सिरसाळा : परळी तालुक्यातील सर्वात मोठे व उपबाजार पेठेचे ठिकाण असणाऱ्या सिरसाळा येथील पाणीपुरवठा योजने वरील जलशुद्धीकरण यंत्र मागील एक-दोन नव्हे तर तब्बल आठ वर्षांपासून निकामी झाले आहे. अशुद्ध पाण्यावर तहान भागवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.पाणी हा शहराचा जिव्हाळ्याचा विषय. भविष्यात सिरसाळयाचा वाढता विस्तार लक्षात घेत युती शासन काळात उपमुख्यमंत्री असणारे कै. गोपीनाथ मुंडे यांनी विशेष बाब म्हणून २ कोटीची पाणीपुरवठा योजना या ठिकाणी मंजूर केली. २००५-०६ साली महाराष्ट जीवन प्राधिकरण ने एक जल शुद्धीकरण यंत्र व २.५० लक्ष लिटर पाण्याची क्षमता असणारी टाकी उभा केली. त्यानंतर ३ वर्षच हे जलशुद्धीकरण यंत्र चालले. पुढे कर्नाटकातील गुंटूर येथून रेती आणण्यावाचून हे यंत्र निकामी झाले. गेल्या आठ वर्षापासून ब्लिचिंग पावडर तुरटीच्या मदतीने पाणी शुद्ध करणाचा रामबाण उपाय ग्रां. प. ने शोधून काढला. नळास आलेले पाणी नाइलाजास्तव प्यावे लागत असल्याचे नीता शिंदे म्हणाल्या आता तर कधी कधी एवढे गढूळ पाणी येते की ते हंउ्यात भरून सुद्धा घ्यावं अस वाटत नसल्याचे रत्नाकर लहाने यांनी सांगितले.प्रश्न मार्गी नाही लावल्यास महिला व पुरूषांसहित कार्यालयाच्या दारात उपोषण करणार असल्याचे सदस्य शेख नशीब म्हणाले.सरपंच शमीम खां पठाण म्हणाल्या की जलशुद्धीकरण यंत्रातील रेतीचे प्रमाण थोडं कमी झालं असून १४ व्या वित्त आयोगातून यंत्रास लागणाऱ्या साहित्याची नव्याने खरेदी करू. (वार्ताहर)
आठ वर्षांपासून जलशुद्धीकरण यंत्रणा बंद
By admin | Updated: February 13, 2016 23:51 IST