शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

गेवराईत दोन, माजलगावात एकाचा खून

By admin | Updated: September 10, 2015 00:33 IST

गेवराई/माजलगाव : जिल्ह्यात खुन प्रकरणे वाढत असून बुधवारी पुन्हा खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत

गेवराई/माजलगाव : जिल्ह्यात खुन प्रकरणे वाढत असून बुधवारी पुन्हा खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. शिक्षकाच्या बदलीच्या कारणावरुन गेवराई तालुक्यातील सुलतानपुरमध्ये दोन गटात मारामाऱ्या झाल्या. शिक्षकाने दोघांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामुळे ते दोघे मयत झाले तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर क्षुल्लक कारणावरुन माजलगावमध्ये एकाचा खुन करण्यात आला. माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील अंगद रामप्रसाद इंगळे (वय २० वर्षे) या युवकांचा चाकुने भोसकून खुन केल्याची घटना बुधवारी साय ५च्या सुमारास घडली. माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील अंगद रामप्रसाद इंगळे व इतर युवक बाजार तळावर बसले होते. यावेळी किशोर लक्ष्मण मंगुळवार हा तीथे आला. त्या ठिकाणी अंगद इंगळे व किशोर मंगुळवार यांच्यात क्षुल्लक कारणावरून शाब्दीक चकमक झाली असता, किशोर मंगळवार यांने अंगद इंगळे यांचा गळा दाबुन पोटावर चाकुने वार केला. यामध्ये अंगद इंगळेचा मृत्यु झाला. त्यास माजलगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.दुसरी घटना गेवराई तालुक्यातील सुलतानपुर येथे घडली. सुलतानपुर येथील जिल्हा परिषदेतील शिक्षकाने मुकूंद खेत्रे याने शाळेतून एका विद्यार्थ्यास हाकलुन दिले होते. त्यामुळे त्याचे आई-वडील शाळेत गेले असता शिक्षक खेत्रे यांनीही त्यांनाही हाकलुन दिले होते. त्यामुळे दहा ते बारा ग्रामस्थांनी जि.प. अध्यक्ष व शिक्षण विभागाकडे त्यांच्या बदलीची मागणी केली होती. याचा राग खेत्रे यांच्या मनात होता. दरम्यान बुधवारी रात्री गावातील विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे महादेव रामप्रसाद खेत्रे व योगेश लक्ष्मण खेत्रे तसेच दीपक बनकर हे डीपीकडे गेले होते. अंधाराचा फायदा घेत शिक्षक मुकुंद खेत्रे याने महादेव खेत्रे व योगेश खेत्रे यांच्यावर चाकूचे वार केले. यामुळे ते दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्याला दीपक बनकर याने प्रतिरोध केला असता त्याच्यावरही शिक्षक खेत्रे याने वार केले. यामुळे तो गंभीर जखमी झाला. या तिघांना जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले. तर दीपक बनकर हा जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर पोलीस गावात दाखल झाले होते. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, गावातील लोकांचे जवाब घेण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री दहा वाजता सुरू होती. (वार्ताहर)