शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्त्यांना दोन महिन्यांची डेडलाईन

By admin | Updated: July 22, 2016 00:47 IST

औरंगाबाद : चोवीस कोटींच्या निधीतील व्हाईट टॅपिंगच्या अर्धवट रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

औरंगाबाद : चोवीस कोटींच्या निधीतील व्हाईट टॅपिंगच्या अर्धवट रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच क्रांतीचौक ते महावीर चौक या पाचव्या नियोजित रस्त्याऐवजी लक्ष्मण चावडी ते एमजीएम या रस्त्याचे काम करण्याचा निर्णयही विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला आहे.राज्य सरकारने रस्त्यांच्या कामांसाठी गतवर्षी महानगरपालिकेला २४ कोटी ३३ लाख रुपयांचा विशेष निधी दिला होता. रस्त्यांची ही कामे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या देखरेखीखाली करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार समितीने पाच रस्ते व्हाईट टॅपिंगचे करण्याचा निर्णय घेऊन निविदा प्रक्रिया राबविली. त्यानंतर सेव्हन हिल ते सूतगिरणी चौक, गजानन महाराज मंदिर चौक ते जयभवानीनगर, संत तुकोबानगर ते कासलीवाल कॉर्नर आणि कामगार चौक ते महालक्ष्मी कॉलनी, या चार रस्त्यांची कामेही सुरू झाली. मात्र वर्ष उलटले तरी या चार रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांसह इतर अधिकारी उपस्थित होते. यामध्ये रस्त्यांची कामांची सद्य:स्थिती, त्यातील अडथळे आदींवर चर्चा झाली. त्यानंतर ही चारही कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला दोन महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच क्रांतीचौक ते महावीर चौक या रस्त्याऐवजी लक्ष्मण चावडी ते एमजीएम या रस्त्याचे काम करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे आता बऱ्याच दिवसांपासून रखडलेला हा रस्ता व्हाईट टॅपिंगचा होणार आहे.पाचव्या रस्त्याचे नव्याने टेंडरयाआधी एकच निविदा काढून पाचही रस्त्यांची कामे एकाच एजन्सीला दिली होती. मात्र, आता पाचव्या रस्त्याच्या कामात बदल झाल्यामुळे त्यासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. काही ठिकाणी ड्रेनेजलाईन स्थलांतरित करण्याच्या कारणामुळे रस्त्यांच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. ही बाब विचारात घेऊन अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची वेळ देण्यात आली आहे. शिवाय पाचव्या रस्त्यासाठीही निविदा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. - उमाकांत दांगट, विभागीय आयुक्तपर्यटनस्थळांजवळ माहिती फलक, रस्त्यांवर साईन बोर्डचोवीस कोटींच्या निधीपैकी पाच टक्के निधी रोड फर्निचरसाठी वापरण्याचे आदेश विभागीय आयुक्त दांगट यांनी दिले आहेत. त्यानुसार आता शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी साईन बोर्ड लावले जाणार आहेत. यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना कोणते ठिकाण कुठे आहे हे समजण्यास मदत मिळेल. शिवाय ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी माहिती फलकही लावण्यात येणार आहेत. या सर्वांवर साधारण १ कोटी २० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. शहरवासीयांची गैरसोयव्हाईट टॅपिंगच्या रस्त्यांचे काम रखडल्यामुळे शहरवासीयांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर रस्ता चार महिन्यांपासून खोदून ठेवला आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून ये- जा करणाऱ्या खड्ड्यांबरोबरच आधी धुळीचा आणि आता पावसाळ्यात चिखलाचा त्रास होतो आहे. याचप्रमाणे गजानन महाराज मंदिर चौकातून सूतगिरणीकडे जाणारा रस्ताही काही ठिकाणी खोदून ठेवण्यात आला.