शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

पावसाचे दोन नक्षत्र कोरडेठाक

By admin | Updated: July 7, 2014 00:19 IST

येलदरी : मृग व आर्द्रा ही दोन्ही नक्षत्र कोरडेठाक गेल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे़

येलदरी : मृग व आर्द्रा ही दोन्ही नक्षत्र कोरडेठाक गेल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे़ केरळात मान्सून दाखल झाला़ अशी माहिती हवामान खात्याने दिली खरी़ मात्र राज्यासह परभणी जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पावसाळा सुरू झाल्यानंतर रोहिणी नक्षत्रात हमखास पाऊस पडतो़ त्यामुळे नांगरणी केलेल्या शेत जमिनीस पाळ्या देणे सोपे जाते़ मात्र रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्र लागले तरीही पावसाने पाठ फिरवली़ त्यातच आर्द्रा नक्षत्रही कोरडेठाक गेल्याने शेतातील पाळ्या खोळंबल्या आहेत़ तसेच जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी पावसाने हजेरी लावली नाही़ त्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत़ आणखी आठ-दहा दिवस पाऊस न पडल्यास खरीपाची पेरणी करणे अवघड होणार आहे़ त्यामुळे बळीराजावर मोठे संकटच कोसळले आहे़ त्यातच धरणाची पाणीपातळी खालावू लागल्याने ग्रामीण भागातील हातपंप, विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत़ त्यामुळे पाणीटंचाईच्याही झळा बसू लागल्या आहेत़ ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती़, ती पिकेही उन्हामुळे सुकू लागली आहेत़ त्यामुळे शेतकरी चारही बाजुंनी संकटात सापडला आहे़ प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे़ (वार्ताहर)बाजारपेठेत शुकशुकाटपाऊस पडत नसल्याने जिंतूर व येलदरी येथील बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे़ कृषी दुकानदार ग्राहकांची वाट पाहत आहेत़ तसेच भाजीपाल्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत़ आकाशामध्ये दररोज काळे ढग जमा होत आहेत़ परंतु, पाऊस पडत नाही़ आभाळ आल्यानंतर शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत़ पावसाळ्याचा जून महिना उलटला तरीही पाऊस न पडल्याने येलदरी धरणात केवळ ४० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ या पाण्याचा उपयोग काटकसरीने होणे गरजेचे आहे़ मात्र याकडे संबंधित विभागाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे़ जिंतूर तालुका हा डोंगराळ भाग असल्याने बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे़ पावसाच्या पाण्यावरच शेतकरी पिकाची पेरणी करतात़ यंदा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणीच केली नाही़ ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी हळद, कापूस, सोयाबीन आदी पिकांची लागवड केली आहे़ कडक ऊन पडत असल्याने ही पिकेही जळू लागली आहेत़ तसेच हातपंप व विहिरीची पाणीपातळी कमी झाल्याने ही पिके कशी जगवावीत, या विवंचेनेत शेतकरी दिसून येत आहे़ प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे़