शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

सीबीएसईचे दोन हजार आठशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:02 IST

गुणवत्तेसाठी पालक आग्रही : निर्णय शैक्षणिक नुकसान करणारा औरंगाबाद : पाल्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सीबीएसई शाळांचा आग्रह धरणाऱ्या पालकांची सीबीएसई ...

गुणवत्तेसाठी पालक आग्रही : निर्णय शैक्षणिक नुकसान करणारा

औरंगाबाद : पाल्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सीबीएसई शाळांचा आग्रह धरणाऱ्या पालकांची सीबीएसई बोर्डाकडून निराशा झाली आहे. दहावीची परीक्षा न देताच उत्तीर्ण केल्याने पालकांत यामुळे अस्वस्थता आहे. ऑनलाइन अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्या गुणवत्तेवर प्रवेश मिळणार, असा प्रश्न पालकांतून उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात सीबीएसईच्या ४८ शाळा आहेत. त्यात २८०० विद्यार्थी दहावीत तर २१ शाळांत बारावीचे ४७१ विद्यार्थी शिकतात. बारावीनंतर चांगल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा म्हणून पालक दहावीपासूनच मुलांची चांगली तयारी करून घेतात. दहावी, बारावीचे २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ऑफलाइन वर्ग सुरू झाले. मात्र, या वर्गांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती लाभू शकली नाही. त्याला विविध कारणे होती. कोरोनाचा कहर थांबत नसताना अनेक शाळांत शिक्षक कोरोनाबाधित झाल्याने पुन्हा शाळा बंद करण्याचीही वेळ आली. यात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान झाले. त्यामुळे बहुतांश शिक्षण हे ऑनलाइन चार ते पाच तास मोबाइलसमोर बसून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेची तयारी केली; परंतु पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तयारीवर पाणी फेरले. बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले. शाळांनी अंतर्गत गुण द्यायचे आहेत. मात्र, त्यावरही अनेक प्रश्नचिन्ह आहेत. विद्यार्थ्यांचे परीक्षेशिवाय मूल्यमापन, गुणवत्तेची सांगड घालणे अशक्य असल्याचेही अनेक पालकांचे म्हणणे आहे.

---

अकरावीचे प्रवेश कोणत्या निकषावर ?

अकरावी प्रवेशासाठी कोणती गुणवत्ता यादी गृहीत धरणार याची स्पष्टता सीबीएसई बोर्डाने केलेले नाही. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी आग्रही विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था आहे. आयटीआय, पॉलिटेक्निक प्रवेश कसे होणार, असा प्रश्नही पालकांना सतावत आहे.

---

गुणदान समपातळीवर कसे आणणार?

विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील क्षमतेवर गुणदान शिक्षकांना करावे लागणार आहे; पण यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे व पात्रतेनुसार गुणदान होईल. याची हमी बोर्ड देत नाही. गुणवत्ता यादीच नसल्याने वास्तव मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह असून अभ्यासू विद्यार्थ्यांवर अन्याय यातून होऊ शकतो.

---

पालकांत तीव्र संताप

दहावीची सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय एकदम अचूक निर्णय आहे; परंतु पुढे निकालात पूर्व परीक्षा किंवा ऑनलाइन प्रगती बघून टक्केवारी किंवा ग्रेडस् न देता फक्त पास करावे. आणि विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रवेश मिळावा.

- पल्लवी मालाणी, पालक

---

कोरोनाची लाट ओसरेपर्यंत सीबीएसई बोर्डाने थांबायला हवे होते. दहावीत कल कळतो. त्यावरून पुढची दिशा ठरवणे सोपे होते. त्यामुळे आता पुढे काय करावे, अकरावीत प्रवेश कसा मिळेल. आतापर्यंत मुलाने केलेल्या अभ्यासाच्या आकलनाचे मूल्यांकन कसे होईल, असा प्रश्न सतावतोय.

-प्रदीप सुरडकर, पालक

---

पुढच्या प्रगतीचा पाया दहावी आहे. त्यातील मेहनत मुलांचे भविष्य घडवायला मदत करते. ऑनलाइन, स्वाध्याय, पालकांनी स्वत: अभ्यास घेऊन दहावीची तयारी केली. आता परीक्षाच होणार नाही म्हटल्यावर ते परिश्रम व्यर्थ जातील. मुलगा काय शिकला त्याचे गुणांकन कसे ठरणार याची चिंता आहे.

- प्रतीक्षा काळे, पालक

---

अकरावीच्या कोणत्याही शाखेचा विचार केला तर विद्यार्थी कमी आणि उपलब्ध प्रवेश जागा जास्त, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी अडचण होणार नाही. मात्र, पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घेताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मग महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे दहावीचे गुण गृहीत न धरता त्यांची स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यावी हा तोडगा यावर निघू शकतो.

- सतीश तांबट, शिक्षणतज्ज्ञ

---

सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी

१४६० -मुले

१३४० -मुली

--