शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मनपाने केला एलईडीसाठी करार

By admin | Updated: October 10, 2016 01:13 IST

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयात महापालिकेचा पराभव झाल्यानंतर शहरातील पथदिव्यांना एलईडी बल्ब आणि देखभाल, दुरुस्तीचे काम खाजगी कंपनीला देण्यात आले.

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयात महापालिकेचा पराभव झाल्यानंतर शहरातील पथदिव्यांना एलईडी बल्ब आणि देखभाल, दुरुस्तीचे काम खाजगी कंपनीला देण्यात आले. २६१ कोटी रुपयांच्या या कामात महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने चार दिवसांपूर्वीच मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी कंपनीसोबत करारही केला.चार वर्षांपूर्वी मनपाने शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे बसविण्यासाठी निविदा मागविली होती. निविदा प्रक्रियेत दोन कंपन्यांमधील वाद खंडपीठात पोहोचला. या प्रकरणात न्यायालयाने मनपाच्या बाजूने निर्णय दिला. काम न मिळालेल्या एका कंत्राटदाराने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. २ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात मनपाचा पराभव झाला. न्यायालयाने कंपनीला वर्कआॅर्डर द्यावी, असे आदेश दिले. एका रात्रीतून मनपाने कंपनीला ई-मेलद्वारे वर्कआॅर्डरही दिली होती. २८ सप्टेंबर रोजी इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम प्रा. लि. तथा पेरॉगॉन केबल इंडिया या कंपनीचे विकास नागपाल यांनी मनपात हजेरी लावली. त्यांनी कंपनीसोबत करार करण्याची मागणी केली. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी नागपाल यांना बोलावून घेतले. कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी करार तयार केला. विधि विभागाच्या अधिकारी अपर्णा थेटे यांनी कायदेशीर बाजू तपासून घेतली. त्यानंतर करारावर सह्या केल्या.४आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या मनपाला हा ठेका अजिबात परवडणारा नाही. ४सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे प्रशासनाला एलईडी लावण्याचे काम सुरू करावे लागत आहे. ४या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा सध्या तरी मनपाकडे कोणताच मार्ग उरलेला नाही. ४दर महिन्याला कंत्राटदाराला २ कोटी ७५ लाख रुपये देणे क्रमप्राप्त आहे.४कंपनी ९६ महिन्यांमध्ये ८६ कोटी रुपये खर्च करून ४० हजार पथदिवे लावणार आहे.४० हजार पथदिव्यांसाठी दरवर्षी मनपाला वेगळी रक्कम द्यावी लागेल. मनपावर एकूण २६१ कोटींचा बोजा यानिमित्ताने पडणार आहे. ४कंत्राटदाराने आठ वर्षे प्रत्येक पथदिव्याची देखभाल, दुरुस्ती करावी. यासाठी प्रत्येक पथदिव्यामागे मनपा ९५ रुपये देणार आहे.