin | Updated: July 1, 2014 01:07 IST

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेचा कंत्राटदार दोन महिन्यांपासून भूमिगत झाला आहे. २९ एप्रिल रोजी घाईघाईने माजी सभापती नारायण कुचे यांनी ४६४ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली.

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेचा कंत्राटदार दोन महिन्यांपासून भूमिगत झाला आहे. २९ एप्रिल रोजी घाईघाईने माजी सभापती नारायण कुचे यांनी ४६४ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. २९ जून रोजी निविदा मंजुरीला दोन महिने झाले आहेत. अजून खिल्लारी इन्फ्रा प्रा.लि. व घारपुरे इंजि. अँड कन्स्ट्रक्शन प्रा.लि. ही कंपनी ईएमडी (अर्नेस्ट मनी डिपॉझिट) भरण्यासाठी पुढे आलेली नाही. आॅगस्टमध्ये येणाऱ्या नवीन डीएसआरनुसार योजना महागण्याचा मुद्दा पुढे येऊ शकतो. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. तत्पूर्वी, योजनेचा शुभारंभ होणे गरजेचे आहे. अजून प्रशासकीय पातळीवर काहीही हालचाली झालेल्या नाहीत. २८ एप्रिल रोजी ४९० कोटींचे काम ४६४ कोटींत करण्यासाठी वाटाघाटी केल्या. १७ फेबु्रवारीपासून कंत्राटदारासोबत वाटाघाटी सुरू होत्या. योजनेचा खर्च वाढत असल्यामुळे कंत्राटदाराबरोबर केलेल्या वाटाघाटीत सुमारे १२५ कोटी रुपये वाचविल्याचा दावा मनपाने केला. ४६४ कोटींत काम करण्यास कंत्राटदाराने होकार देताच २८ एप्रिल रोजी बैठक झाली. १ महिन्यात योजनेचे काम सुरू होईल, असा दावा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी १ मे रोजी केला होता. या प्रकरणी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. नवीन डीएसआर आॅगस्टमध्ये५० कोटी रुपयांची तरतूद पालिकेला करावी लागणार आहे. वाढीव डीएसआरनुसार शासनाकडून ५० टक्के रक्कम मिळेल. १४५ कोटींचा निधी मिळाला आहे. ११० कोटींनी योजना महागली असली तरी सध्या कर्ज काढण्याची गरज वाटत नाही, असे मनपाचे मत आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार आॅगस्ट २०१४ मध्ये नवीन डीएसआर (जिल्हा दरसूची) येणार आहे. त्यानुसार योजनेचा खर्च वाढू शकतो. मनपा अधिनियमानुसार निविदेला मंजुरी दिल्यानंतर १, २, ३ किंवा ६ महिन्यांपर्यंत वर्कआॅर्डर देण्याची तरतूद आहे. योजना किती मोठी आहे, यावर ते अवलंबून असते. पालिकेने अजून तरी कंत्राटदाराला वर्कआॅर्डर देण्यासाठी व ईएमडीसाठी संपर्क केलेला दिसत नाही. समांतर जलवाहिनीप्रमाणे भूमिगत गटार योजना होऊ नये. निविदेला मंजुरी देऊन २ महिने झाले आहेत. त्यामुळे पालिकेने तातडीने वर्कआॅर्डर देण्यासाठी हालचाली कराव्यात, असे मत नगरसेवक राजू वैद्य यांनी व्यक्त केले.