शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

रिक्षाचालकांना दोनशे ते १८ हजारांपर्यंत दंड

By admin | Updated: April 22, 2016 00:58 IST

औरंगाबाद : शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर कारवाई करण्याऐवजी प्रत्येक वेळी कारवाईसाठी रिक्षालाच टार्गेट केले जात आहे.

औरंगाबाद : शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर कारवाई करण्याऐवजी प्रत्येक वेळी कारवाईसाठी रिक्षालाच टार्गेट केले जात आहे. कारवाईदरम्यान २०० ते १८ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जात आहे. एवढी मोठी रक्कम आणण्यासाठी घरातील महिलांचे मंगळसूत्र विकण्याची वेळ येत आहे; परंतु त्याचे आरटीओ प्रशासनाला काही देणे नसल्याचे म्हणत गुरुवारी अनेक रिक्षाचालक ांनी संताप व्यक्त केला.शहरात २० एप्रिलपासून परमिट नसणे, साईड रॉड नसणे, पाठीमागील बाजू बंद नसणे यांसह बेशिस्त रिक्षांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी १६५ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. गुरुवारीदेखील नियम मोडणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दंड आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी रिक्षाचालकांची आरटीओ कार्यालयात गर्दी झाली होती. दंडाविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दंडाच्या रकमेमुळे दोन-दोन महिने रिक्षा सोडविता येत नाही. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. गेल्या काही महिन्यांत वेळोवेळी आरटीओ कार्यालयाकडून केवळ रिक्षांवरच कारवाई केली जात आहे. प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी खाजगी वाहने, बसेस यांच्यावर कारवाई करण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे, असे रिक्षाचालकांनी म्हटले. महिनाभरापूर्वी झालेल्या कारवाईत १८ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला. तो भरण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्र विकण्याची वेळ आल्याचे यावेळी एका रिक्षाचालकाने म्हटले. रिक्षाचालक वाहतूक नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करतात. वर्षानुवर्षे परमिट, लायसन्ससह कागदपत्रांचे नूतनीकरण करून घेत नाहीत. त्यामुळेच कारवाई करण्याची वेळ येत असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.