शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

दोन शेतकर्‍यांनी नैराश्येतूनच आत्महत्या केल्याचे निष्पन्न

By admin | Updated: June 5, 2014 00:50 IST

बदनापूर : तालुक्यात दोन शेतकर्‍यांनी कर्ज व गारपिटीमुळे शेतीचे झालेले नुकसान यातून नैराश्येपोटी आत्महत्या केली.

बदनापूर : तालुक्यात दोन शेतकर्‍यांनी कर्ज व गारपिटीमुळे शेतीचे झालेले नुकसान यातून नैराश्येपोटी आत्महत्या केली. तहसीलदार, कृषी अधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्या चौकशीतून हे निष्पन्न झाले आहे. चनेगाव येथील शेतकरी पाटीलबा आबाजी मुटकुळे (वय ७५ ) यांनी २७ मे रोजी राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली होती. तसेच तुपेवाडी येथील लक्ष्मण आसाराम मांडगे यांनी ३१ मे रोजी हिस्वन शिवारात (ता. जालना) रेल्वे रुळावर आत्महत्या केली होती. या दोन्ही घटनांबाबत २ जून रोजी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व पोलीस निरीक्षक या तीन सदस्यीय समितीने चौकशी केली. या चौकशीबाबत तहसीलदार बालाजी क्षीरसागर म्हणाले की, मयत शेतकरी पाटीलबा आबाजी मुटकुळे यांच्या कुटुंबियांच्या नावे २५ एक र शेती असून या कुटुंबियांच्या नावावर स्टेट बँक आॅफ इंडिया राजूर शाखेचे ८ लाख रूपयांचे कर्ज आहे. तसेच मयत शेतकरी लक्ष्मण आसाराम मांडगे यांच्या नावे इंडियन ओव्हरसीज बँक शाखा जालनाचे १ लाख ५० हजार रूपयांचे कर्ज असून १ हे २९ आर शेतजमीन आहे. या दोन्ही शेतकर्‍यांच्या जमिनीतील गहू, कापूस, ज्वारी, बाजरी अशा पिकांचे गारपिटीमुळे नुकसान झाले. तसेच मागील वर्षीही शेतीचे ५० पैशापेक्षा कमी उत्पन्न झाले. यामुळे या दोन्ही शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले असून या शेतकर्‍यांच्या कुटुंबातील वारसाला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. या चौकशीत ग्रामस्थांचे जबाब पंचनामे व अन्य विहित नमुन्यात अहवाल असून हा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला आहे.