शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

उमाचीवाडी तलावाची पाणी पातळी चिंताजनक

By admin | Updated: September 13, 2014 23:29 IST

ईट : भूम तालुक्यातील उमाचीवाडी परिसरामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना आतापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावू लागला आहे.

ईट : भूम तालुक्यातील उमाचीवाडी परिसरामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना आतापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावू लागला आहे. तर शेतकऱ्यांना पिकांच्या पाण्याची चिंता भेडसावू लागली आहे. आजवर या प्रकल्पाच्या पाणीपातळीत केवळ एका फुटाने वाढ झाली आहे.मागील चार वर्षापूर्वी उमाच्यावाडीनजीक साठवण तलावाची उभारणी करण्यात आली. तलावाच्या सांडव्याचे काम गतवर्षी पूर्ण करण्यात आले. मात्र सलग दोन वर्ष अत्यल्प पाऊस झाल्यामुळे साठवण तलाव एकदाही पूर्ण क्षमतेने भरला नाही. गतवर्षीच्या पावसाळ्यामध्ये सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाल्याने तलावामध्ये केवळ ५० टक्केच साठा शिल्लक होता. उन्हाळ्यामध्ये परिसरातील अनेक गावे भीषण टंचाईचा सामना करीत असताना या तलावाद्वारे संबंधित गावातील ग्रामस्थांची तहान भागविण्यात आली. पाणीचोरी होवू नये म्हणून प्रकल्प क्षेत्रातील विद्युत मोटारीचे कनेक्शन तोडण्यात आले होते. दरम्यान, मागील दहा-पंधरा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढली आहे. असे असले तरी नागेवाडी, वडाचीवाडी आणि उमाचीवाडी या भागामध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने उमाचीवाडी साठवण तलावात सध्या मृतसाठा शिल्लक आहे. आजवरच्या पावसामुळे केवळ एक फुटाने पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे उर्वरित पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)काक्रंबा : पावसाळा सुरु होवून साडेतीन ते चार महिन्याचा कालावधी संपत आला आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा परिसरात मात्र साडेतीन महिन्यात एकही मोठा पाऊस न झाल्याने परिसरातील दहा गावचे साठवण तलाव, बंधारे अद्याप कोरडेच असल्याने या भागात दुष्काळी स्थिती कायम आहे.वरुणराजाच्या अवकृपेने यावर्षी दीड महिन्यानंतर पावसाने सुरुवात केल्याने खरीपाच्या पेरण्या दीड महिना उशिराने झाल्याने खरीपाच्या उत्पन्नावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, मध्यंतरीच्या काळात खरीपाच्या पेरण्या झाल्यानंतर पुन्हा १५ ते २० दिवस पावसाने ओढ दिल्याने कोवळी पिके माना टाकू लागली होती.त्यामुळे या भागात सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता होती. मात्र मागील काही दिवसांत झालेल्या दरमदार पावसामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळाली असली तरी पण काक्रंबा परिसरातील मोर्डा, तडवळा, बारुळ, व्होनाळा, काक्रंबा, काक्रंबावाडी, वडगाव (लाख), खंडाळा, जवळगा (मे), कार्ला, कानेगाव आदी गावच्या परिसरात साडेतीन महिन्याच्या काळात अद्याप एकदाही दमदार मोठा पाऊस झाला नसल्याने वरील १० ते १२ गावचे साठवण तलावात एक टक्का देखील पावसाचे पाणी आले नसून, या भागातील नदी, नाले, तलाव, ओढे, बंधारे, विहिरी कोरड्या ठाक पडल्या असून, या भागातील साठवण तलावात सध्या १५ ते २० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने अद्याप परिसरात दुष्काळी परिस्थिती कायम असून, शेतकऱ्यांची बोअर बंद पडू लागले आहेत. त्यामुळे येत्या १५ दिवसात या भागात मोठा पाऊस न झाल्यास काक्रंबा परिसरातील १० गावांना भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.