शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

गेवराईत दोन, माजलगावात एकाचा खून

By admin | Updated: September 10, 2015 00:33 IST

गेवराई/माजलगाव : जिल्ह्यात खुन प्रकरणे वाढत असून बुधवारी पुन्हा खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत

गेवराई/माजलगाव : जिल्ह्यात खुन प्रकरणे वाढत असून बुधवारी पुन्हा खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. शिक्षकाच्या बदलीच्या कारणावरुन गेवराई तालुक्यातील सुलतानपुरमध्ये दोन गटात मारामाऱ्या झाल्या. शिक्षकाने दोघांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामुळे ते दोघे मयत झाले तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर क्षुल्लक कारणावरुन माजलगावमध्ये एकाचा खुन करण्यात आला. माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील अंगद रामप्रसाद इंगळे (वय २० वर्षे) या युवकांचा चाकुने भोसकून खुन केल्याची घटना बुधवारी साय ५च्या सुमारास घडली. माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील अंगद रामप्रसाद इंगळे व इतर युवक बाजार तळावर बसले होते. यावेळी किशोर लक्ष्मण मंगुळवार हा तीथे आला. त्या ठिकाणी अंगद इंगळे व किशोर मंगुळवार यांच्यात क्षुल्लक कारणावरून शाब्दीक चकमक झाली असता, किशोर मंगळवार यांने अंगद इंगळे यांचा गळा दाबुन पोटावर चाकुने वार केला. यामध्ये अंगद इंगळेचा मृत्यु झाला. त्यास माजलगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.दुसरी घटना गेवराई तालुक्यातील सुलतानपुर येथे घडली. सुलतानपुर येथील जिल्हा परिषदेतील शिक्षकाने मुकूंद खेत्रे याने शाळेतून एका विद्यार्थ्यास हाकलुन दिले होते. त्यामुळे त्याचे आई-वडील शाळेत गेले असता शिक्षक खेत्रे यांनीही त्यांनाही हाकलुन दिले होते. त्यामुळे दहा ते बारा ग्रामस्थांनी जि.प. अध्यक्ष व शिक्षण विभागाकडे त्यांच्या बदलीची मागणी केली होती. याचा राग खेत्रे यांच्या मनात होता. दरम्यान बुधवारी रात्री गावातील विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे महादेव रामप्रसाद खेत्रे व योगेश लक्ष्मण खेत्रे तसेच दीपक बनकर हे डीपीकडे गेले होते. अंधाराचा फायदा घेत शिक्षक मुकुंद खेत्रे याने महादेव खेत्रे व योगेश खेत्रे यांच्यावर चाकूचे वार केले. यामुळे ते दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्याला दीपक बनकर याने प्रतिरोध केला असता त्याच्यावरही शिक्षक खेत्रे याने वार केले. यामुळे तो गंभीर जखमी झाला. या तिघांना जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले. तर दीपक बनकर हा जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर पोलीस गावात दाखल झाले होते. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, गावातील लोकांचे जवाब घेण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री दहा वाजता सुरू होती. (वार्ताहर)