शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

पावसाचे दोन नक्षत्र कोरडेठाक

By admin | Updated: July 7, 2014 00:19 IST

येलदरी : मृग व आर्द्रा ही दोन्ही नक्षत्र कोरडेठाक गेल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे़

येलदरी : मृग व आर्द्रा ही दोन्ही नक्षत्र कोरडेठाक गेल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे़ केरळात मान्सून दाखल झाला़ अशी माहिती हवामान खात्याने दिली खरी़ मात्र राज्यासह परभणी जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पावसाळा सुरू झाल्यानंतर रोहिणी नक्षत्रात हमखास पाऊस पडतो़ त्यामुळे नांगरणी केलेल्या शेत जमिनीस पाळ्या देणे सोपे जाते़ मात्र रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्र लागले तरीही पावसाने पाठ फिरवली़ त्यातच आर्द्रा नक्षत्रही कोरडेठाक गेल्याने शेतातील पाळ्या खोळंबल्या आहेत़ तसेच जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी पावसाने हजेरी लावली नाही़ त्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत़ आणखी आठ-दहा दिवस पाऊस न पडल्यास खरीपाची पेरणी करणे अवघड होणार आहे़ त्यामुळे बळीराजावर मोठे संकटच कोसळले आहे़ त्यातच धरणाची पाणीपातळी खालावू लागल्याने ग्रामीण भागातील हातपंप, विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत़ त्यामुळे पाणीटंचाईच्याही झळा बसू लागल्या आहेत़ ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती़, ती पिकेही उन्हामुळे सुकू लागली आहेत़ त्यामुळे शेतकरी चारही बाजुंनी संकटात सापडला आहे़ प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे़ (वार्ताहर)बाजारपेठेत शुकशुकाटपाऊस पडत नसल्याने जिंतूर व येलदरी येथील बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे़ कृषी दुकानदार ग्राहकांची वाट पाहत आहेत़ तसेच भाजीपाल्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत़ आकाशामध्ये दररोज काळे ढग जमा होत आहेत़ परंतु, पाऊस पडत नाही़ आभाळ आल्यानंतर शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत़ पावसाळ्याचा जून महिना उलटला तरीही पाऊस न पडल्याने येलदरी धरणात केवळ ४० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ या पाण्याचा उपयोग काटकसरीने होणे गरजेचे आहे़ मात्र याकडे संबंधित विभागाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे़ जिंतूर तालुका हा डोंगराळ भाग असल्याने बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे़ पावसाच्या पाण्यावरच शेतकरी पिकाची पेरणी करतात़ यंदा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणीच केली नाही़ ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी हळद, कापूस, सोयाबीन आदी पिकांची लागवड केली आहे़ कडक ऊन पडत असल्याने ही पिकेही जळू लागली आहेत़ तसेच हातपंप व विहिरीची पाणीपातळी कमी झाल्याने ही पिके कशी जगवावीत, या विवंचेनेत शेतकरी दिसून येत आहे़ प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे़