शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

जलसंपदा विभागाचे दोनशे कोटी थकले

By admin | Updated: July 15, 2016 01:11 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका जलसंपदा विभागाच्या पाणीपट्टी वसुलीलाही बसला आहे. सिंचनाच्या पाणीपट्टीची वसुली जवळपास ठप्प झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका जलसंपदा विभागाच्या पाणीपट्टी वसुलीलाही बसला आहे. सिंचनाच्या पाणीपट्टीची वसुली जवळपास ठप्प झाली आहे. परिणामी थकबाकीचा आकडा वाढला आहे. सद्य:स्थितीत जलसंपदा खात्याचे सिंचन आणि बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीचे तब्बल दोनशे कोटी रुपये थकले आहेत. जलसंपदा विभागाच्या धरणांमधून सिंचनासाठी तसेच बिगर सिंचनासाठी (पिण्यासाठी, उद्योगांसाठी) पाणीपुरवठा केला जातो. त्याकरिता वेगवेगळ्या दराने पाणीपट्टी आकारली जाते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतीच्या पाणीपट्टीची वसुली जवळपास ठप्प झाली आहे. याशिवाय बिगर सिंचनाच्या थकीत पाणीपट्टीचा आकडाही वाढला आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) च्या औरंगाबाद मंडळांतर्गत सद्य:स्थितीत सिंचन आणि बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीचे तब्बल २०८ कोटी रुपये थकले आहेत. या मंडळांर्तगत औरंगाबाद, जालना आणि परभणी हे जिल्हे येतात.याशिवाय जायकवाडी धरणावरून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि नेवासा या दोन तालुक्यांतील काही भागालाही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ही सर्व पाणीपट्टी वरील तीन जिल्हे आणि शेवगाव व नेवासा ह्या दोन तालुक्यांमधील आहे. औरंगाबाद मंडळ कार्यालयांतर्गत जूनअखेरपर्यंत सिंचनाच्या पाणीपट्टीचे १०३ कोटी आणि बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीचे १०८ कोटी रुपये थकले आहेत. बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीमध्ये उद्योगांबरोबरच ग्रामपंचायती, नगर परिषदा आणि मनपाच्या थकीत पणीपट्टीचा समावेश आहे. आता जलसंपदा विभागाकडून थकबाकीच्या वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, १ एप्रिलपासून जूनअखेरपर्यंत या कार्यालयाने ५ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यामध्ये सिंचनाची ४ लाख आणि बिगर सिंचनाची ५ कोटी ८५ लाख रुपये इतकी पाणीपट्टी आहे. चालू वर्षात सुमारे ३५ कोटी रुपयांची पाणीपट्टी आकारणी होण्याचा अंदाज आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचनाची अपेक्षित पाणीपट्टी वसुली झाली नाही. आता सिंचन आणि बिगर सिंचन या दोन्ही पाणीपट्टींच्या वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चालू वर्षाच्या पाणीपट्टीसोबतच थकबाकीचीही वसुली केली जाणार आहे. - जे. एन. हिरे, सहायक अधीक्षक अभियंता, कडा