शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अडीच लाख ग्रामस्थांसाठी सव्वाशे टँकर

By admin | Updated: May 29, 2014 00:39 IST

दिनेश गुळवे , बीड गेल्या आठ दिवसात उन्हाच्या पार्‍याने चाळिशी पार केली आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे.

दिनेश गुळवे , बीड गेल्या आठ दिवसात उन्हाच्या पार्‍याने चाळिशी पार केली आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे. यामुळे तब्बल सव्वादोन लाख ग्रामस्थांसाठी सव्वाशे टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी विहिरी, कूपनलिकांना मुबलक पाणी होते. उन्हाळा सुरू होताच या विहिरी सांगळ्यावर आल्या होत्या. आता उन्हाळा अधिक तीव्र झाल्याने विहिरींसह कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १०६ गावे व १७२ वाड्यांवरील २ लाख २१ हजार ६६० ग्रामस्थांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टॅँकर २० आहेत, तर खाजगी टॅँकर १०४ आहेत. ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळावे यासाठी या टॅँकरच्या दररोज २९८ खेपा करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात दीड लाख ग्रामस्थांना ९८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. या आठवड्यात पाणीटंचार्ई अधिक झाल्याने टॅँकरच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. असे असले तरी वडवणी, अंबाजोगाई व माजलगाव तालुक्यात ग्रामस्थांना नळयोजनांतून पाणीपुरवठा होत असल्याने तेथे अद्याप एकही टॅँकर सुरू करण्यात आलेले नाही. तर, आष्टी तालुक्यातील सर्वाधिक ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टॅँकरसह प्रशासनाकडून विहीर, कूपनलिकाही अधिग्रहित करण्यात येत आहेत. १०७ गावे व ८७ वाड्यांवरील मिळून ८३ विहिरी व १५८ बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये वा वाडी-वस्तीवर पाणीटंचाई आहे, तेथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत समितीमधून टॅँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जातात. यावर तात्काळ दखल घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. पाणीटंचाई दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्ह्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, ज्या ठिकाणी टॅँकरची आवश्यकता आहे, तेथे तात्काळ टॅँकर सुरू करण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी विहिरी, बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तालुका लोकसंख्या गावे वाडी टॅँकर खेपा बीड ५०८५७ ३५ १४ ३४ ७४ गेवराई ८१९२ ०३ ०१ ०३ ०८ शिरूर ७५०० ०२ ०८ ११ ०६ पाटोदा ११०८९ ०८ ०२ ०९ १९ आष्टी १०००७७ ५१ ३६ ६१ १५१ केज ३६४४२ ०४ ०४ ०६ २० परळी १२०० ०१ ०१ ०१ ०४ धारूर ६३०३ ०२ ०६ ०४ ११