शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वीज कडाडताच करा मोबाईल बंद; झाडांपासून राहा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:02 IST

विकास राऊत औरंगाबाद : जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. वीज कडाडताच मोबाईल बंद करून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबणे ...

विकास राऊत

औरंगाबाद : जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. वीज कडाडताच मोबाईल बंद करून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबणे गरजेचे आहे. विजेच्या कडकडाटासह होणाऱ्या पावसात झाडांखाली थांबणे धोकादायक ठरते आहे. यंदाचा पावसाळा जोरदार असेल, असे भाकित हवामान खात्याने केले आहे, त्यानुसार १५ जुलैपर्यंत जिल्ह्यांत बऱ्यापैकी पावसाची नोंदही झाली आहे. जिल्ह्यात वीज पडण्याचे प्रमाण वाढत आहे. वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा देखील मोठा आहे. जिल्ह्यात वीज अटकाव करणारी जास्तीची यंत्रे असावीत, अशी मागणी आहे. ४० लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ७ लाख हेक्टरवर पिकांचे क्षेत्र आहे. या सगळ्या परिसरासाठी फक्त चार वीज अटकाव यंत्रे आहेत.

जिल्ह्यात किती वीज अटकाव यंत्रे

औरंगाबाद जिल्ह्यात पाच वर्षांत १५ ते १८ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. हनुमंतगाव वैजापूर, नवगांव पैठण, गोलटगांव, औरंगाबाद, मुर्डेश्वर- सिल्लोड या ४ ठिकाणी वीज अटकाव यंत्रे आहेत.

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी

शेतात काम करणाऱ्यांनी जवळील सुरक्षित ठिकाणाचा त्वरित आसरा घ्यावा. आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा. पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.

- अजय चौधरी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

वीज कडाडत असताना या गोष्टी टाळा

मोबाईल वापरू नका. खुल्या मैदानात, झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी, झाडावर चढू नका. विजेचा, टेलिफोनचा खांब, मोबाईल टॉवर जवळ उभे राहू नका. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावरून उतरून सुरक्षित ठिकाणी जा. वाहनातून प्रवास करू नका. मोबाईलसह कोणत्या धातूचे कोणतेही उपकरण बाळगू नका.

कोणाला किती नुकसान भरपाई मिळते

वीज पडून दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना व जनावरांना १३ मे २०१५ शासन आदेशातील अटी व शर्तीनुसार नुकसान भरपाई देण्यात येते.

वीज पडून मृत्यू झाल्यास : चार लाख रुपये

४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास : ५९ हजार रुपये

६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास : २ लाख रुपये

आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात असल्यास : ४३०० रुपये

आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रुग्णालयात असल्यास : १२ हजार ७०० रुपये

जनावरांना मृत्यूनंतर लहान व मोठे असे वर्गीकरण करून मदत देण्यात येते.