शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘उचलेगिरी’ अडचणीत

By admin | Updated: July 15, 2016 01:11 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय ताळमेळाचा संयम अलीकडे संपला असून, मालमत्ताकर वसुलीसाठी वाट्टेल ते उपाय करून पालिका नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय ताळमेळाचा संयम अलीकडे संपला असून, मालमत्ताकर वसुलीसाठी वाट्टेल ते उपाय करून पालिका नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे. पोलिसांसमोर बड्या कर थकबाकीदारांना उभे करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता स्थावर ऐवजी जंगम मालमत्ता जप्त करण्याचा विचार पालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी सुरू केला आहे. मनपाच्या ‘घरगुती उचलेगिरी’ ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कडाडून विरोध केला. महापौर त्र्यंबक तुपे, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी याप्रकरणी पालिकेत एका बैठकीत अशा पद्धतीने कर वसुलीचा विचारही प्रशासनाने डोक्यात आणू नये, असा सल्ला प्रशासनाला दिला. मनपाची कर वसुली अडचणीत आली आहे. उपाययोजनेऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.घरगुती मालमत्ताधारकांनी सुमारे ८५ कोटी रुपयांची थकबाकी अनेक वर्षांपासून भरलेली नाही. जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांकडील टी. व्ही., दुचाकी वाहन, फ्रीज आदी मौल्यवान वस्तू जप्त करण्याची कारवाई मनपाकडून करण्याचा विचार सुरू आहे. ४२९० कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी कर अदालत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील १ लाख ३१ हजार नागरिकांनी गेल्या १० वर्षांत मालमत्ताकरापोटी एक रुपयाही मनपाकडे भरला नाही. ४चालू आर्थिक वर्षात मनपाने ३६८ कोटींच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रत्येक वॉर्डातील १०० मोठ्या थकबाकीदारांना कर अदालतीसाठी बोलावण्यात येणार आहे. निवासी मालमत्ताधारकांकडे जास्त कर थकीत असल्यामुळे त्यांना टार्गेट करण्यात येणार आहे. ४महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १२८ नुुसार घरातील ऐवज जप्त करण्याची तरतूद आहे. टी. व्ही., दुचाकी, कपाट, फ्रीज आदी मौल्यवान वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे, असा प्रशासनाचा दावा आहे. 1१ लाख ३१ हजार मालमत्ताधारकांनी गेल्या १० वर्षांत करापोटी एक रुपयाही मनपात भरला नाही. अशा घरगुती थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा विचार पालिकेच्या डोक्यात आला कुठून, असा प्रश्न आहे. हा नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे.2मनपा अधिनियमात कर वसुलीसाठी स्थावर मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. जंगम मालमत्ता जप्त करण्याची तरतूद ही सभागृहाच्या मान्यतेनुसार होऊ शकते. परंतु अशा पद्धतीने कर वसुली करणे योग्य नसल्याचे मत सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केले. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या प्रकरणी टीकेचे लक्ष्य केले.