शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

अखेर मनपाने केला एलईडीसाठी करार

By admin | Updated: October 10, 2016 01:13 IST

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयात महापालिकेचा पराभव झाल्यानंतर शहरातील पथदिव्यांना एलईडी बल्ब आणि देखभाल, दुरुस्तीचे काम खाजगी कंपनीला देण्यात आले.

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयात महापालिकेचा पराभव झाल्यानंतर शहरातील पथदिव्यांना एलईडी बल्ब आणि देखभाल, दुरुस्तीचे काम खाजगी कंपनीला देण्यात आले. २६१ कोटी रुपयांच्या या कामात महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने चार दिवसांपूर्वीच मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी कंपनीसोबत करारही केला.चार वर्षांपूर्वी मनपाने शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे बसविण्यासाठी निविदा मागविली होती. निविदा प्रक्रियेत दोन कंपन्यांमधील वाद खंडपीठात पोहोचला. या प्रकरणात न्यायालयाने मनपाच्या बाजूने निर्णय दिला. काम न मिळालेल्या एका कंत्राटदाराने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. २ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात मनपाचा पराभव झाला. न्यायालयाने कंपनीला वर्कआॅर्डर द्यावी, असे आदेश दिले. एका रात्रीतून मनपाने कंपनीला ई-मेलद्वारे वर्कआॅर्डरही दिली होती. २८ सप्टेंबर रोजी इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम प्रा. लि. तथा पेरॉगॉन केबल इंडिया या कंपनीचे विकास नागपाल यांनी मनपात हजेरी लावली. त्यांनी कंपनीसोबत करार करण्याची मागणी केली. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी नागपाल यांना बोलावून घेतले. कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी करार तयार केला. विधि विभागाच्या अधिकारी अपर्णा थेटे यांनी कायदेशीर बाजू तपासून घेतली. त्यानंतर करारावर सह्या केल्या.४आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या मनपाला हा ठेका अजिबात परवडणारा नाही. ४सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे प्रशासनाला एलईडी लावण्याचे काम सुरू करावे लागत आहे. ४या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा सध्या तरी मनपाकडे कोणताच मार्ग उरलेला नाही. ४दर महिन्याला कंत्राटदाराला २ कोटी ७५ लाख रुपये देणे क्रमप्राप्त आहे.४कंपनी ९६ महिन्यांमध्ये ८६ कोटी रुपये खर्च करून ४० हजार पथदिवे लावणार आहे.४० हजार पथदिव्यांसाठी दरवर्षी मनपाला वेगळी रक्कम द्यावी लागेल. मनपावर एकूण २६१ कोटींचा बोजा यानिमित्ताने पडणार आहे. ४कंत्राटदाराने आठ वर्षे प्रत्येक पथदिव्याची देखभाल, दुरुस्ती करावी. यासाठी प्रत्येक पथदिव्यामागे मनपा ९५ रुपये देणार आहे.