शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

नव्या योजनेसाठी अडीच कोटी

By admin | Updated: July 13, 2014 00:21 IST

परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यास सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाली आहे.

परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यास सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या योजनेसाठी ४० कोटी रुपये मिळतील.परभणी शहराला सध्या ३० वर्षांपूर्वीच्या जुन्या योजनेतूनच पाणीपुरवठा केला जातो. राहाटी येथील बंधाऱ्यातून शहरात पाणी येते. जलवाहिनीला गळती असल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर आहे. मागील काही वर्षांत शहराची लोकसंख्या वाढली. परंतु जुन्या योजनतूनच पाणी पुरविले जाते. त्यामुळे हे पाणी अपुरे पडत आहे. त्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. जिंतूर तालुक्यातील येलदरी येथून थेट परभणीत पाणी आणण्यात येणार असून, त्याचे पहिल्याचे टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामाला अजून सुरूवात झाली नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरात जलवाहिनी अंथरणे, जलकुंभ उभारणे अशी कामे होणार आहेत.या कामाला गती देऊन पूर्ण करावयाचे झाल्यास त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. हा निधी उभारण्यासाठी मनपाला लोकवाटा जमा करणे गरजेचे असल्याने हा प्रश्न दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी उचलून धरला. तेराव्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत आलेल्या अडीच कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठा व वीज देयक भरण्यासाठी वापरावा, अशी सूचना वाघमारे यांनी केली. जर हा निधी लोकवाटा भरण्यासाठी वापरल्यास आपल्याला शासनाकडून ४० कोटी रुपये येतील व पाणीपुरवठा योजना जलदगतीने राबविता येईल, असे त्यांनी सांगितले. सभागृहाने हा मुद्दा मान्य करीत पाणीपुरवठा योजना आणि वीजबिलासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद केली. (प्रतिनिधी)शहराला पाणीटंचाईचे चटकेशहरात सध्या नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ८ ते १० दिवसांतून एक वेळ शहरवासियांना पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. मनपाकडे पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागते. मनपाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्यास हा प्रश्न सुटू शकतो. पाणीप्रश्नावरही अनेक नगरसेवकांनी आपली नाराजी सभागृहासमोर मांडली.