शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

अडीच लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा फायदा

By admin | Updated: June 12, 2017 00:01 IST

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन शेतकऱ्यांचे विविध बॅकांचे एक हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज माफ होईल़

श्रीनिवास भोसले। लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिली आहे़ सदर निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास नांदेड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन शेतकऱ्यांचे विविध बॅकांचे एक हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज माफ होईल़ शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू करा यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारून आंदोलन सुरू केले़ दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी शहरात येणारे दूध, भाजीपाला बंद करून तो रस्त्यावर फेकून देत शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला़ त्यातच सरकारने अल्पभूधारकांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेत आंदोलनाची तीव्रता कमी केली़ परंतु, शेतकरी संघटनांनी तो मान्य नसून सरसकट कर्जमाफीच पाहिजे, अशी मागणी करीत आंदोलन सुरू केले़ या मुद्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीने सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला़ त्यातच रविवारी मुख्यमंत्री फडणवीस सरकारने तत्त्वत: कर्जमाफीचा निर्णय घेतला असून त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे कर्ज माफ होणार आहे़ नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खासगी व सरकारी बँकांचे जवळपास एक हजार ५४१ कोटी ९१ लाख रूपयांचे कर्ज आहे़ यामध्ये पीककर्ज खरीप, रबीच्या कर्जाचा समावेश आहे़ तसेच एचडीएफसी, एक्सीस, कर्नाटका, करूर वैश्य, डीसीबी, कोटक महिन्द्रा बँक अशा खासगी बँकांचे १ लाख ४६ हजार ५९७ शेतकऱ्यांनी १ हजार १३२ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.महाराष्ट्र ग्रामीण बँक व महाराष्ट्र सहकारी बँक व जिल्हा बँक असे मिळून ६८ हजार ७५९ शेतकऱ्यांंकडे १५१ कोटी ३९ लाख तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक व इतर बँकेचे ४३ हजार २८ शेतकऱ्यांकडे जवळपास २५८ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज आहे़ खाजगी आणि सरकारी बँकांचे मिळून एकूण १ हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर असून सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील २ लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होणार आहे़ सदरील कर्ज हे पीककर्ज स्वरूपात आहे़ दरम्यान, शेतकऱ्यांच्या पीकविम्यातून कर्जाची रक्कम कपात करू नये असा निर्णय असूनदेखील काही बँकांनी बँकेत जमा झालेल्या पीकविम्यातून कर्जाचे हप्ते कपात करून घेतले आहेत़ कर्जमाफीमुळे पीकविम्यातून कपात केलेली रक्कम कशी परत मिळणार, असा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडला आहे़