शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

अडीच लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा फायदा

By admin | Updated: June 12, 2017 00:01 IST

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन शेतकऱ्यांचे विविध बॅकांचे एक हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज माफ होईल़

श्रीनिवास भोसले। लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिली आहे़ सदर निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास नांदेड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन शेतकऱ्यांचे विविध बॅकांचे एक हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज माफ होईल़ शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू करा यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारून आंदोलन सुरू केले़ दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी शहरात येणारे दूध, भाजीपाला बंद करून तो रस्त्यावर फेकून देत शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला़ त्यातच सरकारने अल्पभूधारकांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेत आंदोलनाची तीव्रता कमी केली़ परंतु, शेतकरी संघटनांनी तो मान्य नसून सरसकट कर्जमाफीच पाहिजे, अशी मागणी करीत आंदोलन सुरू केले़ या मुद्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीने सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला़ त्यातच रविवारी मुख्यमंत्री फडणवीस सरकारने तत्त्वत: कर्जमाफीचा निर्णय घेतला असून त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे कर्ज माफ होणार आहे़ नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खासगी व सरकारी बँकांचे जवळपास एक हजार ५४१ कोटी ९१ लाख रूपयांचे कर्ज आहे़ यामध्ये पीककर्ज खरीप, रबीच्या कर्जाचा समावेश आहे़ तसेच एचडीएफसी, एक्सीस, कर्नाटका, करूर वैश्य, डीसीबी, कोटक महिन्द्रा बँक अशा खासगी बँकांचे १ लाख ४६ हजार ५९७ शेतकऱ्यांनी १ हजार १३२ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.महाराष्ट्र ग्रामीण बँक व महाराष्ट्र सहकारी बँक व जिल्हा बँक असे मिळून ६८ हजार ७५९ शेतकऱ्यांंकडे १५१ कोटी ३९ लाख तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक व इतर बँकेचे ४३ हजार २८ शेतकऱ्यांकडे जवळपास २५८ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज आहे़ खाजगी आणि सरकारी बँकांचे मिळून एकूण १ हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर असून सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील २ लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होणार आहे़ सदरील कर्ज हे पीककर्ज स्वरूपात आहे़ दरम्यान, शेतकऱ्यांच्या पीकविम्यातून कर्जाची रक्कम कपात करू नये असा निर्णय असूनदेखील काही बँकांनी बँकेत जमा झालेल्या पीकविम्यातून कर्जाचे हप्ते कपात करून घेतले आहेत़ कर्जमाफीमुळे पीकविम्यातून कपात केलेली रक्कम कशी परत मिळणार, असा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडला आहे़