शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

उमाचीवाडी तलावाची पाणी पातळी चिंताजनक

By admin | Updated: September 13, 2014 23:29 IST

ईट : भूम तालुक्यातील उमाचीवाडी परिसरामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना आतापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावू लागला आहे.

ईट : भूम तालुक्यातील उमाचीवाडी परिसरामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना आतापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावू लागला आहे. तर शेतकऱ्यांना पिकांच्या पाण्याची चिंता भेडसावू लागली आहे. आजवर या प्रकल्पाच्या पाणीपातळीत केवळ एका फुटाने वाढ झाली आहे.मागील चार वर्षापूर्वी उमाच्यावाडीनजीक साठवण तलावाची उभारणी करण्यात आली. तलावाच्या सांडव्याचे काम गतवर्षी पूर्ण करण्यात आले. मात्र सलग दोन वर्ष अत्यल्प पाऊस झाल्यामुळे साठवण तलाव एकदाही पूर्ण क्षमतेने भरला नाही. गतवर्षीच्या पावसाळ्यामध्ये सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाल्याने तलावामध्ये केवळ ५० टक्केच साठा शिल्लक होता. उन्हाळ्यामध्ये परिसरातील अनेक गावे भीषण टंचाईचा सामना करीत असताना या तलावाद्वारे संबंधित गावातील ग्रामस्थांची तहान भागविण्यात आली. पाणीचोरी होवू नये म्हणून प्रकल्प क्षेत्रातील विद्युत मोटारीचे कनेक्शन तोडण्यात आले होते. दरम्यान, मागील दहा-पंधरा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढली आहे. असे असले तरी नागेवाडी, वडाचीवाडी आणि उमाचीवाडी या भागामध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने उमाचीवाडी साठवण तलावात सध्या मृतसाठा शिल्लक आहे. आजवरच्या पावसामुळे केवळ एक फुटाने पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे उर्वरित पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)काक्रंबा : पावसाळा सुरु होवून साडेतीन ते चार महिन्याचा कालावधी संपत आला आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा परिसरात मात्र साडेतीन महिन्यात एकही मोठा पाऊस न झाल्याने परिसरातील दहा गावचे साठवण तलाव, बंधारे अद्याप कोरडेच असल्याने या भागात दुष्काळी स्थिती कायम आहे.वरुणराजाच्या अवकृपेने यावर्षी दीड महिन्यानंतर पावसाने सुरुवात केल्याने खरीपाच्या पेरण्या दीड महिना उशिराने झाल्याने खरीपाच्या उत्पन्नावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, मध्यंतरीच्या काळात खरीपाच्या पेरण्या झाल्यानंतर पुन्हा १५ ते २० दिवस पावसाने ओढ दिल्याने कोवळी पिके माना टाकू लागली होती.त्यामुळे या भागात सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता होती. मात्र मागील काही दिवसांत झालेल्या दरमदार पावसामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळाली असली तरी पण काक्रंबा परिसरातील मोर्डा, तडवळा, बारुळ, व्होनाळा, काक्रंबा, काक्रंबावाडी, वडगाव (लाख), खंडाळा, जवळगा (मे), कार्ला, कानेगाव आदी गावच्या परिसरात साडेतीन महिन्याच्या काळात अद्याप एकदाही दमदार मोठा पाऊस झाला नसल्याने वरील १० ते १२ गावचे साठवण तलावात एक टक्का देखील पावसाचे पाणी आले नसून, या भागातील नदी, नाले, तलाव, ओढे, बंधारे, विहिरी कोरड्या ठाक पडल्या असून, या भागातील साठवण तलावात सध्या १५ ते २० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने अद्याप परिसरात दुष्काळी परिस्थिती कायम असून, शेतकऱ्यांची बोअर बंद पडू लागले आहेत. त्यामुळे येत्या १५ दिवसात या भागात मोठा पाऊस न झाल्यास काक्रंबा परिसरातील १० गावांना भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.