शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पालक प्रवेश निश्चितीला गेले खरे, पण शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:03 IST

मोफत शिक्षणाचा अधिकार : पालकांच्या शिक्षण विभागात खेट्या औरंगाबाद : पाल्याचा आरटीईतून प्रवेशासाठी रितसर अर्ज केला. शिक्षण विभागाकडून ...

मोफत शिक्षणाचा अधिकार : पालकांच्या शिक्षण विभागात खेट्या

औरंगाबाद : पाल्याचा आरटीईतून प्रवेशासाठी रितसर अर्ज केला. शिक्षण विभागाकडून छाननी होऊन लाॅटरीत प्रवेशासाठी निवड झाली. प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांना शाळेत पाठविले. पालकांनी शाळा गाठली खरी, पण शाळा बंद होती. शाळा प्रशासन आर्थिक डबघाईमुळे शाळा बंद केल्याचे शाळा व्यवस्थापन सांगत आहे. तर शिक्षण विभाग रिक्त जागेवर प्रवेश देऊ असे म्हणत असून पालक मात्र, पाल्याच्या प्रवेशाच्या चिंतेत शिक्षण विभागात खेटे घालत आहेत.

आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. सातारा परिसरात सूर्यदीपनगर येथे इंग्लिश प्रायमरी स्कूल नावाच्या शाळेत सहा विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी शिक्षण विभागाने शाळेत जाण्यासाठी संदेश पाठविले. मात्र, पालक शाळेत पोहोचले तर शाळा बंद होती. परिसरातील नागरिकांकडून संपर्क साधला, तर त्या शिक्षकांनी पैठण गेट येथील संस्थेच्या कार्यालयात बोलावले. शेख असलम हुसेन, खान इरफानखान बाबरखान, मोरे गोरख साहेबराव यांनी प्रवेश निश्चितीबद्दल विचारले तर शाळा तोट्यात गेल्याने शाळा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून आरटीई सोडतीत निवड झालेल्या पाल्यांना जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून द्या. बंद केलेली शाळा सुरू करावी व त्या शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.

--

१५ दिवसांत केवळ ९९ प्रवेश निश्चित

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जिल्ह्यातील आरटीईतून प्रवेशासाठी ६०३ शाळांमधील ३६२५ जागांसाठी ११ हजार ८११ अर्ज पात्र ठरले. त्यापैकी सोडतीत ३४७० जणांची निवड करण्यात आली. त्यांच्या प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली. धिम्या गतीने सुरू या प्रवेश प्रक्रियेत गेल्या १५ दिवसांत शनिवारपर्यंत ७४७ पाल्यांचे प्रोव्हिजनल, तर केवळ ९९ प्रवेश निश्चित झाले. याला प्रवेशप्रक्रियेला गती देण्याची मागणी आरटीई पालक संघाचे प्रशांत साठे यांनी केली आहे.

---

माझ्या मुलासह सहा विद्यार्थ्यांची सूर्यदीपनगर सातारा परिसरातील इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये आरटीईतून प्रवेशासाठी निवड झाली. तिथे प्रवेश निश्चितीसाठी गेलो, तर शाळा बंद आहे. त्या संस्थेच्या व्यवस्थापनाला संपर्क साधला तर ते शाळा बंद केल्याचे सांगत आहेत. आता प्रवेशाचे काय होणार याची चिंता वाटतेय.

-असलम शेख, पालक

--

लाॅकडाऊन काळात पालकांनी शुल्क भरले नाही. आरटीईचा परतावा शासनाकडूनही मिळाला नाही. त्यामुळे शाळेच्या इमारतीचे भाडे भरू शकलो नसल्याने शाळा बंद करावी लागली. शाळा चालवण्याची आर्थिक स्थिती नसल्याने शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे.

- सोहेल अहेमद, अध्यक्ष, एकता सेवाभावी संस्था

---

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात प्रवेशाच्या प्रक्रियेसंदर्भात शाळांची नोंदणी केली त्यावेळी या संस्था सुरू होत्या. आरटीईची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यावर २ ते ३ संस्था या बंद झाल्याचे आढळून आले आहे. तिथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इतर शाळांतील रिक्त जागांवर प्रवेशासाठी शिक्षण संचालकांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवून मान्यता आल्यावर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.

-सूरजप्रसाद जयस्वाल, प्राथमिक विभाग, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद