शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

संभाजीराजांचा खरा इतिहास तळगाळापर्यंत पोहोचविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:05 IST

औरंगाबाद : छत्रपती संभाजी राजांची ओळख संस्कृत पंडित, प्रतिभावंत कवी, उदार अंतःकरणाचा प्रजाहितदक्ष राजा म्हणून आहे. मात्र, बखरकारांच्या साहित्यांवर ...

औरंगाबाद : छत्रपती संभाजी राजांची ओळख संस्कृत पंडित, प्रतिभावंत कवी, उदार अंतःकरणाचा प्रजाहितदक्ष राजा म्हणून आहे. मात्र, बखरकारांच्या साहित्यांवर १९७० पर्यंत झालेल्या नाटकांद्वारे त्यांची बदनामीच जास्त करण्यात आली. त्यामुळे संभाजीराजेंचा खरा इतिहास समाजाच्या तळागाळातील माणसांपर्यंत पोहचविण्याची खरी गरज आहे, असे प्राचार्य पठाण यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीराजे याच्या ३६४ व्या जयंतीनिमित्त लोकसंवाद फाऊंडेशनच्या वतीने विशेष 'संवाद सत्राचे' आयोजन करण्यात आले होते. इतिहासाचे अभ्यासक प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी ‘छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रासंगिकता’ या विषयावर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी संभाजी महाराजांच्या देदीप्यमान, पराक्रमी कार्यकाळाची साक्षेपी मांडणी केली. बखरकारांनी तसेच विविध नाटकांच्या माध्यमातून संभाजी राजांची बदनामी केली ती वा.सी. बेंद्रे, डाॅ. कमल गोखले, सेतू माधवराव पगडी, रियासतकार सरदेसाई, जयसिंगराव पवार आदी इतिहासकारांनी खोडून काढली. शंभुराजे दूरदृष्टी, पराक्रम, शौर्य, स्वाभिमान, क्षात्रतेज, रयतेची कणव असलेला राजा होता. असा महापराक्रमी राजा महाराष्ट्रात होऊन गेला हे मराठी माणसांचे भाग्य आहे. त्यांचा इतिहास स्फूर्तिदायक आहे. त्यांच्या चरित्र अभ्यासातून नव्या पिढाला ऊर्जा मिळते. स्वाभिमानाचे व पराक्रमाचे बाळकडू मिळते. म्हणून संभाजीराजेंचे कार्यकर्तृत्व नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गवळी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. हंसराज जाधव यांनी केले, तर प्रा.डाॅ. शैलेश आकुलवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी लोकसंवादचे अध्यक्ष डाॅ. राजेश करपे, संस्थेचे सचिव उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते, उपाध्यक्ष डाॅ. बळीराम धापसे, डाॅ. कैलास अंभुरे, कोषाध्यक्ष डाॅ. रामचंद्र काळुंखे, प्रा. डाॅ. शाम कदम. प्रा. डाॅ. मनोहर सिरसाट अभ्यासक, प्राध्यापकांसह संशोधक विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.