शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

शेतकऱ्यांसाठी बाराशे कोटी

By admin | Updated: June 29, 2014 00:26 IST

परभणी : यावर्षीच्या खरीप आणि रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना ११९४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी ठरविले आहे.

परभणी : यावर्षीच्या खरीप आणि रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना ११९४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी ठरविले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५३ कोटी रुपये वाढीव कर्ज वाटप यावर्षी केले जाणार आहे.मराठवाड्यात खरीप आणि रबी हे दोन महत्त्वपूर्ण हंगाम आहेत. या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना पैशांची निकड भासते. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेता, राष्ट्रीयीकृत बँकांकडून दरवर्षी शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटप केले जाते. गतवर्षी ९४०.८५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. बँकांनी १०५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत ९८७.६६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते.जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्राधान्य क्षेत्र आणि इतर क्षेत्रात कर्ज वाटप करावयाचा आराखडा जाहीर केला आहे. १६९२.०६ कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. त्यात १६१.९६ कोटी रुपयांचे मुदत कर्ज, सुक्ष्म व लघू उद्योगासाठी ८०.५१ कोटी रुपयांचे गैर कृषी कर्ज, इतर प्राधान्य क्षेत्रासाठी (गृह, शैक्षणिक व इतर) १३७.६६ कोटी रुपये, गैरप्राधान्य क्षेत्रासाठी १२०.२९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे निश्चित केले आहे. दरवर्षी बँकांना कृषी कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट दिले जाते. परंतु शेतकऱ्यांना हे कर्ज वेळेत मिळत नाही. बँक प्रशासन कागदपत्र आणि इतर कारणांमुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्यास भाग पाडते. वेळेत हे कर्ज मिळाले नाही तर हा पैसा शेतकऱ्यांना कामी येत नाही. शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडत जाते. त्यामुळे बँकाँनी कृषी कर्जाचे वाटप वेळेत करावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.गतवर्षी असा होता आराखडा२०१३-१४ या वर्षात बँकांनी कृषी कर्जासाठी ९४०.८५ कोटी, कृषी मुदत कर्जासाठी ११९.४० कोटी, गैरकृषी कर्जासाठी ७९.७७ कोटी, इतर प्राधान्य क्षेत्रातील कर्जासाठी १३०.१३ कोटी, गैरप्राधान्य क्षेत्रातील कर्जासाठी ९०.५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. गतवर्षी जिल्ह्यातील बँकांनी १३६०.६५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता.प्राधान्याने कर्जपुरवठा करा : धसकृषी विकासात बँकींग क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे बँकांनी ग्रामीण क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज असून, राष्ट्रीयीकृत बँकांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्जपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री सुरेश धस यांनी दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पीककर्जासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा.संजय जाधव, आ.बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी एस.पी. सिंह, जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक पी.जी. जारोंडे, विजय भांबळे यांच्यासह सर्व बँकांचे व्यवस्थापक, सहकार व उद्योग विभागासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.धस म्हणाले, बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. जिल्ह्यातील खातेदारांची संख्या लक्षात घेता पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सर्व खातेदारांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. उद्दिष्टपूर्र्तीसाठी जिल्ह्यातील बँकांना नवीन खाती उघडण्याचे निर्देशही धस यांनी दिले.