शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

सव्वा लाख कुटुंब उघड्यावर !

By admin | Updated: August 8, 2016 00:41 IST

आशपाक पठाण , लातूर शौचालय बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वारंवार जनजागृती करूनही लातूर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ग्रामीण भागात अजूनही

आशपाक पठाण , लातूरशौचालय बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वारंवार जनजागृती करूनही लातूर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ग्रामीण भागात अजूनही लोकांची मानसिकता बदलली नसल्याने जिल्हाभरात जवळपास सव्वा लाख कुटुंब उघड्यावर जातात. शौचालयाचे महत्व पटवून देत बांधकामाला परावृत्त करण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा ‘भेटी-गाठी स्वच्छतेसाठी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. टंचाईमुळे रखडलेली कामे पाऊस पडल्यानंतर मार्गी लागतील, या अपेक्षेने जिल्हा परिषदेकडून नव्याने मोहीम हाती घेण्यात आली आहे.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यभरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात गृहभेट अभियान मोहीम हाती घेतली आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देऊन त्यांना शौचालयाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. शौचालयाचा वापर हा सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण असल्याची जाणीव निर्माण करून देण्याचे काम शासनामार्फत केले जाणार आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात ६१ हजार गृहभेटींद्वारे थेट कुटुंब प्रमुखाशी संंवाद साधला जाणार आहे. जिल्ह्यात ३ लाख २० हजार कुटुंब संख्या असून, यातील १ लाख १६ हजार कुटुंबांकडे अद्यापही शौचालय बांधलेले नाही. शौचालय बांधावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी नियोजन केले असून, वर्षभरात ६१ हजार शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर वाढावा, यासाठी २८४ ग्रामपंचायतींच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जलस्वराज्य, निर्मलग्राम योजनेच्या माध्यमातून अनेक गावे कागदोपत्री हागणदारीमुक्त झाली. या गावांनी शासनाचे पुरस्कारही घेतले. गावाबाहेर हागणदारीमुक्त गाव असे फलकही झळकले. मात्र हे फलक केवळ दिशाभूल करणारेच ठरले. शासनाचा निधी मिळेपर्यंत दिखावा करणारी गावे आता उघडी पडली आहेत. दुर्गंधीने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना शौचालयाबरोबरच आरोग्याचे महत्व पटवून देण्याची वेळ पुन्हा शासनावर आली आहे. त्यानुसार नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे.