शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पावसाळ्याचे दोन महिने सरले, पण गोदावरी पाणलोट क्षेत्र कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:02 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्प क्षेत्रांसह गोदावरी पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडीसह विभागातील अनेक धरणे पाण्याचा येवा शून्य ...

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्प क्षेत्रांसह गोदावरी पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडीसह विभागातील अनेक धरणे पाण्याचा येवा शून्य आहे. नाशिकपासून औरंगाबादपर्यंतच्या गोदावरी नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे विभागातील गोदापात्रावरील विष्णुपुरी वगळता सर्व प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

कोकणासह पुणे विभागातील काही जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले तर नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलप्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे हा भाग कोरडाठाक दिसतो आहे.

शहागड आणि खडका हे दोन बंधाऱ्यासह विभागातील मोठे प्रकल्प निम्न दुधना ८३ टक्के आणि विष्णुपुरी प्रकल्पात ८८ टक्के पाणीसाठा सध्या आहे. तर जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, पैनगंगा, मनार, निम्न तेरणा, सिना कोळेगाव या सहा प्रकल्पांत कमी जलसाठा आहे. मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी प्रकल्पात सध्या ३७.११ टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला ४६ टक्के जलसाठा होता. १ जूनपासून आजवर फक्त १६५ क्यूसेक पाणी धरणात आले आहे.

निम्न दुधना प्रकल्पात मागील वर्षी २० टक्के पाणी होते. येलदरी प्रकल्पात यंदा ६१ टक्के जलसाठा असून, मागील वर्षी ३१ टक्के साठा होता. सिद्धेश्वर प्रकल्पात ६४ टक्के जलसाठा असून, मागील वर्षी ५३ टक्के साठा होता. माजलगाव धरणात ३१ टक्के जलसाठा सध्या आहे. गेल्यावर्षी ५३ टक्के जलसाठा होता. मांजरा प्रकल्पात २२ टक्के साठा असून, मागीलवर्षी ८ टक्के जलसाठा होता. पैनगंगा प्रकल्पात ६६ टक्के साठा सध्या आहे. मागीलवर्षी ५० टक्के साठा होता. मनारमध्ये ९१ टक्के साठा असून, गतवर्षी ६४ टक्के साठा होता. निम्न तेरणा प्रकल्पात ५६ टक्के साठा असून, गतवर्षी १ टक्के साठा होता. विष्णुपुरी प्रकल्पात सध्या ८८ टक्के जलसाठा आहे. तो मागील वर्षी ७८ टक्के होता.

मराठवाड्यात यंदा झालेला पाऊस

जुलै महिना संपत आला असून, अद्याप विभागातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी धरणांची तहान वाढली आहे. विभागाचे वार्षिक पर्जन्यमान ६७९ मि.मी. इतके असून, सध्या एकूण सरासरीच्या ३९३ मि.मी.च्या आसपास पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत आजवर ६८ टक्के पाऊस झाल्याची नोंद विभागीय पातळीवर घेण्यात आली आहे.

गोदावरी पाणलोटक्षेत्रात कमी पाऊस

गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस होण्यामागे मूळ कारण म्हणजे, यंदा सह्याद्रीच्या रांगामध्ये मान्सून जास्त प्रमाणात बरसला. नाशिक, जळगाव, धुळे, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा आहे. गोदावरी पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे मोठ्या धरणांत कमी जलसाठा आहे. ऑगस्ट महिन्यांत या पट्ट्यांत पाऊस होणे शक्य आहे. असे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.