शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उलाढाल मंदावली

By admin | Updated: November 13, 2016 00:27 IST

बीड : पाचशे-हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर समाजजीवनावर त्याचे दूरगामी परिणाम जाणवत आहेत.

बीड : पाचशे-हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर समाजजीवनावर त्याचे दूरगामी परिणाम जाणवत आहेत. सलग चौथ्या दिवशी व्यापारपेठेत प्रचंड शुकशुकाट जाणवला. कोट्यवधींची उलाढाल हजारापर्यंत गडगडल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची झळ व्यापाऱ्यांना पोहोचली आहे.चार दिवसांपासून एटीएम बंद असल्यामुळे व्यापारपेठेत पैशांची चणचण जाणवत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये लांबलचक रांगा लागत असून, अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. अडीच लाखापर्यंतच्या व्यवहारापर्यंत अडचणी नाहीत, असे शासनाने स्पष्ट केले आहे. अनेकांना लाखोंचे व्यवहार समोर येऊ नये असे वाटत आहे. त्यामुळे उसनवारी व उधारीवरच बहुतांश व्यवहार सुरू आहेत. दोन हजार रूपयांच्या नोटा काहींना मिळाल्या असल्या तरी सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे. पाचशे-हजार रूपयांच्या नोटा कोणी स्वीकारायला तयार नाही. तसेच दोन हजार रूपयांच्या नोटेच्या चिल्लरचे वांधे आहेत. त्यामुळे अनेकांचे व्यवहार दुहेरी कात्रीत सापडले आहेत.कूपन २००, नोटा १५० जणांनाचअंबाजोगाईमध्ये नोटा बदलण्यासाठी नागरिकांना संपूर्ण दिवस खर्ची करावा लागत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून २०० जणांना कूपन वाटप केले जात आहे. मात्र, दिवसभरात केवळ १५० जणांनाच नोटा बदलून मिळत आहेत. त्यामुळे उर्वरित नागरिकांना रिकाम्या हाती परत फिरावे लागत आहे.एटीएमवर ग्राहकांच्या चकराबँकेमध्ये रांगा आहेत. त्यामुळे खात्यावर जमा असलेले पैसे काढणे ग्राहकांना अवघड बनले आहे. त्यात एटीएमचे शटर चार दिवसांपासून डाऊनच आहे. काही ठिकाणचे एटीएम सुरू आहेत. मात्र, तेथेही तोबा गर्दी आहे. एटीएम सुरू होण्याची नागरिकांना प्रतीक्षा असून, ग्राहकांच्या चकरा सुरू आहेत.एसटीच्या उत्पन्नावर परिणामपाचशे-हजार रूपयांच्या नोटांद्वारे एसटीमध्ये केवळ आरक्षित तिकीट काढता येत आहे. वाहक अशा नोटा स्वीकारत नाहीत. दोन हजारांची नवीन नोट दिली तर परत सुटे देण्यासाठी अडचणी आहेत. त्यामुळे एसटीचे उत्पन्न ३० टक्क्यांनी घटले आहे. ग्रामीण भागात प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. (प्रतिनिधी)