शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

उमाचीवाडी तलावाची पाणी पातळी चिंताजनक

By admin | Updated: September 13, 2014 23:29 IST

ईट : भूम तालुक्यातील उमाचीवाडी परिसरामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना आतापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावू लागला आहे.

ईट : भूम तालुक्यातील उमाचीवाडी परिसरामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना आतापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावू लागला आहे. तर शेतकऱ्यांना पिकांच्या पाण्याची चिंता भेडसावू लागली आहे. आजवर या प्रकल्पाच्या पाणीपातळीत केवळ एका फुटाने वाढ झाली आहे.मागील चार वर्षापूर्वी उमाच्यावाडीनजीक साठवण तलावाची उभारणी करण्यात आली. तलावाच्या सांडव्याचे काम गतवर्षी पूर्ण करण्यात आले. मात्र सलग दोन वर्ष अत्यल्प पाऊस झाल्यामुळे साठवण तलाव एकदाही पूर्ण क्षमतेने भरला नाही. गतवर्षीच्या पावसाळ्यामध्ये सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाल्याने तलावामध्ये केवळ ५० टक्केच साठा शिल्लक होता. उन्हाळ्यामध्ये परिसरातील अनेक गावे भीषण टंचाईचा सामना करीत असताना या तलावाद्वारे संबंधित गावातील ग्रामस्थांची तहान भागविण्यात आली. पाणीचोरी होवू नये म्हणून प्रकल्प क्षेत्रातील विद्युत मोटारीचे कनेक्शन तोडण्यात आले होते. दरम्यान, मागील दहा-पंधरा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढली आहे. असे असले तरी नागेवाडी, वडाचीवाडी आणि उमाचीवाडी या भागामध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने उमाचीवाडी साठवण तलावात सध्या मृतसाठा शिल्लक आहे. आजवरच्या पावसामुळे केवळ एक फुटाने पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे उर्वरित पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)काक्रंबा : पावसाळा सुरु होवून साडेतीन ते चार महिन्याचा कालावधी संपत आला आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा परिसरात मात्र साडेतीन महिन्यात एकही मोठा पाऊस न झाल्याने परिसरातील दहा गावचे साठवण तलाव, बंधारे अद्याप कोरडेच असल्याने या भागात दुष्काळी स्थिती कायम आहे.वरुणराजाच्या अवकृपेने यावर्षी दीड महिन्यानंतर पावसाने सुरुवात केल्याने खरीपाच्या पेरण्या दीड महिना उशिराने झाल्याने खरीपाच्या उत्पन्नावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, मध्यंतरीच्या काळात खरीपाच्या पेरण्या झाल्यानंतर पुन्हा १५ ते २० दिवस पावसाने ओढ दिल्याने कोवळी पिके माना टाकू लागली होती.त्यामुळे या भागात सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता होती. मात्र मागील काही दिवसांत झालेल्या दरमदार पावसामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळाली असली तरी पण काक्रंबा परिसरातील मोर्डा, तडवळा, बारुळ, व्होनाळा, काक्रंबा, काक्रंबावाडी, वडगाव (लाख), खंडाळा, जवळगा (मे), कार्ला, कानेगाव आदी गावच्या परिसरात साडेतीन महिन्याच्या काळात अद्याप एकदाही दमदार मोठा पाऊस झाला नसल्याने वरील १० ते १२ गावचे साठवण तलावात एक टक्का देखील पावसाचे पाणी आले नसून, या भागातील नदी, नाले, तलाव, ओढे, बंधारे, विहिरी कोरड्या ठाक पडल्या असून, या भागातील साठवण तलावात सध्या १५ ते २० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने अद्याप परिसरात दुष्काळी परिस्थिती कायम असून, शेतकऱ्यांची बोअर बंद पडू लागले आहेत. त्यामुळे येत्या १५ दिवसात या भागात मोठा पाऊस न झाल्यास काक्रंबा परिसरातील १० गावांना भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.