शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

प्रशासनाच्या उदासिनतेने असुविधांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:57 IST

रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर परभणी स्थानकावरील असुविधांत आणखीच भर पडली असून, प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन उदासिन असल्याने दिवसेंदिवस रेल्वेच्या समस्या वाढत चालल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर परभणी स्थानकावरील असुविधांत आणखीच भर पडली असून, प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन उदासिन असल्याने दिवसेंदिवस रेल्वेच्या समस्या वाढत चालल्या आहेत़धर्माबाद-मनमाड या मार्गावर परभणी हे रेल्वेचे महत्वाचे स्थानक आहे़ या ठिकाणाहून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात़ सुमारे ८० रेल्वे गाड्यांची वाहतूक असलेल्या या रेल्वे स्थानकाचा महसूलही लाखो रुपयांच्या घरात आहे़ मात्र सुविधा देण्यासाठी प्रशासन कासवगतीचा मार्ग अवलंबत आहे़ रेल्वे विभागाच्या आदर्श स्थानकाच्या यादीत परभणीचा नंबर लागला खरा़ परंतु, विकास कामे संथगतीने सुरू आहेत़ रेल्वे प्रवाशांबरोबरच प्रवासी संघटना सुविधांसाठी ओरड करीत असताना प्रशासन मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही़धर्माबाद ते मनमाड या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे़ या कामातील पहिला टप्पा पाच महिन्यांपूर्वी पूर्ण झाला़ परभणी ते मिरखेल हा दुहेरी रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला़ या मार्गाचे दुहेरीकरण झाल्याने रेल्वे वाहतूक सोयीची होईल, रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक काटेकोर होईल, अशी प्रवाशांची अपेक्षा होती़ परंतु, ती फोल ठरली़ पूर्वीपेक्षाही अडचणीत भर पडली आहे़ मागील पाच महिन्यांपासून एकही रेल्वे गाडी परभणी स्थानकावरून वेळेनुसार धावत नाही़ विशेषत: नांदेडकडून मनमाडकडे जाणाºया गाड्या सातत्याने उशिराने धावत असल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे़ परभणी रेल्वे स्थानकावरून औरंगाबाद, मनमाड, नाशिक आणि मुंबई येथे जाणाºया रेल्वे प्रवाशांची संख्या अधिक आहे़विशेष म्हणजे जिल्ह्याची राजकीय मंडळी मुंबईला जाण्याचे प्रमाणही अधिक आहे़ परंतु, याच प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर नांदेडहून मनमाडकडे जाणाºया सर्व रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर लावल्या जात आहेत़परभणी रेल्वे स्थानकावर एक्सलेटर (सरकत्या शिड्या) नसल्याने प्रवाशांना दादरा चढून प्लॅटफॉर्म गाठावा लागतो़ या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुविधाच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ त्यातच रेल्वे गाड्या अर्धा ते पाऊण तासापर्यंत उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या मन:स्तापात भर पडली आहे़ प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर रेल्वे कोचेसची पोझीशन दाखविणारे फलक नाहीत़ तसेच रेल्वे गाड्यांची माहिती देणारे बोर्डही या ठिकाणी नाहीत़ परिणामी आरक्षण केलेल्या प्रवाशांना कोचचा अंदाजा घेवूनच प्लॅटफॉर्मवर थांबावे लागते़ रेल्वे गाडी आल्यानंतर अनेक वेळा आरक्षणाचा डबा दूर अंतरावर असतो आणि त्यानंतर धावपळ करीत जागा पकडावी लागते़ पाच महिन्यांपासून प्रवाशी या समस्यांना सामोरे जात आहेत़ रेल्वे प्रशासनाने किमान पोझीशन बोर्ड लावले तरी प्रवाशांची सुविधा होवू शकते़ परंतु, प्रशासन मात्र हे साधे कामही करण्यासाठी पुढाकार घेत नाही़रेल्वे दुहेरीकरणानंतर प्रवाशांना या असुविधा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत़ औरंगाबाद-मनमाडकडे जाणाºया प्रवाशांना आपली जागा मिळेपर्यंत धाकधूक असते़ या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेºयांचीही पुरेशी व्यवस्था केली नाही़ परिणामी चोरीच्या घटना वाढत आहेत़ रेल्वे प्रशासनाने या सर्व बाबी लक्षात घेवून त्वरित सुविधा पुरवाव्यात, प्रवाशांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे़