शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाख ग्रामस्थांसाठी सव्वाशे टँकर

By admin | Updated: May 29, 2014 00:39 IST

दिनेश गुळवे , बीड गेल्या आठ दिवसात उन्हाच्या पार्‍याने चाळिशी पार केली आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे.

दिनेश गुळवे , बीड गेल्या आठ दिवसात उन्हाच्या पार्‍याने चाळिशी पार केली आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे. यामुळे तब्बल सव्वादोन लाख ग्रामस्थांसाठी सव्वाशे टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी विहिरी, कूपनलिकांना मुबलक पाणी होते. उन्हाळा सुरू होताच या विहिरी सांगळ्यावर आल्या होत्या. आता उन्हाळा अधिक तीव्र झाल्याने विहिरींसह कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १०६ गावे व १७२ वाड्यांवरील २ लाख २१ हजार ६६० ग्रामस्थांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टॅँकर २० आहेत, तर खाजगी टॅँकर १०४ आहेत. ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळावे यासाठी या टॅँकरच्या दररोज २९८ खेपा करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात दीड लाख ग्रामस्थांना ९८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. या आठवड्यात पाणीटंचार्ई अधिक झाल्याने टॅँकरच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. असे असले तरी वडवणी, अंबाजोगाई व माजलगाव तालुक्यात ग्रामस्थांना नळयोजनांतून पाणीपुरवठा होत असल्याने तेथे अद्याप एकही टॅँकर सुरू करण्यात आलेले नाही. तर, आष्टी तालुक्यातील सर्वाधिक ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टॅँकरसह प्रशासनाकडून विहीर, कूपनलिकाही अधिग्रहित करण्यात येत आहेत. १०७ गावे व ८७ वाड्यांवरील मिळून ८३ विहिरी व १५८ बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये वा वाडी-वस्तीवर पाणीटंचाई आहे, तेथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत समितीमधून टॅँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जातात. यावर तात्काळ दखल घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. पाणीटंचाई दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्ह्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, ज्या ठिकाणी टॅँकरची आवश्यकता आहे, तेथे तात्काळ टॅँकर सुरू करण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी विहिरी, बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तालुका लोकसंख्या गावे वाडी टॅँकर खेपा बीड ५०८५७ ३५ १४ ३४ ७४ गेवराई ८१९२ ०३ ०१ ०३ ०८ शिरूर ७५०० ०२ ०८ ११ ०६ पाटोदा ११०८९ ०८ ०२ ०९ १९ आष्टी १०००७७ ५१ ३६ ६१ १५१ केज ३६४४२ ०४ ०४ ०६ २० परळी १२०० ०१ ०१ ०१ ०४ धारूर ६३०३ ०२ ०६ ०४ ११