शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

सीबीएसईचे दोन हजार आठशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:02 IST

गुणवत्तेसाठी पालक आग्रही : निर्णय शैक्षणिक नुकसान करणारा औरंगाबाद : पाल्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सीबीएसई शाळांचा आग्रह धरणाऱ्या पालकांची सीबीएसई ...

गुणवत्तेसाठी पालक आग्रही : निर्णय शैक्षणिक नुकसान करणारा

औरंगाबाद : पाल्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सीबीएसई शाळांचा आग्रह धरणाऱ्या पालकांची सीबीएसई बोर्डाकडून निराशा झाली आहे. दहावीची परीक्षा न देताच उत्तीर्ण केल्याने पालकांत यामुळे अस्वस्थता आहे. ऑनलाइन अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्या गुणवत्तेवर प्रवेश मिळणार, असा प्रश्न पालकांतून उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात सीबीएसईच्या ४८ शाळा आहेत. त्यात २८०० विद्यार्थी दहावीत तर २१ शाळांत बारावीचे ४७१ विद्यार्थी शिकतात. बारावीनंतर चांगल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा म्हणून पालक दहावीपासूनच मुलांची चांगली तयारी करून घेतात. दहावी, बारावीचे २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ऑफलाइन वर्ग सुरू झाले. मात्र, या वर्गांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती लाभू शकली नाही. त्याला विविध कारणे होती. कोरोनाचा कहर थांबत नसताना अनेक शाळांत शिक्षक कोरोनाबाधित झाल्याने पुन्हा शाळा बंद करण्याचीही वेळ आली. यात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान झाले. त्यामुळे बहुतांश शिक्षण हे ऑनलाइन चार ते पाच तास मोबाइलसमोर बसून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेची तयारी केली; परंतु पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तयारीवर पाणी फेरले. बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले. शाळांनी अंतर्गत गुण द्यायचे आहेत. मात्र, त्यावरही अनेक प्रश्नचिन्ह आहेत. विद्यार्थ्यांचे परीक्षेशिवाय मूल्यमापन, गुणवत्तेची सांगड घालणे अशक्य असल्याचेही अनेक पालकांचे म्हणणे आहे.

---

अकरावीचे प्रवेश कोणत्या निकषावर ?

अकरावी प्रवेशासाठी कोणती गुणवत्ता यादी गृहीत धरणार याची स्पष्टता सीबीएसई बोर्डाने केलेले नाही. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी आग्रही विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था आहे. आयटीआय, पॉलिटेक्निक प्रवेश कसे होणार, असा प्रश्नही पालकांना सतावत आहे.

---

गुणदान समपातळीवर कसे आणणार?

विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील क्षमतेवर गुणदान शिक्षकांना करावे लागणार आहे; पण यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे व पात्रतेनुसार गुणदान होईल. याची हमी बोर्ड देत नाही. गुणवत्ता यादीच नसल्याने वास्तव मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह असून अभ्यासू विद्यार्थ्यांवर अन्याय यातून होऊ शकतो.

---

पालकांत तीव्र संताप

दहावीची सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय एकदम अचूक निर्णय आहे; परंतु पुढे निकालात पूर्व परीक्षा किंवा ऑनलाइन प्रगती बघून टक्केवारी किंवा ग्रेडस् न देता फक्त पास करावे. आणि विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रवेश मिळावा.

- पल्लवी मालाणी, पालक

---

कोरोनाची लाट ओसरेपर्यंत सीबीएसई बोर्डाने थांबायला हवे होते. दहावीत कल कळतो. त्यावरून पुढची दिशा ठरवणे सोपे होते. त्यामुळे आता पुढे काय करावे, अकरावीत प्रवेश कसा मिळेल. आतापर्यंत मुलाने केलेल्या अभ्यासाच्या आकलनाचे मूल्यांकन कसे होईल, असा प्रश्न सतावतोय.

-प्रदीप सुरडकर, पालक

---

पुढच्या प्रगतीचा पाया दहावी आहे. त्यातील मेहनत मुलांचे भविष्य घडवायला मदत करते. ऑनलाइन, स्वाध्याय, पालकांनी स्वत: अभ्यास घेऊन दहावीची तयारी केली. आता परीक्षाच होणार नाही म्हटल्यावर ते परिश्रम व्यर्थ जातील. मुलगा काय शिकला त्याचे गुणांकन कसे ठरणार याची चिंता आहे.

- प्रतीक्षा काळे, पालक

---

अकरावीच्या कोणत्याही शाखेचा विचार केला तर विद्यार्थी कमी आणि उपलब्ध प्रवेश जागा जास्त, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी अडचण होणार नाही. मात्र, पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घेताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मग महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे दहावीचे गुण गृहीत न धरता त्यांची स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यावी हा तोडगा यावर निघू शकतो.

- सतीश तांबट, शिक्षणतज्ज्ञ

---

सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी

१४६० -मुले

१३४० -मुली

--