शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सिमेंट रस्त्यांना दोन महिन्यांची डेडलाईन

By admin | Updated: July 22, 2016 00:47 IST

औरंगाबाद : चोवीस कोटींच्या निधीतील व्हाईट टॅपिंगच्या अर्धवट रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

औरंगाबाद : चोवीस कोटींच्या निधीतील व्हाईट टॅपिंगच्या अर्धवट रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच क्रांतीचौक ते महावीर चौक या पाचव्या नियोजित रस्त्याऐवजी लक्ष्मण चावडी ते एमजीएम या रस्त्याचे काम करण्याचा निर्णयही विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला आहे.राज्य सरकारने रस्त्यांच्या कामांसाठी गतवर्षी महानगरपालिकेला २४ कोटी ३३ लाख रुपयांचा विशेष निधी दिला होता. रस्त्यांची ही कामे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या देखरेखीखाली करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार समितीने पाच रस्ते व्हाईट टॅपिंगचे करण्याचा निर्णय घेऊन निविदा प्रक्रिया राबविली. त्यानंतर सेव्हन हिल ते सूतगिरणी चौक, गजानन महाराज मंदिर चौक ते जयभवानीनगर, संत तुकोबानगर ते कासलीवाल कॉर्नर आणि कामगार चौक ते महालक्ष्मी कॉलनी, या चार रस्त्यांची कामेही सुरू झाली. मात्र वर्ष उलटले तरी या चार रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांसह इतर अधिकारी उपस्थित होते. यामध्ये रस्त्यांची कामांची सद्य:स्थिती, त्यातील अडथळे आदींवर चर्चा झाली. त्यानंतर ही चारही कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला दोन महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच क्रांतीचौक ते महावीर चौक या रस्त्याऐवजी लक्ष्मण चावडी ते एमजीएम या रस्त्याचे काम करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे आता बऱ्याच दिवसांपासून रखडलेला हा रस्ता व्हाईट टॅपिंगचा होणार आहे.पाचव्या रस्त्याचे नव्याने टेंडरयाआधी एकच निविदा काढून पाचही रस्त्यांची कामे एकाच एजन्सीला दिली होती. मात्र, आता पाचव्या रस्त्याच्या कामात बदल झाल्यामुळे त्यासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. काही ठिकाणी ड्रेनेजलाईन स्थलांतरित करण्याच्या कारणामुळे रस्त्यांच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. ही बाब विचारात घेऊन अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची वेळ देण्यात आली आहे. शिवाय पाचव्या रस्त्यासाठीही निविदा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. - उमाकांत दांगट, विभागीय आयुक्तपर्यटनस्थळांजवळ माहिती फलक, रस्त्यांवर साईन बोर्डचोवीस कोटींच्या निधीपैकी पाच टक्के निधी रोड फर्निचरसाठी वापरण्याचे आदेश विभागीय आयुक्त दांगट यांनी दिले आहेत. त्यानुसार आता शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी साईन बोर्ड लावले जाणार आहेत. यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना कोणते ठिकाण कुठे आहे हे समजण्यास मदत मिळेल. शिवाय ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी माहिती फलकही लावण्यात येणार आहेत. या सर्वांवर साधारण १ कोटी २० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. शहरवासीयांची गैरसोयव्हाईट टॅपिंगच्या रस्त्यांचे काम रखडल्यामुळे शहरवासीयांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर रस्ता चार महिन्यांपासून खोदून ठेवला आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून ये- जा करणाऱ्या खड्ड्यांबरोबरच आधी धुळीचा आणि आता पावसाळ्यात चिखलाचा त्रास होतो आहे. याचप्रमाणे गजानन महाराज मंदिर चौकातून सूतगिरणीकडे जाणारा रस्ताही काही ठिकाणी खोदून ठेवण्यात आला.