शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या उदासिनतेने असुविधांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:57 IST

रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर परभणी स्थानकावरील असुविधांत आणखीच भर पडली असून, प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन उदासिन असल्याने दिवसेंदिवस रेल्वेच्या समस्या वाढत चालल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर परभणी स्थानकावरील असुविधांत आणखीच भर पडली असून, प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन उदासिन असल्याने दिवसेंदिवस रेल्वेच्या समस्या वाढत चालल्या आहेत़धर्माबाद-मनमाड या मार्गावर परभणी हे रेल्वेचे महत्वाचे स्थानक आहे़ या ठिकाणाहून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात़ सुमारे ८० रेल्वे गाड्यांची वाहतूक असलेल्या या रेल्वे स्थानकाचा महसूलही लाखो रुपयांच्या घरात आहे़ मात्र सुविधा देण्यासाठी प्रशासन कासवगतीचा मार्ग अवलंबत आहे़ रेल्वे विभागाच्या आदर्श स्थानकाच्या यादीत परभणीचा नंबर लागला खरा़ परंतु, विकास कामे संथगतीने सुरू आहेत़ रेल्वे प्रवाशांबरोबरच प्रवासी संघटना सुविधांसाठी ओरड करीत असताना प्रशासन मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही़धर्माबाद ते मनमाड या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे़ या कामातील पहिला टप्पा पाच महिन्यांपूर्वी पूर्ण झाला़ परभणी ते मिरखेल हा दुहेरी रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला़ या मार्गाचे दुहेरीकरण झाल्याने रेल्वे वाहतूक सोयीची होईल, रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक काटेकोर होईल, अशी प्रवाशांची अपेक्षा होती़ परंतु, ती फोल ठरली़ पूर्वीपेक्षाही अडचणीत भर पडली आहे़ मागील पाच महिन्यांपासून एकही रेल्वे गाडी परभणी स्थानकावरून वेळेनुसार धावत नाही़ विशेषत: नांदेडकडून मनमाडकडे जाणाºया गाड्या सातत्याने उशिराने धावत असल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे़ परभणी रेल्वे स्थानकावरून औरंगाबाद, मनमाड, नाशिक आणि मुंबई येथे जाणाºया रेल्वे प्रवाशांची संख्या अधिक आहे़विशेष म्हणजे जिल्ह्याची राजकीय मंडळी मुंबईला जाण्याचे प्रमाणही अधिक आहे़ परंतु, याच प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर नांदेडहून मनमाडकडे जाणाºया सर्व रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर लावल्या जात आहेत़परभणी रेल्वे स्थानकावर एक्सलेटर (सरकत्या शिड्या) नसल्याने प्रवाशांना दादरा चढून प्लॅटफॉर्म गाठावा लागतो़ या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुविधाच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ त्यातच रेल्वे गाड्या अर्धा ते पाऊण तासापर्यंत उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या मन:स्तापात भर पडली आहे़ प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर रेल्वे कोचेसची पोझीशन दाखविणारे फलक नाहीत़ तसेच रेल्वे गाड्यांची माहिती देणारे बोर्डही या ठिकाणी नाहीत़ परिणामी आरक्षण केलेल्या प्रवाशांना कोचचा अंदाजा घेवूनच प्लॅटफॉर्मवर थांबावे लागते़ रेल्वे गाडी आल्यानंतर अनेक वेळा आरक्षणाचा डबा दूर अंतरावर असतो आणि त्यानंतर धावपळ करीत जागा पकडावी लागते़ पाच महिन्यांपासून प्रवाशी या समस्यांना सामोरे जात आहेत़ रेल्वे प्रशासनाने किमान पोझीशन बोर्ड लावले तरी प्रवाशांची सुविधा होवू शकते़ परंतु, प्रशासन मात्र हे साधे कामही करण्यासाठी पुढाकार घेत नाही़रेल्वे दुहेरीकरणानंतर प्रवाशांना या असुविधा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत़ औरंगाबाद-मनमाडकडे जाणाºया प्रवाशांना आपली जागा मिळेपर्यंत धाकधूक असते़ या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेºयांचीही पुरेशी व्यवस्था केली नाही़ परिणामी चोरीच्या घटना वाढत आहेत़ रेल्वे प्रशासनाने या सर्व बाबी लक्षात घेवून त्वरित सुविधा पुरवाव्यात, प्रवाशांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे़