शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

दोनशेवर शेतकर्‍यांची चेष्टा !

By admin | Updated: May 14, 2014 23:56 IST

परंडा : प्रशासनातील ताळमेळाअभावी २०० वर शेतकर्‍यांना मागील तीन वर्षांपासून अनुदानासाठी उंबरठे झिजवावे लागत असल्याचे समोर आले आहे

परंडा : शासनाने अनुदान देवूनही केवळ प्रशासनातील ताळमेळाअभावी २०० वर शेतकर्‍यांना मागील तीन वर्षांपासून अनुदानासाठी प्रशासनाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे समोर आले आहे. सदरील लाभार्थी शेतकर्‍यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सन २०११-२०१२ या आर्थिक वर्षामध्ये परंडा तालुक्यातील शेळगाव येथील २०० पेक्षा अधिक शेतकर्‍यांना कापसाचे अनुदान मंजूर झाले होते. ही रक्कम तहसील कार्यालयाकडे जमाही झाली होती. शेतकर्‍यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सदरील अनुदान त्या-त्या लाभार्थी शेतकर्‍यांना तातडीने वितरित करणे आवश्यक होते. परंतु, याही ठिकाणी आर्थिक संकटाच्या कात्रित सापडलेल्या शेतकर्‍याला प्रशासनाच्या लालफितीच्या कारभाराचा फटका सोसावा लागत असल्याचे दिसत आहे. तीन वर्षांचा कालावधी लोटला असतानाही लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळू शकले नाही. अनुदानाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून लाभार्थी शेतकरी तहसीलयात खेटे मारीत आहेत. परंतु, त्याचा प्रशासनावर तसूभरही फरक फडला नसल्याचे सध्याच्या चित्रावरून दिसून येते. अनुदान कशामुळे वितरित केले नाही? असा प्रश्न कार्यालयातील संबंधित कर्मचार्‍यांना केला असता त्यांच्याकडूनही उडवा उडविची उत्तरे मिळतात. त्यामुळे लाभार्थी शेतकर्‍यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत तहसीलदार शिवकुमार स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, एकाच गावातील शेतकर्‍यांना दोनदा अनुदान वाटप झाले आहे की नाही, याची तपासणी केली जाईल. तपासणीतून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. अनुदानाची संचिका तपासून हा प्रश्न तातडीने मार्गी लावू, असे ते म्हणाले. (वार्ताहर) १५ दिवसांची डेडलाईन कापसाच्या अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र रोष व्यक्त होत आहे. या शेतकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले असून पंधरा दिवसांत हा प्रश्न निकाली काढा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदनावर जिल्हा बँकेचे माजी संचालक अ‍ॅड. सुभाष मोरे, शेळगावचे सरपंच बाबासाहेब शेवाळे, विलास मोरे, रेवण दैन, सारिका शेवाळे, विजयसिंह मोरे यांच्यासह आदींची नावे आहेत. गारपीटग्रस्तांचीही थट्टा गारपिटीमुळे तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या फळबागांचे नुकसान झाले होते. पंचनामे करून प्रशासनाला अवाहलही सादर करण्यात आला आहे. परंतु, शेतकर्‍यांना अद्याप नुकसानभरपाई मिळू शकली नाही. याबाबत तहसीलदार स्वामी यांच्याकडे विचारणा केली असता, शासनाकडूनच पैसे आले नसल्याचे ते म्हणाले. कापसाच्या अनुदानासंबंधी वेळोवेळी तहसीलच्या संबंधित अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. मात्र, हा प्रश्न सुटला नाही. कालांतराने ही संचिकाच गायब झाली असल्याचे समजले. तर काहीजण हे अनुदान शेळगाव ऐवजी शिराळा येथील शेतकर्‍यांना वितरित केल्याचे सांगतात. असे असेल तर एकाच गावातील शेतकर्‍यांना दोनदा लाभ दिला कसा? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळे सत्य शेतकर्‍यांसमोर यावे, यासाठी सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. सुभाष मोरे यांनी केली आहे.