शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘उचलेगिरी’ अडचणीत

By admin | Updated: July 15, 2016 01:11 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय ताळमेळाचा संयम अलीकडे संपला असून, मालमत्ताकर वसुलीसाठी वाट्टेल ते उपाय करून पालिका नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय ताळमेळाचा संयम अलीकडे संपला असून, मालमत्ताकर वसुलीसाठी वाट्टेल ते उपाय करून पालिका नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे. पोलिसांसमोर बड्या कर थकबाकीदारांना उभे करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता स्थावर ऐवजी जंगम मालमत्ता जप्त करण्याचा विचार पालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी सुरू केला आहे. मनपाच्या ‘घरगुती उचलेगिरी’ ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कडाडून विरोध केला. महापौर त्र्यंबक तुपे, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी याप्रकरणी पालिकेत एका बैठकीत अशा पद्धतीने कर वसुलीचा विचारही प्रशासनाने डोक्यात आणू नये, असा सल्ला प्रशासनाला दिला. मनपाची कर वसुली अडचणीत आली आहे. उपाययोजनेऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.घरगुती मालमत्ताधारकांनी सुमारे ८५ कोटी रुपयांची थकबाकी अनेक वर्षांपासून भरलेली नाही. जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांकडील टी. व्ही., दुचाकी वाहन, फ्रीज आदी मौल्यवान वस्तू जप्त करण्याची कारवाई मनपाकडून करण्याचा विचार सुरू आहे. ४२९० कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी कर अदालत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील १ लाख ३१ हजार नागरिकांनी गेल्या १० वर्षांत मालमत्ताकरापोटी एक रुपयाही मनपाकडे भरला नाही. ४चालू आर्थिक वर्षात मनपाने ३६८ कोटींच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रत्येक वॉर्डातील १०० मोठ्या थकबाकीदारांना कर अदालतीसाठी बोलावण्यात येणार आहे. निवासी मालमत्ताधारकांकडे जास्त कर थकीत असल्यामुळे त्यांना टार्गेट करण्यात येणार आहे. ४महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १२८ नुुसार घरातील ऐवज जप्त करण्याची तरतूद आहे. टी. व्ही., दुचाकी, कपाट, फ्रीज आदी मौल्यवान वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे, असा प्रशासनाचा दावा आहे. 1१ लाख ३१ हजार मालमत्ताधारकांनी गेल्या १० वर्षांत करापोटी एक रुपयाही मनपात भरला नाही. अशा घरगुती थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा विचार पालिकेच्या डोक्यात आला कुठून, असा प्रश्न आहे. हा नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे.2मनपा अधिनियमात कर वसुलीसाठी स्थावर मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. जंगम मालमत्ता जप्त करण्याची तरतूद ही सभागृहाच्या मान्यतेनुसार होऊ शकते. परंतु अशा पद्धतीने कर वसुली करणे योग्य नसल्याचे मत सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केले. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या प्रकरणी टीकेचे लक्ष्य केले.