शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वलाने राॅकेल नेले, तर महागाईने गॅस हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:06 IST

गल्ले बोरगाव : स्वयंपाक करताना गोरगरीब महिलांच्या डोळ्यांतून येणारे पाणी केंद्र शासनाला बघवत नसल्याने, महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत माफक दरात ...

गल्ले बोरगाव : स्वयंपाक करताना गोरगरीब महिलांच्या डोळ्यांतून येणारे पाणी केंद्र शासनाला बघवत नसल्याने, महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत माफक दरात गॅस दिले. बदल्यात रॉकेल बंद केले. मात्र, आता गोरगरिबांना दरवाढीमुळे स्वयंपाकाचा गॅस परवडत नाही. उज्ज्वलाने रॉकेल नेले, तर महागाईने गॅस हिरावला, अशी म्हण्याची वेळ ग्रामीण भागातील महिलांवर आलेली आहे.

शासनाच्या उज्ज्वला योजनेंतर्गत कमी दरामध्ये गोरगरिबांना गॅसचे कनेक्शन देण्यात आले. आता गॅस दरवाढीमुळे गॅस भरण्यासाठी ८३० रुपयांचा खर्च येऊ लागला आहे. ग्रामीण भागांमध्ये मजुरी करून पोट भरणे कठीण झाले आहे. त्यात वाढती महागाई असल्याने ग्रामीण भागातील महिलांना ८३० रुपयांचा गॅस भरणे परवडत नाही. चुलीवरच स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाही. बरी कमाई असणाऱ्या काही कुटुंबात चहा गॅसवर केला जात आहे, तर स्वयंपाक मात्र चुलीवरच करीत असल्याचे चित्र आहे.

गल्ले बोरगावसह परिसरातील दारिद्र्यरेषेखालील व अल्पभूधारकांना शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस वितरण केले. शिधापत्रिकेवर गॅसचा शिक्का लावत रॉकेल बंद केले. उज्ज्वला योजनेच्या मागे लागल्याने गल्ले बोरगाव शिवारातील काही गावे रॉकेलमुक्त झाली आहेत. यात शासनाच्या अनुदानाची बचत असली, तरी ग्रामीण भागात रॉकेल मिळत नाही.

वीज खंडित झाल्यानंतर ग्रामस्थांना व रात्रीच्या वेळेस शेतीची राखण करण्याकरिता जाणाऱ्या शेतकऱ्यांना रॉकेलच्या दिव्याचा आधार होता. मात्र, तो आधारही हिरावून घेतला आहे.

दैनंदिन वापरासाठी व अत्यावश्‍यक वस्तू म्हणून गॅस सिलिंडरचा वापर होतो. त्यामुळे इंधन म्हणून वापरण्यात येणारे लाकूड, भुसा, रॉकेल खूप मागे पडले आहे. अत्यावश्‍यक झालेल्या गॅस सिलिंडरचा दर वाढत असल्याने आमचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया महिलावर्गाने दिल्या.

महिन्याचे बजेट कोलमडले

घरगुती गॅस सिलिंडरच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केवळ गॅस सिलिंडर दरवाढ नाही; तर त्याच्याशी जोडणाऱ्या सर्वच वस्तूंची दरवाढ होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महागाईला आळा बसविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ठोस कारवाई करण्याची गरज आहे.