शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

मांत्रिकाच्या कानमंत्राने घडला वरूड (बु्र)चा प्रकार

By admin | Updated: July 25, 2014 00:48 IST

औरंगाबाद : वरूड ब्रु. (ता. जाफराबाद) चे सरपंच प्रकाश गव्हाड यांना मांत्रिकाने दिलेल्या कानमंत्रामुळे गावात जातीय तेढ निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : वरूड ब्रु. (ता. जाफराबाद) चे सरपंच प्रकाश गव्हाड यांना मांत्रिकाने दिलेल्या कानमंत्रामुळे गावात जातीय तेढ निर्माण झाली आहे. पोलिसांनी धनदांडग्यांची बाजू उचलून धरत आततायी भूमिका घेतल्यामुळे गावात भयावह परिस्थिती निर्माण झाली असून, दलितांनी तीन दिवसांपासून गाव सोडले आहे, अशी व्यथा त्या गावच्या दलित तरुणांनी येथे पत्रकार परिषदेत मांडली. गावचे डॉ. राजू साळवे, दीपक साळवे म्हणाले, गावातील बौद्धवाड्याजवळील रस्त्यावर ३० वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावलेले आहे. सन २०१२ मध्ये या तैलचित्राला लागूनच मागील बाजूस सरपंच गव्हाड यांनी चार मजली टोलेजंग इमारत उभी केली. या वास्तुसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र अपशकुनी असून, ते काढल्याशिवाय तुला चेन मिळणार नाही, असे एका मांत्रिकाने गव्हाडला सांगितले.साळवे म्हणाले, तैलचित्र काढण्यासाठी त्याने अनेकदा पोस्टरला गाडीने धडका दिल्या. याप्रकरणी त्याने पोलिसांना हाताशी धरले. प्रकरण झाल्यानंतर पोलीस येऊन समाजाची समजूत काढत होते. मिटवून घ्या, असे सांगत होते; परंतु १४ एप्रिल २०१४ रोजी त्याने त्याच्या गुंडांकडून प्रार्थना सुरू असतानाच हल्ला चढविला. आम्ही अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी केली परंतु पोलिसांनी गुन्हा नोंदवून घ्यायला एक महिना उशीर केला. त्यानंतर गव्हाडची खोटी तक्रार घेऊन ३० दलितांविरुद्ध दरोड्याचे गुन्हे दाखल केले. ते दलित कुटुंब तेव्हापासून गावातून फरार आहेत; परंतु गव्हाडविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी असताना तो पोलिसांसोबत फिरत आहे. त्याला अटक केली जात नाही.छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र पुन्हा त्याच जागी लावण्यात यावे. अटक केलेल्या बौद्ध समाजातील नागरिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी दलित अत्याचारविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहर टाकसाळ यांनी केली. कारवाई चुकीचीगव्हाड याने ३० जून रोजी ग्रामसभा घेऊन ते तैलचित्र काढण्याचा ठराव पारित केला. मुळात ६ महिन्यांच्या आतील अतिक्रमण काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतला आहे. हे चित्र ३० वर्षांपूर्वीचे होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित करून ते काढायला हवे; परंतु प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांचा कोणताही आदेश नसताना ग्रामपंचायतने बेकायदेशीरपणे काढले. अ‍ॅड. बी. एच. गायकवाड,ज्येष्ठ विधिज्ञ