शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

पालक प्रवेश निश्चितीला गेले खरे, पण शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:03 IST

मोफत शिक्षणाचा अधिकार : पालकांच्या शिक्षण विभागात खेट्या औरंगाबाद : पाल्याचा आरटीईतून प्रवेशासाठी रितसर अर्ज केला. शिक्षण विभागाकडून ...

मोफत शिक्षणाचा अधिकार : पालकांच्या शिक्षण विभागात खेट्या

औरंगाबाद : पाल्याचा आरटीईतून प्रवेशासाठी रितसर अर्ज केला. शिक्षण विभागाकडून छाननी होऊन लाॅटरीत प्रवेशासाठी निवड झाली. प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांना शाळेत पाठविले. पालकांनी शाळा गाठली खरी, पण शाळा बंद होती. शाळा प्रशासन आर्थिक डबघाईमुळे शाळा बंद केल्याचे शाळा व्यवस्थापन सांगत आहे. तर शिक्षण विभाग रिक्त जागेवर प्रवेश देऊ असे म्हणत असून पालक मात्र, पाल्याच्या प्रवेशाच्या चिंतेत शिक्षण विभागात खेटे घालत आहेत.

आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. सातारा परिसरात सूर्यदीपनगर येथे इंग्लिश प्रायमरी स्कूल नावाच्या शाळेत सहा विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी शिक्षण विभागाने शाळेत जाण्यासाठी संदेश पाठविले. मात्र, पालक शाळेत पोहोचले तर शाळा बंद होती. परिसरातील नागरिकांकडून संपर्क साधला, तर त्या शिक्षकांनी पैठण गेट येथील संस्थेच्या कार्यालयात बोलावले. शेख असलम हुसेन, खान इरफानखान बाबरखान, मोरे गोरख साहेबराव यांनी प्रवेश निश्चितीबद्दल विचारले तर शाळा तोट्यात गेल्याने शाळा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून आरटीई सोडतीत निवड झालेल्या पाल्यांना जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून द्या. बंद केलेली शाळा सुरू करावी व त्या शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.

--

१५ दिवसांत केवळ ९९ प्रवेश निश्चित

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जिल्ह्यातील आरटीईतून प्रवेशासाठी ६०३ शाळांमधील ३६२५ जागांसाठी ११ हजार ८११ अर्ज पात्र ठरले. त्यापैकी सोडतीत ३४७० जणांची निवड करण्यात आली. त्यांच्या प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली. धिम्या गतीने सुरू या प्रवेश प्रक्रियेत गेल्या १५ दिवसांत शनिवारपर्यंत ७४७ पाल्यांचे प्रोव्हिजनल, तर केवळ ९९ प्रवेश निश्चित झाले. याला प्रवेशप्रक्रियेला गती देण्याची मागणी आरटीई पालक संघाचे प्रशांत साठे यांनी केली आहे.

---

माझ्या मुलासह सहा विद्यार्थ्यांची सूर्यदीपनगर सातारा परिसरातील इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये आरटीईतून प्रवेशासाठी निवड झाली. तिथे प्रवेश निश्चितीसाठी गेलो, तर शाळा बंद आहे. त्या संस्थेच्या व्यवस्थापनाला संपर्क साधला तर ते शाळा बंद केल्याचे सांगत आहेत. आता प्रवेशाचे काय होणार याची चिंता वाटतेय.

-असलम शेख, पालक

--

लाॅकडाऊन काळात पालकांनी शुल्क भरले नाही. आरटीईचा परतावा शासनाकडूनही मिळाला नाही. त्यामुळे शाळेच्या इमारतीचे भाडे भरू शकलो नसल्याने शाळा बंद करावी लागली. शाळा चालवण्याची आर्थिक स्थिती नसल्याने शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे.

- सोहेल अहेमद, अध्यक्ष, एकता सेवाभावी संस्था

---

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात प्रवेशाच्या प्रक्रियेसंदर्भात शाळांची नोंदणी केली त्यावेळी या संस्था सुरू होत्या. आरटीईची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यावर २ ते ३ संस्था या बंद झाल्याचे आढळून आले आहे. तिथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इतर शाळांतील रिक्त जागांवर प्रवेशासाठी शिक्षण संचालकांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवून मान्यता आल्यावर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.

-सूरजप्रसाद जयस्वाल, प्राथमिक विभाग, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद