शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

रिक्षाचालकांना दोनशे ते १८ हजारांपर्यंत दंड

By admin | Updated: April 22, 2016 00:58 IST

औरंगाबाद : शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर कारवाई करण्याऐवजी प्रत्येक वेळी कारवाईसाठी रिक्षालाच टार्गेट केले जात आहे.

औरंगाबाद : शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर कारवाई करण्याऐवजी प्रत्येक वेळी कारवाईसाठी रिक्षालाच टार्गेट केले जात आहे. कारवाईदरम्यान २०० ते १८ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जात आहे. एवढी मोठी रक्कम आणण्यासाठी घरातील महिलांचे मंगळसूत्र विकण्याची वेळ येत आहे; परंतु त्याचे आरटीओ प्रशासनाला काही देणे नसल्याचे म्हणत गुरुवारी अनेक रिक्षाचालक ांनी संताप व्यक्त केला.शहरात २० एप्रिलपासून परमिट नसणे, साईड रॉड नसणे, पाठीमागील बाजू बंद नसणे यांसह बेशिस्त रिक्षांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी १६५ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. गुरुवारीदेखील नियम मोडणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दंड आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी रिक्षाचालकांची आरटीओ कार्यालयात गर्दी झाली होती. दंडाविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दंडाच्या रकमेमुळे दोन-दोन महिने रिक्षा सोडविता येत नाही. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. गेल्या काही महिन्यांत वेळोवेळी आरटीओ कार्यालयाकडून केवळ रिक्षांवरच कारवाई केली जात आहे. प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी खाजगी वाहने, बसेस यांच्यावर कारवाई करण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे, असे रिक्षाचालकांनी म्हटले. महिनाभरापूर्वी झालेल्या कारवाईत १८ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला. तो भरण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्र विकण्याची वेळ आल्याचे यावेळी एका रिक्षाचालकाने म्हटले. रिक्षाचालक वाहतूक नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करतात. वर्षानुवर्षे परमिट, लायसन्ससह कागदपत्रांचे नूतनीकरण करून घेत नाहीत. त्यामुळेच कारवाई करण्याची वेळ येत असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.