शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

अडीच लाख ग्रामस्थांसाठी सव्वाशे टँकर

By admin | Updated: May 29, 2014 00:39 IST

दिनेश गुळवे , बीड गेल्या आठ दिवसात उन्हाच्या पार्‍याने चाळिशी पार केली आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे.

दिनेश गुळवे , बीड गेल्या आठ दिवसात उन्हाच्या पार्‍याने चाळिशी पार केली आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे. यामुळे तब्बल सव्वादोन लाख ग्रामस्थांसाठी सव्वाशे टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी विहिरी, कूपनलिकांना मुबलक पाणी होते. उन्हाळा सुरू होताच या विहिरी सांगळ्यावर आल्या होत्या. आता उन्हाळा अधिक तीव्र झाल्याने विहिरींसह कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १०६ गावे व १७२ वाड्यांवरील २ लाख २१ हजार ६६० ग्रामस्थांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टॅँकर २० आहेत, तर खाजगी टॅँकर १०४ आहेत. ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळावे यासाठी या टॅँकरच्या दररोज २९८ खेपा करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात दीड लाख ग्रामस्थांना ९८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. या आठवड्यात पाणीटंचार्ई अधिक झाल्याने टॅँकरच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. असे असले तरी वडवणी, अंबाजोगाई व माजलगाव तालुक्यात ग्रामस्थांना नळयोजनांतून पाणीपुरवठा होत असल्याने तेथे अद्याप एकही टॅँकर सुरू करण्यात आलेले नाही. तर, आष्टी तालुक्यातील सर्वाधिक ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टॅँकरसह प्रशासनाकडून विहीर, कूपनलिकाही अधिग्रहित करण्यात येत आहेत. १०७ गावे व ८७ वाड्यांवरील मिळून ८३ विहिरी व १५८ बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये वा वाडी-वस्तीवर पाणीटंचाई आहे, तेथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत समितीमधून टॅँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जातात. यावर तात्काळ दखल घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. पाणीटंचाई दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्ह्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, ज्या ठिकाणी टॅँकरची आवश्यकता आहे, तेथे तात्काळ टॅँकर सुरू करण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी विहिरी, बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तालुका लोकसंख्या गावे वाडी टॅँकर खेपा बीड ५०८५७ ३५ १४ ३४ ७४ गेवराई ८१९२ ०३ ०१ ०३ ०८ शिरूर ७५०० ०२ ०८ ११ ०६ पाटोदा ११०८९ ०८ ०२ ०९ १९ आष्टी १०००७७ ५१ ३६ ६१ १५१ केज ३६४४२ ०४ ०४ ०६ २० परळी १२०० ०१ ०१ ०१ ०४ धारूर ६३०३ ०२ ०६ ०४ ११