शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

अघोषित लोडशेडिंग

By admin | Updated: May 22, 2016 00:41 IST

औरंगाबाद : ग्रामीण भागांप्रमाणेच आता शहरातदेखील विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे.

औरंगाबाद : ग्रामीण भागांप्रमाणेच आता शहरातदेखील विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. सलग चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्रीही अनेक भाग अंधारात बुडाले. शहरात आधीच उन्हाच्या पाऱ्याने उचांकी पातळी गाठली आहे. त्यात सतत वीज गुल होत असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, महावितरण कंपनीने मात्र, वीजपुरवठा खंडित होण्यास महापारेषण कंपनीच्या केंद्रांमधील तांत्रिक बिघाडच कारणीभूत असल्याचा खुलासा केला आहे. मागणीपेक्षा विजेची उपलब्धता कमी झाल्यामुळे महावितरण कंपनीने जिल्ह्यात पुन्हा लोडशेडिंग घेण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात पाच दिवसांपासून सरासरी ५ ते ९ तास वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येत आहे. औरंगाबाद शहर मात्र, लोडशेडिंगमुक्त आहे. तरीदेखील चार दिवसांपासून सातत्याने शहरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. सलग १७, १८ आणि १९ मे रोजी रात्रीच्या वेळी शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. बीड बायपास, सातारा, देवळाई, पन्नालालनगर, सूतगिरणी, शिवाजीनगर, गारखेडा, आकाशवाणी, तसेच रोशनगेट, बायजीपुरा, शहागंज यासह निम्मे शहर अंधारात बुडाले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्रीदेखील सातारा, देवळाईसह काही भागांतील वीज वारंवार जात होती. तिन्ही दिवस काही भागांत एक तास तर काही भागांत दोन-दोन तास वीज नव्हती. महापारेषण कंपनी म्हणते...महापारेषण कंपनीचे मुख्य अभियंता जी. टी. मुंडे यांना महावितरण कंपनीच्या दाव्याविषयी विचारणा केली असता, त्यावर मुंडे म्हणाले की, महापारेषण पडेगाव आणि चित्तेगाव येथील केंद्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. परंतु एका केंद्रातील बिघाड हा अवघ्या ४५ मिनिटांत सुरळीत करून महावितरणच्या केंद्राकडील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. तसेच पडेगाव येथील इक्विपमेंट फेल्यूअरही कमीत कमी वेळेत दुरुस्त करण्यात आले. मात्र, इतर काही भागांत महावितरणचे पोल पडले तसेच काही भागांत झाडे तुटून विद्युत वाहिन्यांवर पडली. त्यामुळे सर्वच ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होण्यास महापारेषणचा बिघाड कारणीभूत नाही. महावितरण कंपनी म्हणते... १७ मे रोजी महापारेषणच्या २२० केव्ही चित्तेगाव उपकेंद्रातील आयसीटी- १ व २ चे १३२ केव्ही बी फेज सीटीला आग लागल्यामुळे ट्रीप झाले. त्यामुळे महापारेषणचे १३२ केव्ही सातारा उपकेंद्र बंद पडले. परिणामी बीड बायपास, पन्नालालनगर, सूतगिरणी, शिवाजीनगर, गारखेडा, आकाशवाणी इत्यादी भागांतील वीजपुरवठा बंद पडला. तसेच एमजीएम परिसरातील हर्सू्लवरून निघणाऱ्या ३३ केव्ही सिडको विद्युत वाहिनीवर निलगिरीचे झाड पडले. त्यामुळे रोशनगेट, बायजीपुरा ३३ केव्ही उपकेंद्र बंद पडल्यामुळे शहागंज, रोशनगेट, बायजीपुरा इत्यादी भाग बंद पडला. हा वीजपुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सुरळीत केला. १८ मे रोजी सायंकाळी महापारेषण २२० केव्ही पडेगाव उपकेंद्रातील आर व वाय फेजच्या सीटी जळाल्यामुळे महापारेषण २२० केव्ही सावंगी व १३२ केव्ही हर्सूल व १३२ केव्ही चिकलठाणा हे उपकेंद्र बंद पडले. त्यामुळे भडकलगेट, औरंगपुरा, निराला बाजार, जटवाडा भागातील विद्युत पुरवठा बंद पडला.