शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

पाण्याचा अवैध उपसा बंद करा

By admin | Updated: June 29, 2014 01:04 IST

सिल्लोड : तलावांमधील अवैध व शेतीसाठी करण्यात येणारा पाणी उपसा तात्काळ ब्ांद करून पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठे राखीव करावेत, असे आदेश दुग्धविकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

सिल्लोड : तालुक्यातील जलसाठ्यांची पाहणी करून तलावांमधील अवैध व शेतीसाठी करण्यात येणारा पाणी उपसा तात्काळ ब्ांद करून पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठे राखीव करावेत, असे आदेश पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. पाण्याची टंचाई असणाऱ्या गावांना तात्काळ विहिरींचे अधिग्रहण व मागणीनुसार टँकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. येथील तहसील कार्यालयात शनिवारी सकाळी अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणीटंचाई, चारा टंचाई व मग्रारोहयोच्या कामांविषयी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी चुन्नीलाल कोकणी, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी मनोज चौधर, तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव, महावितरणचे सहायक अभियंता अरुण गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मधुसूदन कांडलीकर, सिंचनचे अभियंता दत्तात्रय गवळे, जि.प. पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता डोंगरे, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वानखेडे, पोलीस निरीक्षक कांचनकुमार चाटे, सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, सभापती रेखा जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेशराव दौड, शहराध्यक्ष प्रा.मन्सुर कादरी, उपनगराध्यक्ष किरण पवार, न.प.चे गटनेता नंदकिशोर सहारे, जि.प.सदस्य श्रीराम महाजन, रामदास पालोदकर, बाबुराव चोपडे, कौतिकराव मोरे, बाजार समितीचे संचालक केशवराव तायडे, देवीदास लोखंडे, सुनील काकडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा दुर्गाबाई पवार, शहराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील पाणीटंचाईचा गावनिहाय आढावा या बैठकीत घेण्यात आला. ज्या गावांमध्ये दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो, अशा गावांतील सरपंच, ग्रामसेवक यांना तात्काळ राष्ट्रीय पेयजलअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. तालुक्यात केटीवेअरला लोखंडी दरवाजे बसविण्याच्या सूचनाही त्यांनी सिंचन विभागाला दिल्या. जळालेले रोहित्र तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश महावितरण अभियंत्यांना दिले. अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना अब्दुल सत्तार यांनी यावेळी केल्या. फेरपंचनामे करण्याचे आदेश गारपिटीच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे तलाठी व कृषी सहायकांनी फेरपंचनामे करावेत, असे आदेश अब्दुल सत्तार यांनी यावेळी बैठकीत दिले. (वार्ताहर)ग्रा.पं.त बायोमेट्रिक मशीनआढावा बैठकीत ग्रामसेवक आठवड्यातून एक-दोन दिवस येतात, यामुळे नागरिकांची कामे खोळंबत असल्याच्या तक्रारी तालुक्यातील बहुतांश गावांतील नागरिकांनी केल्या. या मुद्यावरून ग्रामसेवक व नागरिक यांच्यामध्ये चांगलाच आमना-सामना झाला. ग्रामसेवक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यांची ग्रामपंचायतमधील उपस्थितीची नोंद ठेवण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये लवकरच बायोमेट्रिक थंब मशीन बसविणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. बैठकीला तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.