शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

उलाढाल मंदावली

By admin | Updated: November 13, 2016 00:27 IST

बीड : पाचशे-हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर समाजजीवनावर त्याचे दूरगामी परिणाम जाणवत आहेत.

बीड : पाचशे-हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर समाजजीवनावर त्याचे दूरगामी परिणाम जाणवत आहेत. सलग चौथ्या दिवशी व्यापारपेठेत प्रचंड शुकशुकाट जाणवला. कोट्यवधींची उलाढाल हजारापर्यंत गडगडल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची झळ व्यापाऱ्यांना पोहोचली आहे.चार दिवसांपासून एटीएम बंद असल्यामुळे व्यापारपेठेत पैशांची चणचण जाणवत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये लांबलचक रांगा लागत असून, अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. अडीच लाखापर्यंतच्या व्यवहारापर्यंत अडचणी नाहीत, असे शासनाने स्पष्ट केले आहे. अनेकांना लाखोंचे व्यवहार समोर येऊ नये असे वाटत आहे. त्यामुळे उसनवारी व उधारीवरच बहुतांश व्यवहार सुरू आहेत. दोन हजार रूपयांच्या नोटा काहींना मिळाल्या असल्या तरी सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे. पाचशे-हजार रूपयांच्या नोटा कोणी स्वीकारायला तयार नाही. तसेच दोन हजार रूपयांच्या नोटेच्या चिल्लरचे वांधे आहेत. त्यामुळे अनेकांचे व्यवहार दुहेरी कात्रीत सापडले आहेत.कूपन २००, नोटा १५० जणांनाचअंबाजोगाईमध्ये नोटा बदलण्यासाठी नागरिकांना संपूर्ण दिवस खर्ची करावा लागत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून २०० जणांना कूपन वाटप केले जात आहे. मात्र, दिवसभरात केवळ १५० जणांनाच नोटा बदलून मिळत आहेत. त्यामुळे उर्वरित नागरिकांना रिकाम्या हाती परत फिरावे लागत आहे.एटीएमवर ग्राहकांच्या चकराबँकेमध्ये रांगा आहेत. त्यामुळे खात्यावर जमा असलेले पैसे काढणे ग्राहकांना अवघड बनले आहे. त्यात एटीएमचे शटर चार दिवसांपासून डाऊनच आहे. काही ठिकाणचे एटीएम सुरू आहेत. मात्र, तेथेही तोबा गर्दी आहे. एटीएम सुरू होण्याची नागरिकांना प्रतीक्षा असून, ग्राहकांच्या चकरा सुरू आहेत.एसटीच्या उत्पन्नावर परिणामपाचशे-हजार रूपयांच्या नोटांद्वारे एसटीमध्ये केवळ आरक्षित तिकीट काढता येत आहे. वाहक अशा नोटा स्वीकारत नाहीत. दोन हजारांची नवीन नोट दिली तर परत सुटे देण्यासाठी अडचणी आहेत. त्यामुळे एसटीचे उत्पन्न ३० टक्क्यांनी घटले आहे. ग्रामीण भागात प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. (प्रतिनिधी)