शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
6
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
7
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
8
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
9
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
10
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
11
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
12
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
13
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
14
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
15
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
16
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
17
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
18
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
19
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
20
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले

पावसाळ्याचे दोन महिने सरले, पण गोदावरी पाणलोट क्षेत्र कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:02 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्प क्षेत्रांसह गोदावरी पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडीसह विभागातील अनेक धरणे पाण्याचा येवा शून्य ...

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्प क्षेत्रांसह गोदावरी पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडीसह विभागातील अनेक धरणे पाण्याचा येवा शून्य आहे. नाशिकपासून औरंगाबादपर्यंतच्या गोदावरी नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे विभागातील गोदापात्रावरील विष्णुपुरी वगळता सर्व प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

कोकणासह पुणे विभागातील काही जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले तर नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलप्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे हा भाग कोरडाठाक दिसतो आहे.

शहागड आणि खडका हे दोन बंधाऱ्यासह विभागातील मोठे प्रकल्प निम्न दुधना ८३ टक्के आणि विष्णुपुरी प्रकल्पात ८८ टक्के पाणीसाठा सध्या आहे. तर जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, पैनगंगा, मनार, निम्न तेरणा, सिना कोळेगाव या सहा प्रकल्पांत कमी जलसाठा आहे. मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी प्रकल्पात सध्या ३७.११ टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला ४६ टक्के जलसाठा होता. १ जूनपासून आजवर फक्त १६५ क्यूसेक पाणी धरणात आले आहे.

निम्न दुधना प्रकल्पात मागील वर्षी २० टक्के पाणी होते. येलदरी प्रकल्पात यंदा ६१ टक्के जलसाठा असून, मागील वर्षी ३१ टक्के साठा होता. सिद्धेश्वर प्रकल्पात ६४ टक्के जलसाठा असून, मागील वर्षी ५३ टक्के साठा होता. माजलगाव धरणात ३१ टक्के जलसाठा सध्या आहे. गेल्यावर्षी ५३ टक्के जलसाठा होता. मांजरा प्रकल्पात २२ टक्के साठा असून, मागीलवर्षी ८ टक्के जलसाठा होता. पैनगंगा प्रकल्पात ६६ टक्के साठा सध्या आहे. मागीलवर्षी ५० टक्के साठा होता. मनारमध्ये ९१ टक्के साठा असून, गतवर्षी ६४ टक्के साठा होता. निम्न तेरणा प्रकल्पात ५६ टक्के साठा असून, गतवर्षी १ टक्के साठा होता. विष्णुपुरी प्रकल्पात सध्या ८८ टक्के जलसाठा आहे. तो मागील वर्षी ७८ टक्के होता.

मराठवाड्यात यंदा झालेला पाऊस

जुलै महिना संपत आला असून, अद्याप विभागातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी धरणांची तहान वाढली आहे. विभागाचे वार्षिक पर्जन्यमान ६७९ मि.मी. इतके असून, सध्या एकूण सरासरीच्या ३९३ मि.मी.च्या आसपास पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत आजवर ६८ टक्के पाऊस झाल्याची नोंद विभागीय पातळीवर घेण्यात आली आहे.

गोदावरी पाणलोटक्षेत्रात कमी पाऊस

गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस होण्यामागे मूळ कारण म्हणजे, यंदा सह्याद्रीच्या रांगामध्ये मान्सून जास्त प्रमाणात बरसला. नाशिक, जळगाव, धुळे, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा आहे. गोदावरी पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे मोठ्या धरणांत कमी जलसाठा आहे. ऑगस्ट महिन्यांत या पट्ट्यांत पाऊस होणे शक्य आहे. असे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.