शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

लोकसभा निकालामुळे तुळजापूरचे गणितही अवघड

By admin | Updated: June 12, 2014 01:39 IST

संतोष मगर , तामलवाडी तुळजापूर विधानसभा मतदारसंघ गेल्या १५ वर्षापासून आमदार तथा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या रुपाने काँग्रेस (आय) पक्षाच्या ताब्यात आहे.

संतोष मगर , तामलवाडीतुळजापूर विधानसभा मतदारसंघ गेल्या १५ वर्षापासून आमदार तथा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या रुपाने काँग्रेस (आय) पक्षाच्या ताब्यात आहे. तालुक्यात स्थानिक संस्थावर काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ३५ हजारांचे मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळाले आहे. आजवर तुळजापूरचा आमदार हा धोतर नेसणाराच निवडून देण्याची परंपरा मतदारांनी जोपासली आहे.२००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांना ११०० मतांनी आघाडी तुळजापूर मतदारसंघातून मिळाली होती. यावेळी खा. रवींद्र गायकवाड यांच्या पारड्यात या मतदारसंघाने ३५ हजारांचे मताधिक्य टाकले. त्यामुळे मतदारराजा पुन्हा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या पाठीशी राहील, हे राजकीय गणित मांडणे सध्यातरी धोक्याचे आहे. केंद्रात महायुतीची सत्ता आल्याने तुळजापूर तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. तुळजापूरची जागा महायुतीच्या कोट्यातून भाजपासाठी सुटली. सध्या महायुतीचा उमेदवार कोण, हे स्पष्ट नाही; पण पालकमंत्री चव्हाण, देवानंद रोचकरी हे दोघे जण निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सलग १५ वर्ष तालुक्यात झालेली विकास कामे, स्थानिक संस्थावर असलेले वर्चस्व यातून विद्यमान आमदाराला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत रोचकरी यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता.तुळजापूर विधानसभा मतदार संघात उस्मानाबाद तालुक्यातील ७२ गावांचा समावेश तुळजापूरमध्ये असल्याने सर्वच राजकीय उमेदवारांना प्रचाराला जोरा द्यावा लागणार आहे. तुळजापूर पंचायत समितीवर स्वतंत्र काँग्रेसच्या ताब्यात आहे. तर बाजार समिती, साखर कारखाना, सूतगिरणी या संस्थावर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. मात्र महायुतीकडे सध्या कोणतीही सत्तास्थाने नाहीत. त्यामुळे मातब्बरांसमोर कोण टक्कर देणार याकडे लक्ष लागले आहे. तुळजापूर तालुक्याला जि.प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद मिळाल्याने काँग्रेसने जि.प.तील सत्ता कायम ठेवली आहे. काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीत दाखल झालेले अ‍ॅड. दीपक आलुरे, वसंत वडगावे यांच्यामुळे काय परिणाम होतो, हेही पहावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अपक्ष उमेदवार रोहन देशमुख काय भूमिका घेणार यावरही लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे. गत निवडणुकीत उस्मानाबाद तालुक्यातील ७१ गावांतून सुभाष देशमुख यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. लोकसभा महायुतीने एकहाती जिंकली असली तरी विधानसभेची लढत वाटते तेवढी सोपी नाही एवढे मात्र नक्की. निवडून गेलेले सर्व आमदार धोतरवालेसाहेबराव आबा हंगरकर, शिवाजीराव पाटील बाभळगावकर, माणिकराव भीमराव खपले, सिद्रामप्पा नागप्पा आलुरे, मधुकरराव देवराव चव्हाण.२००९ च्या निवडणुकीत पडलेली मते्नमधुकरराव चव्हाण : ६५,८०२सुभाष देशमुख : ४९,४६९देवानंद रोचकरी : ४५,९४२अरविंद गोरे : १५,६६५अर्जुन सलगर : ४९९९