शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

शहरात बसविणार दोन रणगाडे

By admin | Updated: July 15, 2015 00:47 IST

औरंगाबाद : शहरात लवकरच लष्कराचे दोन रणगाडे तैनात करण्यात येणार आहेत. मात्र, हे रणगाडे सुरक्षेसाठी नव्हे तर शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी ठेवले जाणार आहेत

औरंगाबाद : शहरात लवकरच लष्कराचे दोन रणगाडे तैनात करण्यात येणार आहेत. मात्र, हे रणगाडे सुरक्षेसाठी नव्हे तर शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी ठेवले जाणार आहेत. लष्कराने मनपाला हे रणगाडे देण्याचे मान्य केले असून, ते बसविण्याच्या जागा निश्चित कराव्यात असे म्हटले आहे. जागा निश्चित होताच लष्कराकडून त्याठिकाणी हे रणगाडे आणून बसविले जाणार आहेत.शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या हेतूने काही महानगरांमध्ये तेथील चौकात लष्कराचे खरेखुरे रणगाडे ठेवण्यात आलेले आहेत. यामुळे नागरिकांना आणि विशेषत: लहान मुलांना लष्कराच्या शस्त्रांविषयीची माहितीही मिळते. म्हणून औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शहरासाठी रणगाडे मिळावेत म्हणून प्रयत्न केले जात होते. त्यासाठी लष्कराच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा केली जात होती.या पार्श्वभूमीवर अखेर सोमवारी औरंगाबाद लष्कर तळाचे प्रमुख मनोजकुमार यांनी मनपाला दोन रणगाडे देण्याचे मान्य केले. हे रणगाडे बसविण्यासाठी मनपाने जागा निश्चित कराव्यात, या जागा निश्चित होताच दोन्ही रणगाडे तेथे बसविले जातील, असेही पत्रात म्हटले आहे. लष्कर तळाचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कमांडन्ट कर्नल ए. पी. सिंग यांच्या स्वाक्षरीने मनपाला हे पत्र देण्यात आले आहे. मनपातील अधिकाऱ्यांनी दोन्ही रणगाडे बसविण्यासाठी जागांचा शोध सुरू केला आहे. त्यानुसार एक रणगाडा हडकोतील स्वामी विवेकानंद उद्यानात आणि दुसरा एका महत्त्वाच्या चौकात बसविण्यावर विचार केला जात आहे. १रणगाड्यांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असली तरी विविध चौकांतील वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणाकडे मात्र मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. २महापौर त्र्यंबक तुपे यांनी खाजगी उद्योजक आणि इतर व्यक्तींच्या मदतीने शहरातील वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करून घेण्याचा विचार मांडला होता. त्यासाठी त्यांनी उद्योजक आणि इतर व्यक्तींना तसे आवाहन केले होते. ३या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक उद्योजक पुढे आले. त्यांनी शहरातील १० चौकांतील वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्याची तयारी दर्शवीत तसे प्रस्ताव दाखल केले; परंतु हे प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे मंजुरीसाठी तसेच पडून आहेत.