शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभागाचे दोनशे कोटी थकले

By admin | Updated: July 15, 2016 01:11 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका जलसंपदा विभागाच्या पाणीपट्टी वसुलीलाही बसला आहे. सिंचनाच्या पाणीपट्टीची वसुली जवळपास ठप्प झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका जलसंपदा विभागाच्या पाणीपट्टी वसुलीलाही बसला आहे. सिंचनाच्या पाणीपट्टीची वसुली जवळपास ठप्प झाली आहे. परिणामी थकबाकीचा आकडा वाढला आहे. सद्य:स्थितीत जलसंपदा खात्याचे सिंचन आणि बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीचे तब्बल दोनशे कोटी रुपये थकले आहेत. जलसंपदा विभागाच्या धरणांमधून सिंचनासाठी तसेच बिगर सिंचनासाठी (पिण्यासाठी, उद्योगांसाठी) पाणीपुरवठा केला जातो. त्याकरिता वेगवेगळ्या दराने पाणीपट्टी आकारली जाते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतीच्या पाणीपट्टीची वसुली जवळपास ठप्प झाली आहे. याशिवाय बिगर सिंचनाच्या थकीत पाणीपट्टीचा आकडाही वाढला आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) च्या औरंगाबाद मंडळांतर्गत सद्य:स्थितीत सिंचन आणि बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीचे तब्बल २०८ कोटी रुपये थकले आहेत. या मंडळांर्तगत औरंगाबाद, जालना आणि परभणी हे जिल्हे येतात.याशिवाय जायकवाडी धरणावरून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि नेवासा या दोन तालुक्यांतील काही भागालाही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ही सर्व पाणीपट्टी वरील तीन जिल्हे आणि शेवगाव व नेवासा ह्या दोन तालुक्यांमधील आहे. औरंगाबाद मंडळ कार्यालयांतर्गत जूनअखेरपर्यंत सिंचनाच्या पाणीपट्टीचे १०३ कोटी आणि बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीचे १०८ कोटी रुपये थकले आहेत. बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीमध्ये उद्योगांबरोबरच ग्रामपंचायती, नगर परिषदा आणि मनपाच्या थकीत पणीपट्टीचा समावेश आहे. आता जलसंपदा विभागाकडून थकबाकीच्या वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, १ एप्रिलपासून जूनअखेरपर्यंत या कार्यालयाने ५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यामध्ये सिंचनाची ४ लाख आणि बिगर सिंचनाची ५ कोटी ८५ लाख रुपये इतकी पाणीपट्टी आहे. चालू वर्षात सुमारे ३५ कोटी रुपयांची पाणीपट्टी आकारणी होण्याचा अंदाज आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचनाची अपेक्षित पाणीपट्टी वसुली झाली नाही. आता सिंचन आणि बिगर सिंचन या दोन्ही पाणीपट्टींच्या वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चालू वर्षाच्या पाणीपट्टीसोबतच थकबाकीचीही वसुली केली जाणार आहे. - जे. एन. हिरे, सहायक अधीक्षक अभियंता, कडा