शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

उज्ज्वलाने राॅकेल नेले, तर महागाईने गॅस हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:06 IST

गल्ले बोरगाव : स्वयंपाक करताना गोरगरीब महिलांच्या डोळ्यांतून येणारे पाणी केंद्र शासनाला बघवत नसल्याने, महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत माफक दरात ...

गल्ले बोरगाव : स्वयंपाक करताना गोरगरीब महिलांच्या डोळ्यांतून येणारे पाणी केंद्र शासनाला बघवत नसल्याने, महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत माफक दरात गॅस दिले. बदल्यात रॉकेल बंद केले. मात्र, आता गोरगरिबांना दरवाढीमुळे स्वयंपाकाचा गॅस परवडत नाही. उज्ज्वलाने रॉकेल नेले, तर महागाईने गॅस हिरावला, अशी म्हण्याची वेळ ग्रामीण भागातील महिलांवर आलेली आहे.

शासनाच्या उज्ज्वला योजनेंतर्गत कमी दरामध्ये गोरगरिबांना गॅसचे कनेक्शन देण्यात आले. आता गॅस दरवाढीमुळे गॅस भरण्यासाठी ८३० रुपयांचा खर्च येऊ लागला आहे. ग्रामीण भागांमध्ये मजुरी करून पोट भरणे कठीण झाले आहे. त्यात वाढती महागाई असल्याने ग्रामीण भागातील महिलांना ८३० रुपयांचा गॅस भरणे परवडत नाही. चुलीवरच स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाही. बरी कमाई असणाऱ्या काही कुटुंबात चहा गॅसवर केला जात आहे, तर स्वयंपाक मात्र चुलीवरच करीत असल्याचे चित्र आहे.

गल्ले बोरगावसह परिसरातील दारिद्र्यरेषेखालील व अल्पभूधारकांना शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस वितरण केले. शिधापत्रिकेवर गॅसचा शिक्का लावत रॉकेल बंद केले. उज्ज्वला योजनेच्या मागे लागल्याने गल्ले बोरगाव शिवारातील काही गावे रॉकेलमुक्त झाली आहेत. यात शासनाच्या अनुदानाची बचत असली, तरी ग्रामीण भागात रॉकेल मिळत नाही.

वीज खंडित झाल्यानंतर ग्रामस्थांना व रात्रीच्या वेळेस शेतीची राखण करण्याकरिता जाणाऱ्या शेतकऱ्यांना रॉकेलच्या दिव्याचा आधार होता. मात्र, तो आधारही हिरावून घेतला आहे.

दैनंदिन वापरासाठी व अत्यावश्‍यक वस्तू म्हणून गॅस सिलिंडरचा वापर होतो. त्यामुळे इंधन म्हणून वापरण्यात येणारे लाकूड, भुसा, रॉकेल खूप मागे पडले आहे. अत्यावश्‍यक झालेल्या गॅस सिलिंडरचा दर वाढत असल्याने आमचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया महिलावर्गाने दिल्या.

महिन्याचे बजेट कोलमडले

घरगुती गॅस सिलिंडरच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केवळ गॅस सिलिंडर दरवाढ नाही; तर त्याच्याशी जोडणाऱ्या सर्वच वस्तूंची दरवाढ होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महागाईला आळा बसविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ठोस कारवाई करण्याची गरज आहे.