शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

सव्वा लाख कुटुंब उघड्यावर !

By admin | Updated: August 8, 2016 00:41 IST

आशपाक पठाण , लातूर शौचालय बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वारंवार जनजागृती करूनही लातूर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ग्रामीण भागात अजूनही

आशपाक पठाण , लातूरशौचालय बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वारंवार जनजागृती करूनही लातूर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ग्रामीण भागात अजूनही लोकांची मानसिकता बदलली नसल्याने जिल्हाभरात जवळपास सव्वा लाख कुटुंब उघड्यावर जातात. शौचालयाचे महत्व पटवून देत बांधकामाला परावृत्त करण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा ‘भेटी-गाठी स्वच्छतेसाठी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. टंचाईमुळे रखडलेली कामे पाऊस पडल्यानंतर मार्गी लागतील, या अपेक्षेने जिल्हा परिषदेकडून नव्याने मोहीम हाती घेण्यात आली आहे.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यभरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात गृहभेट अभियान मोहीम हाती घेतली आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देऊन त्यांना शौचालयाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. शौचालयाचा वापर हा सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण असल्याची जाणीव निर्माण करून देण्याचे काम शासनामार्फत केले जाणार आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात ६१ हजार गृहभेटींद्वारे थेट कुटुंब प्रमुखाशी संंवाद साधला जाणार आहे. जिल्ह्यात ३ लाख २० हजार कुटुंब संख्या असून, यातील १ लाख १६ हजार कुटुंबांकडे अद्यापही शौचालय बांधलेले नाही. शौचालय बांधावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी नियोजन केले असून, वर्षभरात ६१ हजार शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर वाढावा, यासाठी २८४ ग्रामपंचायतींच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जलस्वराज्य, निर्मलग्राम योजनेच्या माध्यमातून अनेक गावे कागदोपत्री हागणदारीमुक्त झाली. या गावांनी शासनाचे पुरस्कारही घेतले. गावाबाहेर हागणदारीमुक्त गाव असे फलकही झळकले. मात्र हे फलक केवळ दिशाभूल करणारेच ठरले. शासनाचा निधी मिळेपर्यंत दिखावा करणारी गावे आता उघडी पडली आहेत. दुर्गंधीने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना शौचालयाबरोबरच आरोग्याचे महत्व पटवून देण्याची वेळ पुन्हा शासनावर आली आहे. त्यानुसार नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे.