शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

कायद्याचा धाक दाखवून उद्दिष्टपूर्तीचा केविलवाना प्रयत्न !

By admin | Updated: November 29, 2015 23:17 IST

लातूर : उघड्यावर शौचालयाला बसल्यास ६ महिन्यांची कैद आणि १२०० रुपयांचा दंड असा धाक दाखवून शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा केविलवाना प्रयत्न ‘मिशन स्वच्छ

लातूर : उघड्यावर शौचालयाला बसल्यास ६ महिन्यांची कैद आणि १२०० रुपयांचा दंड असा धाक दाखवून शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा केविलवाना प्रयत्न ‘मिशन स्वच्छ भारत अभियाना’मार्फत सुरु असला तरी पाणीटंचाईपुढे अभियान हतबल झाले आहे़ पाच रुपयाला एक घागर घेऊन तहान भागविण्याची वेळ ग्रामीण भागातील जनतेवर आहे़ तिथे शौचालयाचे बांधकाम कसे करावे, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे़ परिणामी, शौचालयाचे उद्दिष्ट एक तृतियांशही पूर्ण झाला नाही़ ४७ हजार उद्दिष्टांपैकी केवळ १२ हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ कायदा स्वच्छतेचा़़़ शौचालये बांधकामाचा़़़ आरोग्य संपन्नतेचा़़़ अशा आशयाची घडीपत्रिका व बॅनर लावून शौचालये बांधकामाची मोहीम जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन स्वच्छ भारत’ या अभियानामार्फत राबविली जात आहे़ यंदा ४७ हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट आहे़ उघड्यावर शौचालयाला गेल्यास पोलिस अधिनियम ५१ (अ) कलम ११५, ११७ नुसार गुन्हा दाखल केला जाईल, या गुन्ह्यानुसार सहा महिन्याची कैद व १२०० रुपयांचा दंड लागतो, अशी जनजागृती करुन शौचालये बांधण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत़ परंतू ग्रामीण भागात पाण्याची टंचाई आहे़ पिण्यासाठी पाणी नाही तिथे बांधकाम कसे करावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला पडला आहे़ पाणी द्या, शौचालये बांधतो, असे गावकरी अभियानातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना म्हणत आहेत़ पाझर तलाव, साठवण तलाव, विहिरी, विंधन विहिरी कोरड्याठाक आहेत़ पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या योजनांचे स्त्रोतही कोरडे आहे़ जिथे पाणी पिण्याचीच सोय नाही, तिथे बांधकाम कसे करणे शक्य नाही, असे अधिकारीही खाजगीत म्हणत आहेत़ परंतू उद्दिष्ट असल्यामुळे त्यांना जनजागृती करावी लागत आहे़ गेल्या तीन वर्षांपासून शौचालयांचे बांधकाम लातूर जिल्ह्यात पूर्ण झाले आहे़ २०१४-१५ मध्ये २६ हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट होते़ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याने उद्दिष्टापेक्षा १ हजार अधिक शौचालये बांधली़ २०१३-१४ मध्ये २४ हजारांचे उद्दिष्ट होते तर २५ हजार शौचालये बांधली़ २०१२-१३ मध्ये २२ हजारांचे होते़ २३ हजार पूर्ण केले़ यंदा मात्र ४७ हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट आहे़ केवळ १२ हजार शौचालये बांधण्यात यश आले आहे़ आणखी ३५ हजार शौचालये बांधणे पाणी नसल्यामुळे अशक्य आहे, असे अधिकारीही म्हणतात़ (प्रतिनिधी)