शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

बारावीचे विद्यार्थी अकरावीच्या उत्तरपत्रिका लिहिण्यात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:05 IST

औरंगाबाद : अकरावी रेस्ट इयर समजले जाते. परीक्षा दिली किंवा नाही दिली तरी अकरावी पास होतो. त्यामुळे विद्यार्थी जानेवारी, ...

औरंगाबाद : अकरावी रेस्ट इयर समजले जाते. परीक्षा दिली किंवा नाही दिली तरी अकरावी पास होतो. त्यामुळे विद्यार्थी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच बारावीच्या तयारीला लागतात. मात्र, कोरोनामुळे यावर्षी बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यावर अकरावीच्या गुणांचेही मूल्यांकन करण्यात येत आहे. त्याचे पुरावेही बोर्डात द्यावे लागत असल्याने आता बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या उत्तरपत्रिका लिहून घेण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रात्यक्षिक, सराव परीक्षा, इंटरनल असेसमेंट, प्रथमसत्र व द्वितीय सत्राच्या परीक्षांचे अभिलेखे विभागीय शिक्षण मंडळ निकालावेळी मागते. त्यामुळे पुढच्या वर्षीही अशीच परिस्थिती उद्भवल्यास अकरावीच्या अभिलेख्यांची गरज भासेल. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या सराव परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, ‌वार्षिक परीक्षांच्या उत्तरपत्रिका लिहून घेतल्या जात असल्याचे चित्र सोमवारी विभागीय शिक्षण मंडळासमोरच्या शहर बसस्थानकावर दिसून आले. नांदेडहून शहरातील महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले बारावीचे विद्यार्थी अकरावीच्या उत्तरपत्रिका लिहित चक्क शहर बसथांब्यावर बसलेले होते. हे विद्यार्थी वर्षभर महाविद्यालयात कोरोनामुळे येऊ शकले नव्हते. परीक्षा तर झाली नाहीच. मात्र, आता बारावीचा वर्ग सुरू होण्याच्या हलचाली सुरू होताच विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने बोलावून उत्तरपत्रिका लिहून आणायला सांगितल्या. त्यामुळे विद्यार्थी शहर बसथांब्यावर बसून उत्तरपत्रिका लिहित बसले होते. याविषयी विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार देत तेथून निघून गेले.