शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

ठिबकचे १२९ कोटी थकले

By admin | Updated: June 16, 2016 00:12 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी शेतीत ठिबक सिंचनाचा अवलंब करणाऱ्या मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचे अनुदान सरकारने थकविले आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादपाण्याच्या सुयोग्य वापरासाठी शेतीत ठिबक सिंचनाचा अवलंब करणाऱ्या मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचे अनुदान सरकारने थकविले आहे. सलग तीन वर्ष सरकारने विभागास मंजूर अनुदानापेक्षा कमी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे विभागातील सुमारे ३० हजार शेतकऱ्यांचे तब्बल १२९ कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे. शासकीय अनुदानाच्या भरवशावर बहुसंख्य शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा उसनवारी करून ठिबक संच बसविलेले आहेत. परिणामी अनुदानच रखडल्यामुळे आता हे शेतकरी अडचणीत आले आहेत.शेतीत पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान राबविले जाते. याअंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन संच बसविण्यासाठी शेतकऱ्यांना ४५ टक्क्यांपर्यंतचे अनुदान दिले जाते. त्यासाठी आधी शेतकऱ्याने स्वत: संपूर्ण रक्कम खर्च करून हे संच बसवायचे असतात. त्यानंतर कृषी विभागाकडून अनुदानाची देय रक्कम अदा केली जाते. मागील काही वर्षांपासून सतत पाण्याचे दुर्भिक्ष भासत असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये सूक्ष्म सिंचनाविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली आहे. म्हणूनच अडचणीत असूनही येथील शेतकरी ठिबक संच बसवीत आहेत. मात्र, आता शासनाकडून वेळेत अनुदानाची रक्कम मिळत नसल्यामुळे (पान २ वर)एकीकडे सरकार ठिबकसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करते आणि दुसरीकडे त्यांचे अनुदान थकविते हे चुकीचे आहे. विभागातील असंख्य शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन ठिबक संच बसविले होते. अजूनही त्यांना अनुदान मिळालेले नाही. शासन त्यावर निर्णय घेत नाही. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.- जयाजीराव सूर्यवंशी, अध्यक्ष अन्नदाता शेतकरी संघटना