शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

अडीच लाख ग्रामस्थांसाठी सव्वाशे टँकर

By admin | Updated: May 29, 2014 00:39 IST

दिनेश गुळवे , बीड गेल्या आठ दिवसात उन्हाच्या पार्‍याने चाळिशी पार केली आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे.

दिनेश गुळवे , बीड गेल्या आठ दिवसात उन्हाच्या पार्‍याने चाळिशी पार केली आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे. यामुळे तब्बल सव्वादोन लाख ग्रामस्थांसाठी सव्वाशे टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी विहिरी, कूपनलिकांना मुबलक पाणी होते. उन्हाळा सुरू होताच या विहिरी सांगळ्यावर आल्या होत्या. आता उन्हाळा अधिक तीव्र झाल्याने विहिरींसह कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १०६ गावे व १७२ वाड्यांवरील २ लाख २१ हजार ६६० ग्रामस्थांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टॅँकर २० आहेत, तर खाजगी टॅँकर १०४ आहेत. ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळावे यासाठी या टॅँकरच्या दररोज २९८ खेपा करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात दीड लाख ग्रामस्थांना ९८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. या आठवड्यात पाणीटंचार्ई अधिक झाल्याने टॅँकरच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. असे असले तरी वडवणी, अंबाजोगाई व माजलगाव तालुक्यात ग्रामस्थांना नळयोजनांतून पाणीपुरवठा होत असल्याने तेथे अद्याप एकही टॅँकर सुरू करण्यात आलेले नाही. तर, आष्टी तालुक्यातील सर्वाधिक ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टॅँकरसह प्रशासनाकडून विहीर, कूपनलिकाही अधिग्रहित करण्यात येत आहेत. १०७ गावे व ८७ वाड्यांवरील मिळून ८३ विहिरी व १५८ बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये वा वाडी-वस्तीवर पाणीटंचाई आहे, तेथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत समितीमधून टॅँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जातात. यावर तात्काळ दखल घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. पाणीटंचाई दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्ह्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, ज्या ठिकाणी टॅँकरची आवश्यकता आहे, तेथे तात्काळ टॅँकर सुरू करण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी विहिरी, बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तालुका लोकसंख्या गावे वाडी टॅँकर खेपा बीड ५०८५७ ३५ १४ ३४ ७४ गेवराई ८१९२ ०३ ०१ ०३ ०८ शिरूर ७५०० ०२ ०८ ११ ०६ पाटोदा ११०८९ ०८ ०२ ०९ १९ आष्टी १०००७७ ५१ ३६ ६१ १५१ केज ३६४४२ ०४ ०४ ०६ २० परळी १२०० ०१ ०१ ०१ ०४ धारूर ६३०३ ०२ ०६ ०४ ११