शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

शेतकऱ्यांसाठी बाराशे कोटी

By admin | Updated: June 29, 2014 00:26 IST

परभणी : यावर्षीच्या खरीप आणि रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना ११९४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी ठरविले आहे.

परभणी : यावर्षीच्या खरीप आणि रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना ११९४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी ठरविले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५३ कोटी रुपये वाढीव कर्ज वाटप यावर्षी केले जाणार आहे.मराठवाड्यात खरीप आणि रबी हे दोन महत्त्वपूर्ण हंगाम आहेत. या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना पैशांची निकड भासते. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेता, राष्ट्रीयीकृत बँकांकडून दरवर्षी शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटप केले जाते. गतवर्षी ९४०.८५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. बँकांनी १०५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत ९८७.६६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते.जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्राधान्य क्षेत्र आणि इतर क्षेत्रात कर्ज वाटप करावयाचा आराखडा जाहीर केला आहे. १६९२.०६ कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. त्यात १६१.९६ कोटी रुपयांचे मुदत कर्ज, सुक्ष्म व लघू उद्योगासाठी ८०.५१ कोटी रुपयांचे गैर कृषी कर्ज, इतर प्राधान्य क्षेत्रासाठी (गृह, शैक्षणिक व इतर) १३७.६६ कोटी रुपये, गैरप्राधान्य क्षेत्रासाठी १२०.२९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे निश्चित केले आहे. दरवर्षी बँकांना कृषी कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट दिले जाते. परंतु शेतकऱ्यांना हे कर्ज वेळेत मिळत नाही. बँक प्रशासन कागदपत्र आणि इतर कारणांमुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्यास भाग पाडते. वेळेत हे कर्ज मिळाले नाही तर हा पैसा शेतकऱ्यांना कामी येत नाही. शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडत जाते. त्यामुळे बँकाँनी कृषी कर्जाचे वाटप वेळेत करावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.गतवर्षी असा होता आराखडा२०१३-१४ या वर्षात बँकांनी कृषी कर्जासाठी ९४०.८५ कोटी, कृषी मुदत कर्जासाठी ११९.४० कोटी, गैरकृषी कर्जासाठी ७९.७७ कोटी, इतर प्राधान्य क्षेत्रातील कर्जासाठी १३०.१३ कोटी, गैरप्राधान्य क्षेत्रातील कर्जासाठी ९०.५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. गतवर्षी जिल्ह्यातील बँकांनी १३६०.६५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता.प्राधान्याने कर्जपुरवठा करा : धसकृषी विकासात बँकींग क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे बँकांनी ग्रामीण क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज असून, राष्ट्रीयीकृत बँकांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्जपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री सुरेश धस यांनी दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पीककर्जासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा.संजय जाधव, आ.बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी एस.पी. सिंह, जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक पी.जी. जारोंडे, विजय भांबळे यांच्यासह सर्व बँकांचे व्यवस्थापक, सहकार व उद्योग विभागासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.धस म्हणाले, बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. जिल्ह्यातील खातेदारांची संख्या लक्षात घेता पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सर्व खातेदारांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. उद्दिष्टपूर्र्तीसाठी जिल्ह्यातील बँकांना नवीन खाती उघडण्याचे निर्देशही धस यांनी दिले.