शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वीज कडाडताच करा मोबाईल बंद; झाडांपासून राहा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:02 IST

विकास राऊत औरंगाबाद : जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. वीज कडाडताच मोबाईल बंद करून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबणे ...

विकास राऊत

औरंगाबाद : जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. वीज कडाडताच मोबाईल बंद करून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबणे गरजेचे आहे. विजेच्या कडकडाटासह होणाऱ्या पावसात झाडांखाली थांबणे धोकादायक ठरते आहे. यंदाचा पावसाळा जोरदार असेल, असे भाकित हवामान खात्याने केले आहे, त्यानुसार १५ जुलैपर्यंत जिल्ह्यांत बऱ्यापैकी पावसाची नोंदही झाली आहे. जिल्ह्यात वीज पडण्याचे प्रमाण वाढत आहे. वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा देखील मोठा आहे. जिल्ह्यात वीज अटकाव करणारी जास्तीची यंत्रे असावीत, अशी मागणी आहे. ४० लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ७ लाख हेक्टरवर पिकांचे क्षेत्र आहे. या सगळ्या परिसरासाठी फक्त चार वीज अटकाव यंत्रे आहेत.

जिल्ह्यात किती वीज अटकाव यंत्रे

औरंगाबाद जिल्ह्यात पाच वर्षांत १५ ते १८ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. हनुमंतगाव वैजापूर, नवगांव पैठण, गोलटगांव, औरंगाबाद, मुर्डेश्वर- सिल्लोड या ४ ठिकाणी वीज अटकाव यंत्रे आहेत.

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी

शेतात काम करणाऱ्यांनी जवळील सुरक्षित ठिकाणाचा त्वरित आसरा घ्यावा. आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा. पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.

- अजय चौधरी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

वीज कडाडत असताना या गोष्टी टाळा

मोबाईल वापरू नका. खुल्या मैदानात, झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी, झाडावर चढू नका. विजेचा, टेलिफोनचा खांब, मोबाईल टॉवर जवळ उभे राहू नका. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावरून उतरून सुरक्षित ठिकाणी जा. वाहनातून प्रवास करू नका. मोबाईलसह कोणत्या धातूचे कोणतेही उपकरण बाळगू नका.

कोणाला किती नुकसान भरपाई मिळते

वीज पडून दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना व जनावरांना १३ मे २०१५ शासन आदेशातील अटी व शर्तीनुसार नुकसान भरपाई देण्यात येते.

वीज पडून मृत्यू झाल्यास : चार लाख रुपये

४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास : ५९ हजार रुपये

६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास : २ लाख रुपये

आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात असल्यास : ४३०० रुपये

आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रुग्णालयात असल्यास : १२ हजार ७०० रुपये

जनावरांना मृत्यूनंतर लहान व मोठे असे वर्गीकरण करून मदत देण्यात येते.