शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

बारावीचे विद्यार्थी अकरावीच्या उत्तरपत्रिका लिहिण्यात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:05 IST

औरंगाबाद : अकरावी रेस्ट इयर समजले जाते. परीक्षा दिली किंवा नाही दिली तरी अकरावी पास होतो. त्यामुळे विद्यार्थी जानेवारी, ...

औरंगाबाद : अकरावी रेस्ट इयर समजले जाते. परीक्षा दिली किंवा नाही दिली तरी अकरावी पास होतो. त्यामुळे विद्यार्थी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच बारावीच्या तयारीला लागतात. मात्र, कोरोनामुळे यावर्षी बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यावर अकरावीच्या गुणांचेही मूल्यांकन करण्यात येत आहे. त्याचे पुरावेही बोर्डात द्यावे लागत असल्याने आता बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या उत्तरपत्रिका लिहून घेण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रात्यक्षिक, सराव परीक्षा, इंटरनल असेसमेंट, प्रथमसत्र व द्वितीय सत्राच्या परीक्षांचे अभिलेखे विभागीय शिक्षण मंडळ निकालावेळी मागते. त्यामुळे पुढच्या वर्षीही अशीच परिस्थिती उद्भवल्यास अकरावीच्या अभिलेख्यांची गरज भासेल. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या सराव परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, ‌वार्षिक परीक्षांच्या उत्तरपत्रिका लिहून घेतल्या जात असल्याचे चित्र सोमवारी विभागीय शिक्षण मंडळासमोरच्या शहर बसस्थानकावर दिसून आले. नांदेडहून शहरातील महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले बारावीचे विद्यार्थी अकरावीच्या उत्तरपत्रिका लिहित चक्क शहर बसथांब्यावर बसलेले होते. हे विद्यार्थी वर्षभर महाविद्यालयात कोरोनामुळे येऊ शकले नव्हते. परीक्षा तर झाली नाहीच. मात्र, आता बारावीचा वर्ग सुरू होण्याच्या हलचाली सुरू होताच विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने बोलावून उत्तरपत्रिका लिहून आणायला सांगितल्या. त्यामुळे विद्यार्थी शहर बसथांब्यावर बसून उत्तरपत्रिका लिहित बसले होते. याविषयी विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार देत तेथून निघून गेले.