शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैैध वाहतूक !

By admin | Updated: August 1, 2014 00:28 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक होत असून, यातून एसटीला दिवसाला हजारो रुपयांचा फटका बसत आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक होत असून, यातून एसटीला दिवसाला हजारो रुपयांचा फटका बसत आहे. असे असतानाही अशा वाहनांवर प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. या अवैध वाहतुकीने शेकडो लोकांचा बळी गेला आहे. उस्मानाबादसोबतच वाशी, भूम, कळंब, लोहारा, उमरगा, परंडा, तुळजापूर आदी तालुक्यांमध्ये हेच चित्र दिसते. या वाहनधारकांवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न सदरील विदारक स्थिती पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना पडला आहे.उस्मानाबाद शहरातून बार्शीनाका, बसस्थानक परिसर, सांजारोड , आदी ठिकाणाहून अवैध वाहतूक केली जात आहे. अवैध वाहतुकीने प्रवाशांचा जीव धोक्यात येत असला तरी प्रवाशी गावाला जाण्यासाठी एसटी ने जाता खाजगी वाहनांचा आधार घेत आहे. उस्मानाबाद शहरात सकाळी बसस्थानक समोर अवैध वाहतुकीचे काळीपिवळी, अॉटो थांबत असतात. हे वाहन चालक प्रवाशांना तुम्हाला कुठे जायचे सांगा आमची गाडी त्याच गावाला चाली असे म्हणुन सरास अवैध प्रवासी वाहतूक करीत असतात. या सर्व घटना वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांसमोर होत असताना यावर कोणतीच कार्यवाही केली जात नाही हे विशेष. प्रवासी एसटीला जाणे पसंत करत नाहीत, कारण खाजगी वाहनापेक्षा एसटीचे तिकीट जास्त असल्याने ते प्रवास करण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घेत असतात. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना गावाकडे जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असतो. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, येडशी, तेर, बेंबळी इ. भागात सरास अवैध वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे. अवैध वाहतुकी मध्ये प्रवाशा बरोबर सिलेंडर , पेट्रोल व डिझेल या पदार्थाची अवैध वाहतुकी मधून घेऊन जात असल्याने स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही महिन्यात जिल्ह्यात मोठया प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असले तरी अवैध वाहतूक मात्र कमी झालेली नाही.बसच्या फेऱ्या कमीअवैध वाहतूक करणारे वाहनाचालक पोलिस प्रशासनला चिरीमिरी देत असल्याने सरास अवैध वाहतूक सुरु असल्याचे प्रवासी सांगतात. या अवैध वाहतुकीने काही गावातील बसच्या फेऱ्या ही कमी झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या गावी जाण्यासाठी अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असल्याचे प्रवासी सांगतात.राजकीय दबावअवैध वाहतूक करणाऱ्यावर पोलिस किंवा आरटीओच्या पथकाने कारवाई केली तर राजकीय नेत्यांचे फोन येत असतात. संबधित वाहन सोडून द्या व त्याला दंड करु नका असे फोन येत असतात. त्यामुळे पोलिसांना अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकास सोडून द्यावे लागत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.३५९ वाहनांवर कारवाईचा बडगाउस्मानाबाद जिल्ह्यात मागील तीन महिन्यात अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या ३५९ वाहनावर आरटीओ कारवाई केली असून ५६ वाहनांचे रजिस्टे्रशन निलंबित केले आहे. २८ वाहनचालकांचे ड्रायव्हीग लायसन निलंबित केले. तसेच टॅक्स व दंड मिळून ३ लाख ७४ हजार ५२२ रुपये वसूल करण्यात आल्याचे आरटीओच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.