शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

प्रशासनाच्या उदासिनतेने असुविधांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:57 IST

रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर परभणी स्थानकावरील असुविधांत आणखीच भर पडली असून, प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन उदासिन असल्याने दिवसेंदिवस रेल्वेच्या समस्या वाढत चालल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर परभणी स्थानकावरील असुविधांत आणखीच भर पडली असून, प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन उदासिन असल्याने दिवसेंदिवस रेल्वेच्या समस्या वाढत चालल्या आहेत़धर्माबाद-मनमाड या मार्गावर परभणी हे रेल्वेचे महत्वाचे स्थानक आहे़ या ठिकाणाहून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात़ सुमारे ८० रेल्वे गाड्यांची वाहतूक असलेल्या या रेल्वे स्थानकाचा महसूलही लाखो रुपयांच्या घरात आहे़ मात्र सुविधा देण्यासाठी प्रशासन कासवगतीचा मार्ग अवलंबत आहे़ रेल्वे विभागाच्या आदर्श स्थानकाच्या यादीत परभणीचा नंबर लागला खरा़ परंतु, विकास कामे संथगतीने सुरू आहेत़ रेल्वे प्रवाशांबरोबरच प्रवासी संघटना सुविधांसाठी ओरड करीत असताना प्रशासन मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही़धर्माबाद ते मनमाड या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे़ या कामातील पहिला टप्पा पाच महिन्यांपूर्वी पूर्ण झाला़ परभणी ते मिरखेल हा दुहेरी रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला़ या मार्गाचे दुहेरीकरण झाल्याने रेल्वे वाहतूक सोयीची होईल, रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक काटेकोर होईल, अशी प्रवाशांची अपेक्षा होती़ परंतु, ती फोल ठरली़ पूर्वीपेक्षाही अडचणीत भर पडली आहे़ मागील पाच महिन्यांपासून एकही रेल्वे गाडी परभणी स्थानकावरून वेळेनुसार धावत नाही़ विशेषत: नांदेडकडून मनमाडकडे जाणाºया गाड्या सातत्याने उशिराने धावत असल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे़ परभणी रेल्वे स्थानकावरून औरंगाबाद, मनमाड, नाशिक आणि मुंबई येथे जाणाºया रेल्वे प्रवाशांची संख्या अधिक आहे़विशेष म्हणजे जिल्ह्याची राजकीय मंडळी मुंबईला जाण्याचे प्रमाणही अधिक आहे़ परंतु, याच प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर नांदेडहून मनमाडकडे जाणाºया सर्व रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर लावल्या जात आहेत़परभणी रेल्वे स्थानकावर एक्सलेटर (सरकत्या शिड्या) नसल्याने प्रवाशांना दादरा चढून प्लॅटफॉर्म गाठावा लागतो़ या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुविधाच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ त्यातच रेल्वे गाड्या अर्धा ते पाऊण तासापर्यंत उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या मन:स्तापात भर पडली आहे़ प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर रेल्वे कोचेसची पोझीशन दाखविणारे फलक नाहीत़ तसेच रेल्वे गाड्यांची माहिती देणारे बोर्डही या ठिकाणी नाहीत़ परिणामी आरक्षण केलेल्या प्रवाशांना कोचचा अंदाजा घेवूनच प्लॅटफॉर्मवर थांबावे लागते़ रेल्वे गाडी आल्यानंतर अनेक वेळा आरक्षणाचा डबा दूर अंतरावर असतो आणि त्यानंतर धावपळ करीत जागा पकडावी लागते़ पाच महिन्यांपासून प्रवाशी या समस्यांना सामोरे जात आहेत़ रेल्वे प्रशासनाने किमान पोझीशन बोर्ड लावले तरी प्रवाशांची सुविधा होवू शकते़ परंतु, प्रशासन मात्र हे साधे कामही करण्यासाठी पुढाकार घेत नाही़रेल्वे दुहेरीकरणानंतर प्रवाशांना या असुविधा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत़ औरंगाबाद-मनमाडकडे जाणाºया प्रवाशांना आपली जागा मिळेपर्यंत धाकधूक असते़ या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेºयांचीही पुरेशी व्यवस्था केली नाही़ परिणामी चोरीच्या घटना वाढत आहेत़ रेल्वे प्रशासनाने या सर्व बाबी लक्षात घेवून त्वरित सुविधा पुरवाव्यात, प्रवाशांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे़