शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

दोन गटांचे मनोमिलन भाजपाला फलदायी

By admin | Updated: May 18, 2014 00:48 IST

उदगीर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला पोषक वातावरण असताना स्थानिक नेतृत्वामध्ये मात्र मागच्या दोन वर्षापासून मोठा संघर्ष पेटला होता़

 उदगीर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला पोषक वातावरण असताना स्थानिक नेतृत्वामध्ये मात्र मागच्या दोन वर्षापासून मोठा संघर्ष पेटला होता़ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संघर्षात अधिकच भर पडली़ उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव हे स्वत: निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते़ भाजपातील काही नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी अनेकदा ‘दिल्ली’वारी केली़ मात्र आ़ भालेरावांनी कसल्याही परिस्थितीत उमेदवारी मिळू नये़ यासाठी माजी आ़ गोविंदराव केंद्रे यांचा गट आग्रही होता़ या गटाने माजी आ़टी़पी़ कांबळे यांचे नाव पुढे केले़ या परिस्थितीत प्रबळ दावेदार आपणच आहोत असा दावा ठोकत गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले डॉ़ सुनील गायकवाड यांनीही उमेदवारी मिळविण्यासाठी आपले प्रयत्न सुरु ठेवले होते़ लातूरच्या उमेदवारीचा प्रश्न शेवटपर्यंत ताटकळत राहिला असताना अखेरच्या क्षणी भाजपाने डॉ़ सुनील गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली़ डॉ़ गायकवाड यांची उमेदवारी जाहीर होताच आ़ सुधाकर भालेराव यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली़ खाजगी वृत्त वाहिन्यांना मुलाखती देवून पक्ष नेतृत्वावर आक्रमक होऊन टीका केली़ त्यामुळे भाजपातील संघर्ष अधिकच पेटल होता़ या परिस्थितीत भाजपाच्या माजी खा़ रूपाताई पाटील यांनी शिष्टाई करीत भालेरावांची नाराजी दूर करून त्यांना प्राचाराच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतले़ उदगीरच्या दोन गटात असलेला बेबनाव दूर करण्यासाठी दोन्ही नेत्यांना एकत्र आणून डोंगरशेळकी व हत्तीबेटावर मनोमिलन झाल्याने जाहीर करण्यात आले़ त्यानंतर मात्र दोन-चार दिवसांतच या दोन्ही गटांनी प्रचाराच्या दोन स्वतंत्र यंत्रणा राबविल्या़ दोन्ही गटाच्या नेत्यांनी भाजपासाठी मते मागत असताना मतदारांतूनच उत्स्फूर्तपणे भाजपाला म्हणून मोदी लाटेला समोर ठेवून मतदान करणार असल्याच्या प्रतिक्रिया आल्या़ मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपाला पाच पटीपेक्षा जास्तीचे मताधिक्य मिळाले आहे़ निवडणुकीच्या काळात भाजपाची कुठलीच मोठी सभा झाली नाही़ याला कारणही अंतर्गत असलेली धुसफूस आडवी आली़ जळकोट येथे आ़ विनोद तावडे यांची झालेली सभा या दोन सभांचा वातावरण निर्मितीसाठी म्हणावा तितका प्रभाव पडणारा नव्हता़ मुळातच काँग्रेस नेतृत्वाविरूद्धची नाराजी असल्यामुळे या नाराजीचा फटका काँग्रेसला बसला़ माजी खा़ रूपाताई पाटील यांनी आमदार सुधाकर भालेराव यांची नाराजी दूर केल्याने त्यांनी प्रचारात सहभाग नोंदविला़ तसेच मतदारसंघात दोन गटांना एकत्रित आणून मनोमिलन घडविले़ त्यातून भाजपाचा मार्ग सुकर झाला़ आमदार सुधाकर भालेराव व माजी आ़ गोविंद केंद्रे यांच्या गटाच्या प्रचार यंत्रणा स्वतंत्रपणे राबल्यिा गेल्या़ त्यामुळे कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचले़ परिणामी, मताधिक्य वाढले आहे़