शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

गेवराईत दोन, माजलगावात एकाचा खून

By admin | Updated: September 10, 2015 00:33 IST

गेवराई/माजलगाव : जिल्ह्यात खुन प्रकरणे वाढत असून बुधवारी पुन्हा खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत

गेवराई/माजलगाव : जिल्ह्यात खुन प्रकरणे वाढत असून बुधवारी पुन्हा खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. शिक्षकाच्या बदलीच्या कारणावरुन गेवराई तालुक्यातील सुलतानपुरमध्ये दोन गटात मारामाऱ्या झाल्या. शिक्षकाने दोघांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामुळे ते दोघे मयत झाले तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर क्षुल्लक कारणावरुन माजलगावमध्ये एकाचा खुन करण्यात आला. माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील अंगद रामप्रसाद इंगळे (वय २० वर्षे) या युवकांचा चाकुने भोसकून खुन केल्याची घटना बुधवारी साय ५च्या सुमारास घडली. माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील अंगद रामप्रसाद इंगळे व इतर युवक बाजार तळावर बसले होते. यावेळी किशोर लक्ष्मण मंगुळवार हा तीथे आला. त्या ठिकाणी अंगद इंगळे व किशोर मंगुळवार यांच्यात क्षुल्लक कारणावरून शाब्दीक चकमक झाली असता, किशोर मंगळवार यांने अंगद इंगळे यांचा गळा दाबुन पोटावर चाकुने वार केला. यामध्ये अंगद इंगळेचा मृत्यु झाला. त्यास माजलगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.दुसरी घटना गेवराई तालुक्यातील सुलतानपुर येथे घडली. सुलतानपुर येथील जिल्हा परिषदेतील शिक्षकाने मुकूंद खेत्रे याने शाळेतून एका विद्यार्थ्यास हाकलुन दिले होते. त्यामुळे त्याचे आई-वडील शाळेत गेले असता शिक्षक खेत्रे यांनीही त्यांनाही हाकलुन दिले होते. त्यामुळे दहा ते बारा ग्रामस्थांनी जि.प. अध्यक्ष व शिक्षण विभागाकडे त्यांच्या बदलीची मागणी केली होती. याचा राग खेत्रे यांच्या मनात होता. दरम्यान बुधवारी रात्री गावातील विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे महादेव रामप्रसाद खेत्रे व योगेश लक्ष्मण खेत्रे तसेच दीपक बनकर हे डीपीकडे गेले होते. अंधाराचा फायदा घेत शिक्षक मुकुंद खेत्रे याने महादेव खेत्रे व योगेश खेत्रे यांच्यावर चाकूचे वार केले. यामुळे ते दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्याला दीपक बनकर याने प्रतिरोध केला असता त्याच्यावरही शिक्षक खेत्रे याने वार केले. यामुळे तो गंभीर जखमी झाला. या तिघांना जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले. तर दीपक बनकर हा जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर पोलीस गावात दाखल झाले होते. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, गावातील लोकांचे जवाब घेण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री दहा वाजता सुरू होती. (वार्ताहर)