शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

औरंगाबादेत माथेफिरूने जाळल्या आणखी दोन दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 18:15 IST

जुनाबाजार येथे पूर्ववैमनस्यातून वाहने जाळणा-यास घटनेनंतर अवघ्या काही तासात गुन्हेशाखेने आरोपीस अटक केल्याची घटना ताजी आहे. असे असतानाच शहरातील काजीवाडा येथे समाजकंटकाने दोन दुचाकी जाळल्या. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. 

औरंगाबाद, दि. 14 : जुनाबाजार येथे पूर्ववैमनस्यातून वाहने जाळणा-यास घटनेनंतर अवघ्या काही तासात गुन्हेशाखेने आरोपीस अटक केल्याची घटना ताजी आहे. असे असतानाच शहरातील काजीवाडा येथे समाजकंटकाने दोन दुचाकी जाळल्या. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. 

याविषयी अधिक माहिती देताना सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, काजीवाडा येथील रहिवासी निलेश रत्नाकरराव घुले यांनी बुधवारी रात्री घरासमोर त्यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच-२० एव्ही ८४४४) उभी करून ठेवली होती. त्यांच्या दुचाकीशेजारी तौसिफ शेख यांची मोटारसायकल (एमएच-२० बीडब्ल्यू ८८६९) उभी होती. मध्यरात्री अज्ञाताने  प्रथम निलेश यांची आणि नंतर तौसिफची दुचाकी पेटविली. 

या घटनेत निलेश यांच्या दुचाकीची सीट आणि इंजीनने पेट घेतला.यामुळे निघालेल्या धुराने निलेशसह शेजा-यांना जाग आली. त्यांनी पाणी मारून दुचाकीला लागलेली आग विझविली. या घटनेत निलेशची दुचाकी जळून खाक झाली. तर तौसिफ यांच्या दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत कदम आणि कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी निलेश यांनी पोलिसांत तक्रार  नोंदविली. या गाड्या कोणी आणि का पेटविल्या याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला.